शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 18:56 IST

Rahul Gandhi Vote Chori Prashant Kishor: विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन मतचोरीचा दावा करत आणखी एक बॉम्ब फोडला. राहुल गांधींनी हरयाणा विधानसभा निवडणुकीबद्दल केलेल्या दाव्यावर बोलताना प्रशांत किशोर यांनी सल्ला दिला. 

गेल्या हरयाणा विधानसभा निवडणूक झाली. निवडणुकीच्या निकालापर्यंत सत्तांतर होईल, अशा अंदाज मांडले जात होते. पण, निकाल धक्का देणारे लागले. याच निवडणुकीत मतचोरी झाल्याचा दावा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. त्यांनी बिहारमध्येही हे घडेल अशी भीती व्यक्त केली. राहुल गांधी यांच्या भूमिकेवर जन सुराज्य पक्षाचे अध्यक्ष प्रशांत किशोर यांनी भूमिका मांडली. 

राहुल गांधी यांच्या मत चोरीच्या मुद्द्यावर त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना प्रशांत किशोर म्हणाले, "राहुल गांधी विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्याकडे ताकद आहे. त्यांनी लढले पाहिजे. विरोधी पक्षाच्या लोकांना हे सांगितले पाहिजे. त्यांनी निवडणूक आयोगाला घेरले पाहिजे आणि कायदेशीर पावले उचलली पाहिजेत."

"राहुल गांधी विरोधी पक्षनेता म्हणून जे प्रश्न निवडणूक प्रक्रियेबद्दल उपस्थित करत आहेत, त्याची उत्तरे निवडणूक आयोगाने द्यायला हवी", अशी भूमिकाही त्यांनी मांडली. 

बिहारमध्ये मतचोरी हा मुद्दा नाहीये. इथे स्थलांतर, भ्रष्टाचार आणि शिक्षण हे निवडणुकीचे मुद्दे आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

हरयाणात 25 लाख बोगस मते

विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत दावा केला की, हरयाणामध्ये पाच श्रेणींमध्ये एकूण 25 लाख बनावट मते पडली, म्हणजेच दर आठपैकी एक मतदार बोगस होता. 5,21,000 पेक्षा जास्त बोगस मतदार आढळून आले. याचपद्धतीने राज्यात एकूण 2 कोटी मतदारांमध्ये 25 लाख मतांची चोरी झाली आहे.

एका महिलेचे मतदार म्हणून 223 वेळा नाव 

राहुल गांधींनी एक धक्कादायक दावा केला. एका बूथवर एकाच महिलेला 223 वेळा मतदार यादीत दाखवले गेले आहे. त्या महिलेने खरोखर किती वेळा मतदान केले? निवडणूक आयोगाने याचे उत्तर द्यायला हवे. सीसीटीव्ही फुटेज जाणीवपूर्वक डिलीट करण्यात आले, जेणेकरून खरी माहिती समोर येऊ नये. ही संपूर्ण मत चोरी भाजपला फायदा मिळवून देण्यासाठी करण्यात आली होती, असा आरोप त्यांनी केला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Prashant Kishor advises Rahul Gandhi to fight against alleged vote theft.

Web Summary : Prashant Kishor urged Rahul Gandhi to fight alleged vote theft, questioning Haryana election integrity. He emphasized that election commission should address concerns about the electoral process, while clarifying that Bihar's issues are different.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीPrashant Kishoreप्रशांत किशोरElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगharyana assembly election 2024हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४