शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

हिंसा घडवणं पूर्वनियोजित कट, यात राजकीय पक्षाचे लोक सामील; शेतकरी नेते टिकैत यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2021 16:13 IST

शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी शेतकरी आंदोलनात काही राजकीय पक्षाचे लोक सामील झाले असून त्यांनी हिंसा घडवल्याचा आरोप केला आहे.

नव्या कृषी कायद्यांच्याविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये ठिकठिकाणी पोलीस आणि शेतकरी आंदोलकांमध्ये झटापट झाली आहे. रॅलीचा मार्गसोडून काही आंदोलकांनी लाल किल्ल्यावर कब्जा केला, तर काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना झाल्या आहेत. पण यावरुन आता राजकारणाला सुरुवात झाली आहे. 

भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी शेतकरी आंदोलनात काही राजकीय पक्षाचे लोक सामील झाले असून त्यांनी हिंसा घडवल्याचा आरोप केला आहे. "पोलीस आम्हाला संपूर्ण सहकार्य करत होते आणि आहेत. पण काही आंदोलकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे आणि ते निर्माण करण्याचा पूर्वनियोजित कट केला गेला होता", असा आरोप टिकैत यांनी केला आहे. 

Video : हिंसक शेतकऱ्यांच्या जमावातून 'त्या' वृद्धाने पोलिसाला सुखरूप काढले बाहेर

स्वराज इंडिया पक्षाचे संस्थापक योगेंद्र यादव यांनीही दिल्लीत तीन-चार ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्याचं म्हटलं आहे. पण संपूर्ण माहिती माझ्याकडे आलेली नाही. माध्यमांमध्ये हिंसाचार झाल्याचं दाखवलं जात आहे. त्याचीच माहिती माझ्याकडे आलेली आहे. रॅलीत सहभागी झालेल्या सर्व शेतकऱ्यांनी आपल्या नियोजित मार्गानेच शांततेनं मार्च काढावा, असं आवाहन योगेंद्र यादव यांनी केलं आहे. यासोबतच जे लोक आमच्या संघटनेचा भाग नाहीत. त्याच लोकांकडून हा हिंसाचार घडवला गेल्याची शक्यता आहे, असंही यादव म्हणाले. 

किसान एकता मार्चने ट्विट करुन हिंसा निर्माण करणं हा सरकारचा पूर्वनियोजित कट असल्याचा दावा केला आहे. शेतकरी नेत्यांनी दावा केला आहे की, "मोर्चाचा जो मार्ग होता, त्याबाबतची माहिती सर्वांपर्यंत पोहचली नसावी, काही शेतकऱ्यांमध्ये मोर्चाच्या मार्गाबाबत थोडा गोंधळ निर्माण झाला होता. परंतु त्या ठिकाणी झालेल्या हिंसेमागं सरकारचं मोठं राजकारण आहे"

लाल किल्ल्यावर आंदोलक शेतकऱ्यांचा कब्जा, फडकवला झेंडा

दरम्यान, दिल्लीत सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनी शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. तोडफोड आणि हिंसेतून मार्ग निघू शकत नाही. सर्वांना शांतता राखण्याचं मी आवाहन करतो आणि आजच्या दिवशी अशा अराजक घटनांसाठी नाही, असं ट्विट भाजप खासदार गौतम गंभीर यानं केलं आहे. तर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही ट्विट करत आंदोलक शेतकऱ्यांना शांततेचं आवाहन केलं आहे. 

Video : शेतकऱ्यांचा संघर्ष पेटला! शेतकरी आंदोलकाकडून पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न   

"शेतकरी आंदोलन आतापर्यंत शांततेच्या मार्गानेच झालं आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी शांतता राखावी असं मी आवाहन करतो. लोकशाहीमध्ये हिंसाचाराला स्थान नाही. शेतकरी आंदोलनात हिंसाचार झाला तर यातून शेतकरी आंदोलनाला अयशस्वी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींचा विजय होईल. त्यामुळे सर्वांनी शांतता राखावी", असं ट्विट गेहलोत यांनी केलं आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संपdelhiदिल्ली