शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Raj Thackeray: हनुमान चालीसा पठणावरून मनसे प्रमुख राज ठाकरे एकाकी?; हिंदु संघटनांनी घेतली माघार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 10:28 IST

ठाण्यातील उत्तर सभेत राज ठाकरेंनी ३ मे पर्यंत भोंगे हटवण्याचा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर औरंगाबादच्या सभेतही राज ठाकरेंनी पुन्हा इशारा देत सरकारला भोंगे हटवण्यास सांगितले.

नवी दिल्ली – मनसे अध्यक्ष राज ठाकरे(MNS Raj Thackeray) यांनी येत्या ३ मे पर्यंत मशिदीवरील भोंगे हटवले गेले नाहीत तर ४ तारखेपासून लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा पठण करा असं देशभरातील हिंदु बांधवांना आवाहन केले. मात्र त्यांच्या आवाहनानंतर विश्व हिंदू परिषदेनंतर प्रतिक्रिया देत राज ठाकरेंना एकाकी पाडलं आहे. मनसेच्या हनुमान चालीसा पठण कार्यक्रमात विश्व हिंदू परिषद सहभागी होणार नाही असं राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी म्हटलं आहे.

विनोद बन्सल यांनी सांगितले की, राज ठाकरे दुष्प्रचाराचं राजकारण करत आहेत. विश्व हिंदू परिषद ही राजकीय संघटना नाही. कुठल्याही पक्षाशी त्याचा संबंध नाही. त्यामुळे हनुमान चालीसा कार्यक्रमाच्या भूमिकेशी विंहिंप सहमत नाही. विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दलाने मनसेच्या हनुमान चालीसा कार्यक्रमाला पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळे हे वृत्त निराधार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या प्रखर हिंदुत्ववादी भूमिकेचं सर्व हिंदु संघटना स्वागत करतील असं मानलं जात होते. राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंगे याबाबत मुद्दा उपस्थित केला. राज ठाकरेंच्या या भाषणावरून मनसेच्या मुस्लीम पदाधिकाऱ्यांमध्येही नाराजी पसरली. अनेक पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र मनसे प्रमुख त्यांच्या विधानावर ठाम होते. ठाण्यातील उत्तर सभेत राज ठाकरेंनी ३ मे पर्यंत भोंगे हटवण्याचा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर औरंगाबादच्या सभेतही राज ठाकरेंनी पुन्हा इशारा देत सरकारला भोंगे हटवण्यास सांगितले.

राज ठाकरेंच्या विधानानंतर उत्तर प्रदेश गोवा, कर्नाटकसह इतर राज्यांत मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी हिंदु संघटना आक्रमक झाल्या. अनेक ठिकाणी जिल्हाधिकारी, पोलिसांना निवेदन देण्यात आली. उत्तर प्रदेशात योगी सरकारने ११ हजार भोंगे खाली उतरवले. योगी सरकारच्या या निर्णयाचं कौतुक राज ठाकरेंनी केले. औरंगाबादच्या सभेत जर उत्तर प्रदेशात भोंगे उतरवले जावू शकतात तर महाराष्ट्रात का नाही असा सवाल त्यांनी केला होता. येत्या ४ मे रोजी देशभरातील हिंदु बांधवांनी पोलीस परवानगी घेऊन मशिदीसमोर हनुमान चालीसा लाऊडस्पीकरवर लावावी असं आवाहन केले होते. मात्र विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दलसारख्या मोठ्या हिंदु संघटनांना यातून माघार घेत असतील तर राज ठाकरेंच्या आवाहनाला राज्याबाहेर किती प्रतिसाद मिळतो हे पाहणं गरजेचे आहे.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेHinduहिंदूMNSमनसे