शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

भाजपच्या बंगाल बंददरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, रास्ता रोको

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 04:53 IST

भाजपने पुकारलेल्या बारा तासांच्या पश्चिम बंगाल बंददरम्यान काही जिल्ह्यांत दगडफेक, जाळपोळीसह हिंसाचाराच्या घटना घडल्या. उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील चकमकीत दोन विद्यार्थी ठार झाल्याच्या निषेधार्थ भाजपने बंदची हाक दिली होती.

कोलकाता  - भाजपने पुकारलेल्या बारा तासांच्या पश्चिम बंगाल बंददरम्यान काही जिल्ह्यांत दगडफेक, जाळपोळीसह हिंसाचाराच्या घटना घडल्या. उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील चकमकीत दोन विद्यार्थी ठार झाल्याच्या निषेधार्थ भाजपने बंदची हाक दिली होती. बंद यशस्वी झाल्याचा दावा करीत भाजपने दोन तासआधीच तो मागे घेतला.भाजपच्या कार्यकर्त्यांनी इस्लामपूर येथे रस्त्यावर ठाण मांडून वाहतूक रोखली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार करीत अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. भाजपच्या काही समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. बंदसमर्थकांनी उत्तर दिनाजपूरमधील राष्टÑीय महामार्ग बंद केल्याने पोलिसांनी बळाचा वापर करीत लाठीमार केला.पश्चिम मिदनापोर, प. बर्धवान, दक्षिण आणि उत्तर दिनाजपूर जिल्ह्यात भाजप आणि तृणमूल समर्थकांत चकमक झाली. मिदनापोर जिल्ह्यात बसगाड्यांवर दगडफेक करण्यात आली, तसेच वाहतूक रोखण्यासाठी रस्त्यांवर टायर्स जाळण्यात आले होते, असे पोलिसांनी सांगितले. कोलकात्यात भाजप नेत्यांनी मोर्चा काढला, तर तृणमूल काँग्रेसचे नेते आणि मंत्रीही जनजीवन सुरळीत ठेवण्यासाठी रस्त्यावर उतरले होते.मध्य कोलकात्यात पोलिसांशी झटापट करण्याऱ्या भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. बंद समर्थक हातीबगान भागात दुकानदारांना दुकाने बंद करण्यास सांगत होते. पूर्व आणि दक्षिण-पूर्व रेल्वे विभागातील काही मार्गांवर रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. इस्लामपूर येथे राज्य परिवहन मंडळाच्या तीन बसची जाळपोळ करण्यात आल्याचे वृत्त आहे. (वृत्तसंस्था)दोघांच्या हत्येमागे भाजपच -ममतादोन विद्यार्थी चकमकीत ठार झाल्याच्या घटनेमागे भाजपच आहे. या मुद्यांवरून बंद पुकारून भाजप राजकीय फायदा लाटू पाहत आहे. बंददरम्यान भाजपने अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला.राज्यातील जनजीवन विस्कळीत करण्याचा भाजपचा बेत हाणून पाडल्याबद्दल त्यांनी प्रशासनाची प्रशंसाही केली. त्या इटलीच्या दौºयावर आहेत. बंद सपेशल अयशस्वी ठरल्याचा दावाही त्यांनी केला.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालPolice Stationपोलीस ठाणे