शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

Delhi Violence : भाजप नेत्याने पेटवली दिल्ली; मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबाचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 15:12 IST

भाजपचे नेते कपिल मिश्रा यांच्या प्रक्षोभक आवाहनानंतर ईशान्य दिल्लीत हिंसाचार भडकला असल्याचा आरोप हिंसाचारात मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबांनी केला आहे.

नवी दिल्ली : सीएए विरोधातील आंदोलनास दिल्ली येथे सोमवारी हिंसाचाराने तडा गेल्यानंतर मंगळवारी आगडोंब उसळला. या हिंसाचारात आतापर्यंत एका पोलिसासह 20 जणांचा बळी गेला आहे. तसेच 200 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. तर भाजपचे नेते कपिल मिश्रा यांच्या प्रक्षोभक आवाहनानंतर ईशान्य दिल्लीत हिंसाचार भडकला असल्याचा आरोप हिंसाचारात मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबांनी केला आहे.

दिल्लीच्या हिंसाचाराच्या घटनेतील मृतांची संख्या सातत्याने वाढत आहे. यामध्ये करावल नगर येथे दुकानातून समान आण्यासाठी गेलेल्या 26 वर्षीय राहुल सोळुंके या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर दिल्लीतील हिंसाचाराला भाजपचे नेते कपिल मिश्रा जवाबदार असल्याचा आरोप राहुलच्या वडिलांनी केला आहे.

राहुलचे वडील म्हणाले की, जर मिश्रा मौजपुरला गेले नसते तर, हिंसाचार वाढला नसता. मिश्रा यांनी मौजपुर येथे जाऊन प्रक्षोभक आवाहन केले, त्यांनतर हिंसाचाराला सुरवात झाली. त्यांनी आपल्या भाषणातून लोकांना भडकवण्याचं काम केलं. त्यामुळे दिल्लीतील सुरु असलेल्या जाळपोळीला ते जवाबदार असल्याचं ते म्हणाले.

तसेच राहुलच्या वडिलांनी सांगितले की, आपण हिंसाचार होण्याच्या एक दिवस अगोदर पोलिसांना फोन करून जाळपोळ होण्याची शक्यता असल्याची माहिती दिली होती. मात्र पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. तर एसीपी, डीसीपी यांना सुद्धा फोन केला, मात्र त्यांच्याकडूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी वेळीच हस्तक्षेप केला असता तर, माझा मुलगा मारला गेला नसता, असे म्हणत त्यांनी आपल्या अश्रुना वाट मोकळी करून दिली.

टॅग्स :delhi violenceदिल्लीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकdelhiदिल्ली