शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

भारतीय वटवाघळांतील विषाणूंचा सध्याच्या साथीशी संबंध नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 03:44 IST

आयसीएमआर : हजार वर्षातून एकदाच वटवाघळातून माणसात कोरोना विषाणूचे संक्रमण

नवी दिल्ली : भारतातील वटवाघळांमध्ये सापडलेल्या कोरोना विषाणूंचा सध्या पसरलेल्या साथीशी काहीही संबंध नाही, असे इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) संस्थेने गुरुवारी स्पष्ट केले. यासंदर्भात आयसीएमआरचे अध्यक्ष डॉ. रमण गंगाखेडकर म्हणाले, ‘‘देशात वटवाघळांच्या दोन प्रजातींमध्ये कोरोनाचे विषाणू आढळून आले. मात्र माणसांना हानी पोहोचविण्याची क्षमता त्या विषाणूंमध्ये नव्हती, असे आयसीएमआरला तपासणीअंती लक्षात आले.’’

केरळ, तमिळनाडू, हिमाचल प्रदेश ही तीन राज्ये व पुडुचेरी हा केंद्रशासित प्रदेश अशा चार ठिकाणी दोन प्रकारच्या वटवाघळांमध्ये कोरोनाचे विषाणू आढळून आले होते. वटवाघळांतून कोरोनाच्या विषाणूचे माणसात संक्रमण होणे, ही अत्यंत दुर्मीळ घटना आहे. ती दर हजार वर्षांतून फक्त एकदाच घडण्याची शक्यता असते, अशी माहिती आयसीएमआरच्या एका पाहणी अहवालात देण्यात आली.कोविड-१९च्या उगमाबाबत २ शक्यताडॉॅ. गंंगाखेडकर यांनी सांगितले की, चीनमधून कोविड-१९ या साथीच्या आजाराचा उगम कसा झाला असावा, याबद्दल जगभरात झालेल्या अभ्यासातून दोन शक्यता दिसून आल्या. वटवाघळांमध्ये कोरोनाचे विषाणू आढळून येतात. माणसात संक्रमित होतील, असे कोरोनाचे विषाणू वटवाघुळाच्या शरीरात एकतर तयार झाले असावेत किंवा खवल्या मांजराच्या शरीरातील विषाणूंनी वटवाघळाच्या शरीरात प्रवेश करून मग त्यांचे संक्रमण मानवी शरीरात झाले असावे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत