शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मतदार ओळखपत्राने सिद्ध केले नागरिकत्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2020 03:47 IST

बांगलादेशींची न्यायालयाकडून सुटका : २०१७ मध्ये झाली होती अटक

मुंबई : मतदार ओळखपत्रही भारतीय नागरिक असल्याचा पुरावा आहे, असे एका बांगलादेशी दाम्पत्याची सुटका करताना अतिरिक्त दंडाधिकारी न्यायालयाने म्हटले. हे दोघे बांगलादेशी भारतात बेकायदा वास्तव्य करत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी त्यांना २०१७ मध्ये अटक केली.एखाद्या व्यक्तीचे मूळ सिद्ध करण्यासाठी तो त्याचा जन्म दाखला, अधिवास प्रमाणपत्र, पासपोर्ट व सद्वर्तनाचे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांचा आधार घेऊ शकतो, असे न्यायालयाने म्हटले.

‘नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी मतदार ओळखपत्रही पुरेसे आहे. मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करताना संबंधित व्यक्तीला लोकप्रतिनिधी कायद्याच्या फॉर्म ६ अंतर्गत संबंधित प्रशासनाला निवेदन द्यावे लागते. जर निवेदनात चुकीची माहिती आढळल्यास तो शिक्षेस पात्र आहे,’ असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. आरोपी अब्बास शेख (४५) आणि राबिया शेख (४०) यांनी सादर केलेली कागदपत्रे बनावट आहेत, असे सरकारी वकील म्हणू शकत नाही. एक वेळ माणूस खोट बोलेल, पण कागदपत्रे खोटे असू शकत नाहीत. आरोपींनी सादर केलेली कागदपत्रे खोटी आहेत, हे सरकारी वकील सिद्ध करू शकत नाही, असेही न्यायालयाने म्हटले.

आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, रेशनकार्ड इत्यादी कागदपत्रे नागरिकत्व सिद्ध करणारी कागदपत्रे आहेत, असे म्हणू शकत नाही. कारण ही कागदपत्रे त्या उद्दिष्टांसाठी बनवलेली नाहीत, असेही न्यायालयाने म्हटले. २०१७ मध्ये पोलिसांना टीप मिळाली की, रे रोड येथे काही बांगलादेशी बेकायदा राहात आहेत. त्या माहितीनुसार पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी तिन्ही आरोपींनी ते बांगलादेशचे नागरिक असल्याचे मान्य केले.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकVotingमतदान