शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

प्रजासत्ताकदिनी झालेला हिंसाचार, राष्ट्रध्वजाचा अपमान अतिशय दुर्भाग्यपूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2021 06:31 IST

राष्ट्रपतींनी व्यक्त केली खंत; नवीन कृषी कायद्यांचे केले समर्थन

नवी दिल्ली : प्रजासत्ताकदिनी दिल्लीत झालेला हिंसाचार तसेच तिरंगा राष्ट्रध्वजाचा करण्यात आलेला घोर अपमान ही अतिशय दुर्भाग्यपूर्ण घटना आहे, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रारंभी केलेल्या अभिभाषणात शुक्रवारी म्हटले आहे. नवीन तीन कृषी कायद्यांचे राष्ट्रपतींनी जोरदार समर्थन केले.

ते म्हणाले की, नवीन तीन कृषी कायद्यांमुळे १० कोटी छोट्या शेतकऱ्यांना त्वरित फायदे मिळाले आहेत. या कायद्यांना विविध राजकीय पक्षांनी याआधी पाठिंबाच दिला होता. दिल्लीमध्ये प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चामध्ये जो हिंसाचार झाला, त्याचे समर्थनच होऊ शकत नाही. राज्यघटनेने आपल्याला विचारस्वातंत्र्य दिले आहे; मात्र कायदे व नियमांचे प्रत्येकाने पालन केलेच पाहिजे, हेही राज्यघटनेने सांगितले आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर सुमारे २० विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला होता. नवीन तीन कृषी कायदे रद्द करा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी चालविलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्षांनी ही कृती केली. काँग्रेसचे खासदार रवनीतसिंग बिट्टू यांनी राष्ट्रपतींचे अभिभाषण सुरू असताना सभागृहात जय जवान जय किसान, अशी घोषणा दिली व नवे कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली. 

‘कृषी व्यवस्थांना धक्का लागलेला नाही’राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने नव्या कृषी कायद्यांना स्थगिती दिली असून, न्यायालय जो निर्णय घेईल त्याचा सरकार आदरच करेल. नव्या कृषी कायद्यांच्या आधीपासून प्रचलित असलेल्या कोणत्याही कृषी व्यवस्थांना या कायद्यांमुळे धक्का लागलेला नाही, हेही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आवर्जून सांगितले.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपRamnath Kovindरामनाथ कोविंद