शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

PM मोदींच्या हस्ते विश्वकर्मा योजनेचा प्रारंभ;३ लाखांपर्यंत मिळणार कर्ज,१८ व्यवसायांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2023 14:58 IST

विश्वकर्मा योजनेंतर्गत, सरकार १३,००० कोटी रुपये खर्च करणार आहे.

नवी दिल्ली: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७३वा वाढदिवस आहे. नरेंद्र मोदींनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज देशातील नागरिकांना भेट देत 'विश्वकर्मा योजना' सुरु केली आहे. या योजनेची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्प २०२३-२४ मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या महिन्यातच मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मंजुरीही देण्यात आली होती. विश्वकर्मा योजनेंतर्गत, सरकार १३,००० कोटी रुपये खर्च करणार आहे, ज्याद्वारे पारंपारिक कौशल्य असलेल्या लोकांना मदत मिळणार आहे.

पंतप्रधान विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून सोनार, लोहार, नाभिक आणि चांभार यांसारखी पारंपारिक कौशल्ये असलेल्या लोकांना अनेक प्रकारे लाभ मिळणार आहेत. या योजनेंतर्गत या लोकांना पहिल्या टप्प्यात १ लाख रुपयांपर्यंत आणि दुसऱ्या टप्प्यात २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाईल आणि तेही केवळ ५ टक्के सवलतीच्या व्याजदरात. ​​याशिवाय उत्पादने आणि कारागीर यांच्या सेवांचा विश्वकर्मा योजनेत समावेश केला जाईल. गुणवत्ता, सुधारणा आणि देशांतर्गत आणि जागतिक स्तरावर या उत्पादनांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचण्याची व्याप्ती वाढवण्यावर भर दिला जाईल.

सरकारने सुरू केलेल्या या योजनेंतर्गत दिलेल्या कर्ज तपशीलवार समजून घेतल्यास, एकूणच या योजनेत ३ लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याची तरतूद आहे. पहिल्या टप्प्यात लाभार्थ्याला व्यवसाय करण्यासाठी १ लाख रुपयांचे कर्ज दिले जाईल आणि व्यवसाय सुरू झाल्यावर दुसऱ्या टप्प्यात व्यवसायाचे आयोजन आणि विस्तार करण्यासाठी सरकार २ लाख रुपयांचे कर्ज दिले जाईल. या योजनेंतर्गत, कारागिरांना डिजिटल व्यवहारांमध्ये प्रोत्साहन आणि बाजार समर्थन देखील प्रदान केले जाणार आहे. सरकार या योजनेवर ५ वर्षांत १३ हजार कोटी रुपये खर्च करणार असून त्याचा ३० लाख कुटुंबांना त्याचा थेट फायदा होणार  आहे.

या योजनेत १८ व्यवसायांचा समावेश-

सरकारने या योजनेत १८ पारंपारिक कौशल्य व्यवसायांचा समावेश केला आहे, ज्यामुळे संपूर्ण भारतातील ग्रामीण आणि शहरी भागात उपस्थित कारागीर आणि कारागीरांना मदत होईल. यामध्ये सुतार, होडी बनवणारे, लोहार, कुलूप, सोनार, मातीची भांडी आणि इतर वस्तू बनवणारे कुंभार, शिल्पकार, गवंडी, माशांचे जाळे बनवणारे, खेळणी बनवणारे आणि इतरांचा समावेश होतो. केंद्र सरकारच्या उद्दिष्टाबाबत बोलताना, पंतप्रधान विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून कारागीर आणि कारागीरांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे आणि त्यांनी तयार केलेली स्थानिक उत्पादने, कला आणि हस्तकलेच्या माध्यमातून भारताची परंपरा आणि संस्कृती जिवंत ठेवणे हे सरकारचे लक्ष आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतbusinessव्यवसाय