शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

म्हणून या गावाने नाही साजरा केला स्वातंत्र्य दिन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2017 12:53 IST

देशभरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होत असताना एका गावाने स्वातंत्र्य दिन साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्दे देशभरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होत असताना उत्तर प्रदेशमध्ये एका गावाने स्वातंत्र्य दिन साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. लखीमपुर खीरी जिल्ह्यातील चौधीपूर गावातील लोकांनी स्वातंत्र्य दिन साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. 

लखीमपुर खीरी, दि. 15 - देशभरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होत असताना उत्तर प्रदेशमध्ये एका गावाने स्वातंत्र्य दिन साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. लखीमपुर खीरी जिल्ह्यातील चौधीपूर गावातील लोकांनी स्वातंत्र्य दिन साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. लखीमपुर खीरी जिल्ह्यापासून जवळपास 70 किलोमीटर दूर असलेल्या चौधीपूर गावात अजूनपर्यंत विकास झालेला नाही. गावात विज नाहीये तर रस्त्यांची स्थिती देखील अत्यंत वाईट आहे. अर्ध्याहून अधिक घरांमध्ये शौचालय नसल्याने गावक-यांना अजूनही उघड्यावर शौचास जावं लागतं. येथे राहणारा बहुतांश समाज हा आदिवासी आहे. त्यामुळे उपजिवेकेसाठी येथील लोक जंगलावर किंवा रोजंदारीच्या कामावर अवलंबून राहावं लागतं. येथे जवळपास 80 कुटुंब राहतात पण केवळ चार शौचालयं आहेत. आजूबाजूच्या गावांमध्ये विजेची सोय आहे, पण चौधीपूर गावात अजूनपर्यंत इलेक्ट्रिसिटी पोहोचलेली नाही, नवभारत टाइम्सने याबाबत वृत्त दिलं आहे. स्वातंत्र्य होवून 70 वर्ष झाली पण आमच्या आयुष्यात काहीही फरक पडलेला नाही. आम्ही अजूनही त्याच गरिबीत जगत आहोत. अशा स्वातंत्र्याचा काय फायदा?आम्हाला जर मुलभूत सुविधाच मिळत नाहीत तर आम्ही स्वातंत्र्य दिन का साजरा करावा. आमच्याकडे मुलभूत सुविधा नसल्यामुळे आम्ही स्वातंत्र्य दिन साजरा करणार नाही असं गावातील एक रहिवासी  गुलाब सिंह म्हणाले. जर कोणा अधिका-याने आम्हाला विचारलं की तुम्ही स्वातंत्र्य दिन साजरा का करत नाही तर मी त्यांना आमच्या गावात बोलवेन आणि आम्ही कोणत्या परिस्थितीत जगतोय हे त्यांना दाखवेन, असं गावातील आणखी एक रहिवासी राम स्वरूप म्हणाले.  

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिवस