शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

India China Faceoff : कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार, लष्कर प्रमुख नरवणेंचा चीनला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 13:24 IST

चीनच्या सीमेवर तैनात असलेल्या भारतीय जवानांचा विश्वास दुणावलेला असून, कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी ते पूर्णपणे तयार आहेत.

वास्तविक नियंत्रण रेषे(LAC)वर भारताचा चीनशी तणाव वाढत आहे. त्याचदरम्यान भारताचे लष्कर प्रमुख जनरल एम. एम. नरवणे म्हणाले की, भारताने आपली सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सीमेवर पर्याप्त सैन्य तैनात केलं आहे. लेह-लडाखला भेट देणारे जनरल नरवणे यांनी वृत्तसंस्था एएनआयशी बातचीत केली आहे.  ते म्हणाले, चीनच्या सीमेवर तैनात असलेल्या भारतीय जवानांचा विश्वास दुणावलेला असून, कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी ते पूर्णपणे तयार आहेत.भारत सर्व परिस्थितीला तोंड देण्यास सक्षमलष्कर प्रमुख म्हणतात, 'मी लेहला पोहोचलो आणि बर्‍याच ठिकाणी भेट दिली. मी अधिकारी व जेसीओशी बोललो व तयारीचा आढावा घेतला. जवानांचा आत्मविश्वास वाढलेला आहे आणि ते सर्व प्रकारच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहेत. ते म्हणाले, 'एलएसीची परिस्थिती थोडीशी तणावपूर्ण आहे. या परिस्थितीचा विचार करता आम्ही आमच्या सुरक्षिततेसाठी खबरदारी म्हणून जवान तैनात केले आहेत, जेणेकरून आपल्या सुरक्षिततेवर आणि अखंडतेवर परिणाम होणार नाही.जगातील सर्वात हुशार सैन्य: लष्कर प्रमुखनरवणे यांनी पुन्हा यावर जोर दिला की, एलएसीवर तैनात केलेल्या लष्कराच्या जवानांचे मनोबल खूपच उंचावलेले आहे. ते म्हणाले, 'ते खूप प्रेरित झाले आहेत. त्यांचे मनोबल उंचावले आहे आणि ते समोर उद्भवणार्‍या सर्व प्रकारच्या परिस्थितींचा सामना करण्यास तयार आहेत. आमचे अधिकारी आणि जवान हे जगातील सर्वात हुशार आहेत आणि त्याचा सैन्यच नव्हे तर देशाला अभिमान आहे. लष्कर प्रमुख गुरुवारी चुशुल सेक्टर येथे पोहोचले आणि तेथील संरक्षण तयारीचा आढावा घेतला आणि ते आज दिल्लीत परत येणार आहेत.एलएसीवर दोन्ही देश आमनेसामने आहेतपूर्व लडाखमधील चुशुल सेक्टरमध्ये चीननं मोठ्या प्रमाणात सैन्य तैनाती केली आहे. चिनी सैन्याच्या कोणत्याही धाडसी प्रयत्नांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने आपल्या मोर्चावर बरेच सैन्य लावले आहे. या भागात दोन्ही देशांनी सैन्य, टाक्या, शस्त्रे वाहने आणि हॉविझर्स तोफा मोठ्या संख्येने तैनात केल्या आहेत.एअर चीफ यांनीही घेतला तयारीचा आढावा तणावाच्या दरम्यान भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल आर. के. एस. भदौरिया यांनी हशिमारा (Hashimara)सह लडाख ते अरुणाचल प्रदेशपर्यंत 3,488 किमी लांबीच्या वास्तविक नियंत्रण रेषेवरच्या लष्करी विमानतळांची पाहणी केली.चर्चेचा दरवाजा अद्यापही खुलाLACवरील अत्यंत कठोर परिस्थितीशी दोन्ही देशांनी लष्करी संभाषणाचा मार्ग खुला केला आहे. ब्रिगेडियर स्तरावरील चर्चेची चौथी फेरी गुरुवारी चुशुल-मोल्डो सीमास्थळावर झाली. यावेळी देखील संभाषणातून कोणताही तोडगा निघालेला नाही. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानindia china faceoffभारत-चीन तणाव