शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

विरप्पा मोईलींचे मोठे वक्तव्य; काँग्रेसमध्ये 'सर्जरी'ची आवश्यकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 12:57 IST

राहुल यांनी पक्षाचे उत्तम पद्धतीने नेतृत्व केले. काँग्रेसला त्याचा लाभ घेता आला नाही. काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल अशी स्थिती राहुल यांनी निर्माण केली होती. त्यांचं नेतृत्व निवडणुकीच्या वेळी आणि निवडणुकीपूर्वी चांगले होते तर आता का नाही, असा सवालची मोईली यांनी उपस्थित केला.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर अनेक राज्यातील काँग्रेस नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे देशातील सर्वात जुन्या पक्षाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. त्यातच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीयमंत्री विरप्पा मोईली यांनी काँग्रेस पक्षाला मोठ्या सर्जरीची गरज व्यक्त केली आहे.

मोईली म्हणाले की, काँग्रेसला १३५ वर्षांचा इतिहास आहे. अनेकदा लोकांनी काँग्रेसचे अस्तित्व संपल्याचा दावा केला आहे. मात्र प्रत्येकवेळी ते चुकीचे ठरले आहेत. इंग्रजांनी देखील काँग्रेस संपल्याचा दावा केला होता. परंतु, त्यानाच भारत सोडून पळून जावं लागलं आहे. १९७७ मध्ये इंदिरा गांधी यांच्या पराभवानंतर काँग्रेस संपली असं अनेकजण म्हणत होते. तरी देखील आम्ही पुन्हा एकदा सत्तेत परतलो. लोक इतिहास विसरून काँग्रेस संपल्याचा दावा करतात. निश्चितच काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. परंतु, काँग्रेस पुनरागमन नक्की करणार, असा विश्वास देखील मोइली यांनी व्यक्त केला.

राहुल यांच्या नेतृत्वावर उपस्थित केलेल्या प्रश्नावर मोईली यांनी प्रतिक्रिया दिली. राहुल यांनी पक्षाचे उत्तम पद्धतीने नेतृत्व केले. काँग्रेसला त्याचा लाभ घेता आला नाही. काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल अशी स्थिती राहुल यांनी निर्माण केली होती. त्यांचं नेतृत्व निवडणुकीच्या वेळी आणि निवडणुकीपूर्वी चांगले होते तर आता का नाही, असा सवालची मोईली यांनी उपस्थित केला.

दरम्यान पराभवाचे उत्तर देण्याची राहुल यांची जबाबदारी नसून काँग्रेसच्या इतर नेत्यांची आहे. ज्या राज्यांत आम्ही पराभूत झालो, तेथील प्रभारी आणि प्रदेशाध्यक्षांची जबाबदारी निश्चित व्हावी. इतर नेत्यांनी देखील नैतिक जबाबदारी घ्यावी, असं मोईली यांनी म्हटले. तसेच दारुण पराभव आणि अंतर्गत कलहाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये मोठी सर्जरी करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.