शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

अरुणाचलजवळ वादग्रस्त भागात चीनने वसविले गाव; अमेरिकेच्या संरक्षण खात्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 08:56 IST

भारतानेही चीनला चोख प्रत्युत्तर देण्याकरिता जय्यत पूर्वतयारी केली असल्याचे अमेरिकेच्या संरक्षण खात्याने आपल्या अहवालात म्हटले आहे.

नवी दिल्ली  : अरुणाचल प्रदेश व तिबेट यांच्यातील वादग्रस्त सीमा भागात चीनने एक नवे गावच वसविले आहे. त्या गावात सध्या १०० लोक राहतात असा दावा अमेरिकेच्या संरक्षण खात्याने आपल्या वार्षिक अहवालात केला आहे. 

अमेरिकी काँग्रेसला हा अहवाल नुकताच सादर करण्यात आला आहे. विस्तारवादी भूमिका असलेल्या चीनने तिबेट गिळंकृत केलाच व आता त्याचा डोळा भारतातील काही भागांवर आहे. त्यामुळे चीनने सीमा भागात सध्या आपल्या हालचाली वाढविल्या आहेत. पूर्व लडाखमध्येही चीनने घुसखोरीचा प्रयत्न केला होता. अशा अनेक गोष्टींची या अहवालात नोंद करण्यात आली आहे.

या अहवालात म्हटले आहे की, सीमावाद सोडविण्याबाबत भारताचे मत मान्य न करता चीन आपली भूमिका पुढे रेटत आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ भारताने हाती घेतलेल्या विकास प्रकल्पांमध्ये खो घालण्याचा प्रयत्न चीनकडून सातत्याने होत आहे. वादग्रस्त ठिकाणी असलेले आपले सैन्य मागे हटविण्यास चीन दिरंगाई करीत आहे. अमेरिकेच्या संरक्षण खात्याने म्हटले आहे की, गेल्या अठरा महिन्यांपासून भारत व चीनमध्ये सीमातंट्यावरून तणाव वाढला आहे. 

भारतानेही केली जय्यत पूर्वतयारी

गलवानमध्ये भारत व चीनच्या सैनिकांत झालेल्या संघर्षात भारताचे वीसहून अधिक जवान शहीद झाले होते, तर चीनचे ४० हून अधिक सैनिक ठार झाले होते. गलवाननंतरही चीनने भारताला अडचणीत आणण्याची एकही संधी सोडलेली नाही. भारतानेही चीनला चोख प्रत्युत्तर देण्याकरिता जय्यत पूर्वतयारी केली असल्याचे अमेरिकेच्या संरक्षण खात्याने आपल्या अहवालात म्हटले आहे.

चीनच्या २० लढाऊ विमानांची तैवानच्या हवाई हद्दीत घुसखोरी

चीनच्या लढाऊ २० विमानांनी तैवानच्या डोंगशा बेटाच्या ईशान्येला असलेल्या हवाई संरक्षण हद्दीत घुसखोरी केली. यात १० शेनयांग जे-१६, ६ चेंगदू जे-१० विमाने आहेत.

टॅग्स :Arunachal Pradeshअरुणाचल प्रदेशchinaचीनIndiaभारत