शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

धर्माच्या नावाने हिंसाचार कदापि चालू देणार नाही, पंतप्रधान मोदींनी दिला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 06:54 IST

नवी दिल्ली : धर्माच्या नावाने हिंसाचार बिलकूल खपवून घेतला जाणार नाही. कायदा हाती घेणाºयांची गय केली जाणार नाही, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम यांना हरियाणा येथील पंचकुला येथील न्यायालयाने आश्रमातील एका महिला साध्वीवर बलात्कार केल्याच्या खटल्यात दोषी ठरविल्यानंतर त्या पंथाच्या अनुयायांनी ...

नवी दिल्ली : धर्माच्या नावाने हिंसाचार बिलकूल खपवून घेतला जाणार नाही. कायदा हाती घेणाºयांची गय केली जाणार नाही, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम यांना हरियाणा येथील पंचकुला येथील न्यायालयाने आश्रमातील एका महिला साध्वीवर बलात्कार केल्याच्या खटल्यात दोषी ठरविल्यानंतर त्या पंथाच्या अनुयायांनी केलेल्या हिंसाचारात ३६ जण ठार झाले होते. त्यानंतर पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने ‘पंतप्रधान भाजपाचे नव्हेत तर देशाचे आहेत व मुख्यमंत्रीही पक्षाचे नसून हरियाणा राज्याचे आहेत,’ असे जळजळीत भाष्य केले होते.मोदी यांनी ३५ व्या ‘मन की बात’मध्ये याची विशेष दखल घेऊन वरीलप्रमाणे ग्वाही दिली. प्रत्येकाला कायद्यापुढे झुकावेच लागेल. दोषी कोण हे कायदा ठरवेल व जे कोणी दोषी ठरेल त्याला शिक्षा अवश्य होईल, असे त्यांनी सांगितले.तयार भाषणात सुधारणा?पंचकुला येथील हिंसाचार शुक्रवार दुपारनंतर झाला. त्यावर पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांवर उच्च न्यायालयाने शनिवारी ताशेरे ओढले. माहीतगार सूत्रांनुसार तोपर्यंत मोदींच्या ‘मन की बात’चे रेकॉर्डिंंग झालेले होते. प्रसारणापूर्वी तातडीने पुन्हा रेकॉर्डिंग करून हरियाणातील घटनांचा संदर्भ व त्याचा धिक्कार करणारा पहिला परिच्छेद नव्याने समाविष्ट केला गेला.अहिंसा परमो धर्म:भिन्न धर्मांचे उत्सव सुरू असताना देशाच्या एका भागातून हिंसाचाराच्या येणाºया बातम्या हा देशासाठी साहजिकच चिंतेचा विषय आहे, असे नमूद करून मोदी म्हणाले की, पूर्वजांनी शेकडो वर्षे सार्वजनिक जीवनमूल्यांचा व अहिंसेचा आदरपूर्वक स्वीकार केला. तो विचार आपल्या नसानसांत भिनलेला आहे. ‘अहिंसा परमो धर्म:’हे आपण ऐकत, सांगत आलो आहोत.कायदा हाती घेऊ नकास्वातंत्र्य दिनाच्या भाषणाचा संदर्भ देत मोदी म्हणाले की, श्रद्धेच्या नावाने हिंसा सहन केली जाणार नाही, हे मी त्याही वेळी सांगितले होते. मग ती श्रद्धा धर्माविषयी असो, राजकीय विचारसरणीची असो, व्यक्तीसंबंधी किंवा परंपरांविषयी आस्था असो. श्रद्धेच्या नावाखाली कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही व तसे कोेणालाही करू दिले जाणार नाही.