शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
4
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
5
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
6
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
7
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
8
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
9
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
10
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
11
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
12
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
13
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
14
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
15
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
16
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
17
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
18
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
19
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
20
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न

मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 06:37 IST

पडताळणी मतदारांसाठी अनुकूल असल्याचे न्यायालयाने म्हटलं.

नवी दिल्ली : मतदारयादी कायमस्वरूपी एकसारखीच राहू शकत नसून तिचे नियमितपणे पुनरीक्षण करणे आवश्यक आहे. बिहारमध्ये निवडणूक आयोगाद्वारे सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षणात (एसआयआर) कागदपत्रांची संख्या ७ वरून ११ केली आहे. कागदपत्रांची ही वाढवलेली संख्या मतदारांसाठी अनुकूल असल्याचे निरीक्षण बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले. निवडणूक आयोगाच्या २४ जूनच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या एका याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले.

मृत, स्थलांतरित किंवा इतर मतदारसंघात गेलेल्या लोकांची नावे यादीतून काढण्यासाठी मतदार यादीचे पुनरीक्षण करणे आवश्यक असल्याचे न्यायमूर्ती सूर्यकांत व न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.

या निरीक्षणावर याचिकाकर्त्यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी आक्षेप नोंदवला. आयोगाने मतदार पडताळणीसाठी कागदपत्रांची संख्या वाढवली असली तरी त्यांची उपलब्धता राज्यातील जनतेकडे फारच कमी आहे. बिहारमध्ये पासपोर्टधारक केवळ १ ते २ टक्के असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला.

कागदपत्रांची संख्या ११; कोणतेही जमा करता येते

मतदार पडताळणीसाठी आधारचा स्वीकार न करणे हा अपवाद असला तरी त्यासाठी वाढवलेल्या कागदपत्रांची संख्या मतदारांसाठी अनुकूल आहे. राज्याने यापूर्वी केलेल्या संक्षिप्त पुनरीक्षणासाठी कागदपत्रांची संख्या ही सात होती.

आता राज्यात सुरू असलेल्या एसआयआरसाठी कागदपत्रांची संख्या ११ केली आहे. त्यामुळे मतदाराला यापैकी कोणतेही एक कागदपत्र जमा करता येऊ शकत असल्याचे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगBiharबिहार