शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

ट्रॅक्टर रॅलीत हिंसाचार, रात्री उशिरा मोठ्या कारवाईची शक्यता; अनेक शेतकरी नेते भूमिगत

By बाळकृष्ण परब | Updated: January 26, 2021 23:57 IST

Violence at tractor rally Update : शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनानंतर सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये आहे. या हिंसाचाराची दखल गृहमंत्रालयाने घेतली असून, रात्री उशिरा मोठ्या कारवाईची शक्यता आहे.

नवी दिल्ली - केंद्र सरकाराने पारित केलेल्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीत मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला. काही आंदोलकांनी थेट लाल किल्ल्यापर्यंत धडक देत तेथील ध्वजस्तंभावर धार्मिक ध्वज फडकवला होता. दरम्यान, या हिंसक आंदोलनानंतर सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये आहे. या हिंसाचाराची दखल गृहमंत्रालयाने घेतली असून, रात्री उशिरा मोठ्या कारवाईची शक्यता आहे.ट्रॅक्टर परेडमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर केंद्रीय गृहसचिवांनी गृहमंत्री अमित शाह यांना दिल्लीतील परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून रात्री उशिरा मोठी कारवाई करण्यात येण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे. या हिंसक आंदोलनानंतर अनेक शेतकरी नेते रडारवर असून, सिंघू बॉर्डरवरसुद्धा ट्रॅक्टर मोर्चानंतर अनेक प्रमुख शेतकरी नेते दिसून आळेले नाहीत.दिल्ली पोलिसांनीही शेतकऱ्यांनी केलेले आंदोलन हे उग्र आणि हिंसक असल्याचे म्हटले आहे. तसेच काही अधिकाऱ्यांसह सुमारे ८३ पोलीस या हिंसाचारात जखमी झाल्याचे म्हटले आहे.दरम्यान, परिस्थितीचे गांभीर्य विचारात घेऊन केंद्र सरकारने खबरदारी म्हणून निमलष्करी दल तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय राजधानीच्या क्षेत्रात शांतता कायम राखण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त केंद्रीय बलांची तैनाती करण्यात येणार आहे. तर दिल्ली नजिकच्या हरियाणामधील अनेक जिल्ह्यांमध्ये इंटरनेट आणि एसएमएस सेवा बंद करण्याचा कालावधी वाढवण्यात आला आहे. सरकारने दिलेल्या आदेशांनुसार सोनीपत, पलवल आणि झज्जर जिल्ह्यांमध्ये अफवांना रोखण्यासाठी बुधवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत इंटरनेट आणि एसएमएस सेवांना स्थगिती दिली जाईल.

टॅग्स :Farmerशेतकरीdelhiदिल्लीCentral Governmentकेंद्र सरकार