शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

India China Faceoff : कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार, लष्कर प्रमुख नरवणेंचा चीनला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 13:24 IST

चीनच्या सीमेवर तैनात असलेल्या भारतीय जवानांचा विश्वास दुणावलेला असून, कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी ते पूर्णपणे तयार आहेत.

वास्तविक नियंत्रण रेषे(LAC)वर भारताचा चीनशी तणाव वाढत आहे. त्याचदरम्यान भारताचे लष्कर प्रमुख जनरल एम. एम. नरवणे म्हणाले की, भारताने आपली सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सीमेवर पर्याप्त सैन्य तैनात केलं आहे. लेह-लडाखला भेट देणारे जनरल नरवणे यांनी वृत्तसंस्था एएनआयशी बातचीत केली आहे.  ते म्हणाले, चीनच्या सीमेवर तैनात असलेल्या भारतीय जवानांचा विश्वास दुणावलेला असून, कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी ते पूर्णपणे तयार आहेत.भारत सर्व परिस्थितीला तोंड देण्यास सक्षमलष्कर प्रमुख म्हणतात, 'मी लेहला पोहोचलो आणि बर्‍याच ठिकाणी भेट दिली. मी अधिकारी व जेसीओशी बोललो व तयारीचा आढावा घेतला. जवानांचा आत्मविश्वास वाढलेला आहे आणि ते सर्व प्रकारच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहेत. ते म्हणाले, 'एलएसीची परिस्थिती थोडीशी तणावपूर्ण आहे. या परिस्थितीचा विचार करता आम्ही आमच्या सुरक्षिततेसाठी खबरदारी म्हणून जवान तैनात केले आहेत, जेणेकरून आपल्या सुरक्षिततेवर आणि अखंडतेवर परिणाम होणार नाही.जगातील सर्वात हुशार सैन्य: लष्कर प्रमुखनरवणे यांनी पुन्हा यावर जोर दिला की, एलएसीवर तैनात केलेल्या लष्कराच्या जवानांचे मनोबल खूपच उंचावलेले आहे. ते म्हणाले, 'ते खूप प्रेरित झाले आहेत. त्यांचे मनोबल उंचावले आहे आणि ते समोर उद्भवणार्‍या सर्व प्रकारच्या परिस्थितींचा सामना करण्यास तयार आहेत. आमचे अधिकारी आणि जवान हे जगातील सर्वात हुशार आहेत आणि त्याचा सैन्यच नव्हे तर देशाला अभिमान आहे. लष्कर प्रमुख गुरुवारी चुशुल सेक्टर येथे पोहोचले आणि तेथील संरक्षण तयारीचा आढावा घेतला आणि ते आज दिल्लीत परत येणार आहेत.एलएसीवर दोन्ही देश आमनेसामने आहेतपूर्व लडाखमधील चुशुल सेक्टरमध्ये चीननं मोठ्या प्रमाणात सैन्य तैनाती केली आहे. चिनी सैन्याच्या कोणत्याही धाडसी प्रयत्नांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने आपल्या मोर्चावर बरेच सैन्य लावले आहे. या भागात दोन्ही देशांनी सैन्य, टाक्या, शस्त्रे वाहने आणि हॉविझर्स तोफा मोठ्या संख्येने तैनात केल्या आहेत.एअर चीफ यांनीही घेतला तयारीचा आढावा तणावाच्या दरम्यान भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल आर. के. एस. भदौरिया यांनी हशिमारा (Hashimara)सह लडाख ते अरुणाचल प्रदेशपर्यंत 3,488 किमी लांबीच्या वास्तविक नियंत्रण रेषेवरच्या लष्करी विमानतळांची पाहणी केली.चर्चेचा दरवाजा अद्यापही खुलाLACवरील अत्यंत कठोर परिस्थितीशी दोन्ही देशांनी लष्करी संभाषणाचा मार्ग खुला केला आहे. ब्रिगेडियर स्तरावरील चर्चेची चौथी फेरी गुरुवारी चुशुल-मोल्डो सीमास्थळावर झाली. यावेळी देखील संभाषणातून कोणताही तोडगा निघालेला नाही. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानindia china faceoffभारत-चीन तणाव