शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
4
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
5
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
6
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
7
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
8
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
9
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
10
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
12
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
13
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
14
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
15
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
16
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
17
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
18
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
19
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
20
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी

पश्चिम बंगाल, तामिळनाडूमध्ये हिंसाचार, लाठीमार, गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 04:55 IST

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये मतदानाला हिंसाचाराचे गालबोट लागले.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये मतदानाला हिंसाचाराचे गालबोट लागले. एका जमावाने माक्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार मोहम्मद सलिम यांच्या वाहनावर दगडफेक केल्याने त्यांना एका मतदान केंद्रात जाऊन बसावे लागले, तर वाहनचालक घाबरून पळून गेला. त्यानंतर ते वाहन पेटवून देण्यात आले.बंगालमधील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३१ वर चोपरा विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रात जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी आधी अश्रुधूर सोडला आणि नंतर हवेत गोळीबारही केला. यात कोणीही जखमी झाले नाही. तेथील एका गावातील मतदार मतदान करण्यासाठी निघाले असता, त्यांना विशिष्ट पक्षाच्या लोकांनी जाण्यापासून अडवले आणि परत घरी जाण्यास सांगितले. त्यामुळे संतापलेल्या लोकांनी रस्ता अडवून ठेवला. त्यांना पांगवण्याचा प्रयत्न पोलीस करीत असताना, त्यांच्यावर काही मंडळींनी क्रूड बॉम्बही फेकले. त्यामुळे स्वसंरक्षणासाठी आणि जमावाला हटवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला.तरीही जमाव जाण्यास तयार नसल्याचे लक्षात येताच, पोलिसांनी हवेत गोळीबार केला आणि शीघ्र कृती दलालाही पाचारण केले. त्यानंतर मात्र तो जमाव निघून गेला. रायगंज मतदारसंघाच्या क्षेत्रात एका जमावाने स्थानिक वृत्तवाहिनीच्या पत्रकारालाही मारहाण केली. पोलीस तिथे लगेच पोहोचले. त्यामुळे पत्रकाराची सुटका झाली. मात्र त्याला फार मारलागला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.जम्मू-काश्मीरमधील उधमपूर व श्रीनगर मतदारसंघांमध्येही आज मतदान झाले. उधमपूरमध्ये ६५ टक्क्यांहून अधिक मतदारांनी आपला हक्क बजावला. श्रीनगरमध्ये मात्र सुमारे १६ टक्के मतदान झाल्याचे वृत्त आहे. तिथे सकाळपासूनच अतिशय संथ गतीने मतदान सुरू होते. सकाळी ११ वाजेपर्यंत जेमतेम २ ते ३ टक्केच मतदान झाले होते. सकाळी महिला मतदारच प्रामुख्याने मतदानासाठी बाहेर पडल्याचे दिसत होते. मतदानाच्या काळात काश्मीर खोºयात हिंसाचार मात्र झाला नाही.>कार्यकर्ते भिडलेतामिळनाडूच्या वेल्लोर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक रद्द केली असली तरी तेथील अंबुर व गुडियातम विधानसभा मतदारसंघात मतदान झाले. या दोन्ही ठिकाणी अण्णा द्रमुक व एएमएमकेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. त्यामुळे पोलिसांना लाठीमार करून त्या जमावाला पांगवावे लागले. तिथे निमलष्करी दलांना हवेत गोळीबार करावा लागल्याचे सांगण्यात आले. त्याआधी सकाळी अण्णाद्रमुकवर बुथ बळकावून खोटे मतदान केल्याचा आरोप द्रमुकचे सरचिटणीस एम. के. स्टॅलिन यांनी केला होता. मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी याचा इन्कार केला. कुठेही बुथ बळकावण्याचे प्रकार झालेले नाहीत, असे अधिकाºयांनी सांगितले. तामिळनाडूत मतदानाला आलेले तीन वृद्ध मरण पावल्याचे वृत्त आहे.

टॅग्स :West Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMamata Banerjeeममता बॅनर्जी