शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

Delhi Violence : भाजप नेत्याने पेटवली दिल्ली; मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबाचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 15:12 IST

भाजपचे नेते कपिल मिश्रा यांच्या प्रक्षोभक आवाहनानंतर ईशान्य दिल्लीत हिंसाचार भडकला असल्याचा आरोप हिंसाचारात मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबांनी केला आहे.

नवी दिल्ली : सीएए विरोधातील आंदोलनास दिल्ली येथे सोमवारी हिंसाचाराने तडा गेल्यानंतर मंगळवारी आगडोंब उसळला. या हिंसाचारात आतापर्यंत एका पोलिसासह 20 जणांचा बळी गेला आहे. तसेच 200 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. तर भाजपचे नेते कपिल मिश्रा यांच्या प्रक्षोभक आवाहनानंतर ईशान्य दिल्लीत हिंसाचार भडकला असल्याचा आरोप हिंसाचारात मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबांनी केला आहे.

दिल्लीच्या हिंसाचाराच्या घटनेतील मृतांची संख्या सातत्याने वाढत आहे. यामध्ये करावल नगर येथे दुकानातून समान आण्यासाठी गेलेल्या 26 वर्षीय राहुल सोळुंके या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर दिल्लीतील हिंसाचाराला भाजपचे नेते कपिल मिश्रा जवाबदार असल्याचा आरोप राहुलच्या वडिलांनी केला आहे.

राहुलचे वडील म्हणाले की, जर मिश्रा मौजपुरला गेले नसते तर, हिंसाचार वाढला नसता. मिश्रा यांनी मौजपुर येथे जाऊन प्रक्षोभक आवाहन केले, त्यांनतर हिंसाचाराला सुरवात झाली. त्यांनी आपल्या भाषणातून लोकांना भडकवण्याचं काम केलं. त्यामुळे दिल्लीतील सुरु असलेल्या जाळपोळीला ते जवाबदार असल्याचं ते म्हणाले.

तसेच राहुलच्या वडिलांनी सांगितले की, आपण हिंसाचार होण्याच्या एक दिवस अगोदर पोलिसांना फोन करून जाळपोळ होण्याची शक्यता असल्याची माहिती दिली होती. मात्र पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. तर एसीपी, डीसीपी यांना सुद्धा फोन केला, मात्र त्यांच्याकडूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी वेळीच हस्तक्षेप केला असता तर, माझा मुलगा मारला गेला नसता, असे म्हणत त्यांनी आपल्या अश्रुना वाट मोकळी करून दिली.

टॅग्स :delhi violenceदिल्लीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकdelhiदिल्ली