शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

विरप्पा मोईलींचे मोठे वक्तव्य; काँग्रेसमध्ये 'सर्जरी'ची आवश्यकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 12:57 IST

राहुल यांनी पक्षाचे उत्तम पद्धतीने नेतृत्व केले. काँग्रेसला त्याचा लाभ घेता आला नाही. काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल अशी स्थिती राहुल यांनी निर्माण केली होती. त्यांचं नेतृत्व निवडणुकीच्या वेळी आणि निवडणुकीपूर्वी चांगले होते तर आता का नाही, असा सवालची मोईली यांनी उपस्थित केला.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर अनेक राज्यातील काँग्रेस नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे देशातील सर्वात जुन्या पक्षाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. त्यातच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीयमंत्री विरप्पा मोईली यांनी काँग्रेस पक्षाला मोठ्या सर्जरीची गरज व्यक्त केली आहे.

मोईली म्हणाले की, काँग्रेसला १३५ वर्षांचा इतिहास आहे. अनेकदा लोकांनी काँग्रेसचे अस्तित्व संपल्याचा दावा केला आहे. मात्र प्रत्येकवेळी ते चुकीचे ठरले आहेत. इंग्रजांनी देखील काँग्रेस संपल्याचा दावा केला होता. परंतु, त्यानाच भारत सोडून पळून जावं लागलं आहे. १९७७ मध्ये इंदिरा गांधी यांच्या पराभवानंतर काँग्रेस संपली असं अनेकजण म्हणत होते. तरी देखील आम्ही पुन्हा एकदा सत्तेत परतलो. लोक इतिहास विसरून काँग्रेस संपल्याचा दावा करतात. निश्चितच काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. परंतु, काँग्रेस पुनरागमन नक्की करणार, असा विश्वास देखील मोइली यांनी व्यक्त केला.

राहुल यांच्या नेतृत्वावर उपस्थित केलेल्या प्रश्नावर मोईली यांनी प्रतिक्रिया दिली. राहुल यांनी पक्षाचे उत्तम पद्धतीने नेतृत्व केले. काँग्रेसला त्याचा लाभ घेता आला नाही. काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल अशी स्थिती राहुल यांनी निर्माण केली होती. त्यांचं नेतृत्व निवडणुकीच्या वेळी आणि निवडणुकीपूर्वी चांगले होते तर आता का नाही, असा सवालची मोईली यांनी उपस्थित केला.

दरम्यान पराभवाचे उत्तर देण्याची राहुल यांची जबाबदारी नसून काँग्रेसच्या इतर नेत्यांची आहे. ज्या राज्यांत आम्ही पराभूत झालो, तेथील प्रभारी आणि प्रदेशाध्यक्षांची जबाबदारी निश्चित व्हावी. इतर नेत्यांनी देखील नैतिक जबाबदारी घ्यावी, असं मोईली यांनी म्हटले. तसेच दारुण पराभव आणि अंतर्गत कलहाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये मोठी सर्जरी करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.