शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

'हिंसा समस्याचं समाधान नाही, मोदी सरकारने कृषी कायदे वापस घ्यावेत'

By महेश गलांडे | Updated: January 26, 2021 15:33 IST

गेल्या 2 महिन्यांपेक्षा जास्त काळ कृषी कायदे रद्द करण्यात यावे या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहे. शेतकऱ्यांकडून आज दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली आहे.

ठळक मुद्देगेल्या 2 महिन्यांपेक्षा जास्त काळ कृषी कायदे रद्द करण्यात यावे या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहे. शेतकऱ्यांकडून आज दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली आहे.

नवी दिल्ली - राजधानीतील दिल्लीत आज ७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आलंय. परंतु, या रॅलीला आता हिंसक वळण लागले आहे. दिल्ली पोलिसांनी ठिकठिकाणी अडवल्यामुळे पोलीस आणि शेतकरी आंदोलकांमधील संघर्ष वाढत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांवर दगडफेक आणि ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर बचावात्मक पवित्रा पत्करत पोलिसांनी लाठीचार्ज करत अश्रुधुराचे नळकांडी फोडली. शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावर आपला मोर्चा वळवळा असून लाल किल्ल्यावरच किसान आंदोलनाच ध्वज फडकवला आहे. त्यामुळे, आंदोलनाल हिंसक वळण लागलंय. 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरु शेतकऱ्यांना हिंसक न होण्याचं आवाहन केलंय. तसेच, मोदी सरकारने त्वरीत हे तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावेत, असेही सूचवले आहे. राहुल यांनी ट्विट केले आहे की, हिंसा हे कुठल्याच समस्येचं समाधान नाही. इजा कोणालाही होऊ द्या, नुकसान आपल्याच देशाचं होणार आहे. देशाच्या हितासाठी कृषी विरोधी कायदे माघारी घ्या, असे राहुल यांनी आपल्या टिवटर अकाऊंटवरुन म्हटलंय. 

गेल्या 2 महिन्यांपेक्षा जास्त काळ कृषी कायदे रद्द करण्यात यावे या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहे. शेतकऱ्यांकडून आज दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली आहे. मात्र, काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पाहण्यास मिळाले आहे. दिल्लीमधील आयटीओ परिसरात पोलीस आणि शेतकऱ्यांमधील संघर्ष पेटला आहे. एका आंदोलकाने वेगाने ट्रॅक्टर आणत रस्त्यावर उभ्या पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. लाल किल्ला परिसरात आंदोलक नियंत्रणाबाहेर गेल्याचं चित्र असून तलवार आणि काठ्या घेऊन पोलिसांचा पाठलाग करतानाचं दृश्य पहायला मिळत आहे. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून दिल्लीच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राजपथावरील संचलन (परेड) पार पडल्यानंतर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यास शेतकऱ्यांना परवानगी आहे. 

तीन वेगवेगळ्या ठिकाणांहून मार्गक्रमण करणाऱ्या मोर्चात २.५ लाख ट्रॅक्टरसह ५ लाख शेतकरी सहभागी होतील, असा दावा संयुक्त किसान मोर्चाने केला होता. मात्र, मोर्चात फक्त ५ हजार ट्रॅक्टर आणि तितच्याच संख्येने आंदोलकांच्या सहभागाची परवानगी दिल्ली पोलिसांनी दिली आहे. तीनही मोर्चे दुपारी १२ ते संध्याकाळी ५ या वेळेत काढले जाणार होते. पोलिसांनीही शेतकऱ्यांवर लाठीमार केला असून अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत. त्यामुळेच, शेतकरी आक्रमक झाल्याचे बोलले जात आहे. गेल्या 2 महिन्यांपासून शेतकऱ्यांचे अतिशय संयमी आणि अहिंसक आंदोलन होते. मात्र, शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटल्यानं दिल्लीतील आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीFarmerशेतकरीdelhiदिल्लीRepublic Dayप्रजासत्ताक दिनFarmer strikeशेतकरी संप