शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शहरांच्या प्रमुख मार्गांवर एकाच रंगात रंगणार भिंती, मुख्यमंत्र्यांकडून प्रस्ताव मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2021 15:18 IST

सन 1876 साली जयपूरला आलेले वेल्स राजकुमार आणि महाराणी व्हिक्टोरिया यांच्या स्वागतासाठी जयपूरमधील भवन गुलाबी रंगांनी रंगविण्यात आले होते. तीच पंरपरा पुढे काय राहिली अन् जयपूरला गुलाबी नगरी म्हणून ओळख मिळाली.

ठळक मुद्देउत्तर प्रदेशमधील शहरंही अशाच एकाच रंगात उजळून दिसणार आहेत. उत्तर प्रदेशातील नगर विकास मंत्रालयाने शहराच्या मुख्य मार्गावरील भवनांचा बाहेरील भाग सुधारण आणि दुरुस्तीसाठी मॉडेल योजना आखली आहे.

लखनौ - राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूरला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते. लवकरच उत्तर प्रदेशातील अयोध्या नगरीचीही अशीच वेगळी ओळख अस्तित्वात येणार आहे. उत्तर प्रदेशमधील शहरांच्या प्रमुख रस्त्यांवरील रहिवाशी नसलेल्या आणि व्यवसायिक भवनांना विकास प्राधिकरणाने ठरवून दिलेल्या रंगानेरंगावं लागणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. गृह आणि नगर विकास विभागाकडून लवकरच यासंदर्भातील आदेश जारी करण्यात येणार आहे.

सन 1876 साली जयपूरला आलेले वेल्स राजकुमार आणि महाराणी व्हिक्टोरिया यांच्या स्वागतासाठी जयपूरमधील भवन गुलाबी रंगांनी रंगविण्यात आले होते. तीच पंरपरा पुढे काय राहिली अन् जयपूरला गुलाबी नगरी म्हणून ओळख मिळाली. आता, उत्तर प्रदेशमधील शहरंही अशाच एकाच रंगात उजळून दिसणार आहेत. उत्तर प्रदेशातील नगर विकास मंत्रालयाने शहराच्या मुख्य मार्गावरील भवनांचा बाहेरील भाग सुधारण आणि दुरुस्तीसाठी मॉडेल योजना आखली आहे. या योजनेला मुख्यमंत्र्यांनीही मंजुरी दिली आहे.

नगर विकास सचिवांनी दिपक कुमार यांनी सांगितले की, लवकरच याबाबतचा आदेश जारी करण्यात येणार आहे. विकास प्राधिकरणाद्वारे बोर्डच्या माध्यमातून आपल्या शहरांत ही योजना लागू करावी लागणार आहे. त्यानुसार, शहरातील प्रमुख मार्गांवरील अनिवासी इमारती आणि भवनच्या बाहेर एकच रंग लावण्यात येईल. त्यासाठी मालकांना 6 महिन्यांची मुदत देण्यात येणार आहे. रंगाच खर्चही मालकांनीच करावयाचा आहे. संबंधित शहरातील विकास प्राधिकरणाने प्रमुख मार्ग आणि तेथे वापरण्यात येणाऱ्या रंगाची माहिती संबंधित मालकांना सांगायची आहे. त्यासाठी, स्थानिक मीडियातून जाहीरात द्यावी, असेही सूचविण्यात आले आहे. 

नेमप्लेटही एकसारखेच असणार 

नेमप्लेट आणि साईन बोर्डही एकाच प्रकारच्या रंगात रंगवून घ्यावे लागणार आहेत. त्यासाठी, नेम प्लेटचा आकार, साईन बोर्ड आणि रंगही प्राधिकरण ठरवून देणार आहे. भवन किंवा दुकानाच्या आकारमानानुसार बोर्डाची लांबी ठरविण्यात येणार आहे.  

भगवा रंग लागण्याची शक्यता

कुठल्याही शहरातील प्रमुख मार्गांवरील व्यावसायिक दुकाने किंवा भवन कोणत्या रंगाचे असावे, हे स्थानिक प्राधिकरणाकडून ठरविण्यात येणार आहे. गरजेनुसार एकऐवजी दोन रंगही वापरता येतील. मसलन, प्रभू श्रीराम यांची नगरी असल्याने अयोध्येतील प्रमुख मार्गांवर भगवा रंग दिसून येण्याची शक्यता आहे. तर, ताजनगरी असलेल्या आग्र्यामध्ये ताजमहाप्रमाणे पांढऱ्या रंगांनी सजलेले प्रमुख महामार्ग दिसून येतील.  

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशcolourरंग