शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

समलैंगिक विवाहांमध्ये शहरी उच्चभ्रूंचा विचार, केंद्र सरकारचे मत, सादर केले प्रतिज्ञापत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 08:16 IST

Same-Sex Marriages: समलिंगी विवाह कायदेशीर करण्याची मागणी केवळ शहरी उच्चभ्रू वर्गाची आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या हितावर परिणाम होणार आहे. यावर संसदेने निर्णय घ्यावा, असे केंद्र सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले.

नवी दिल्ली : समलिंगी विवाह कायदेशीर करण्याची मागणी केवळ शहरी उच्चभ्रू वर्गाची आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या हितावर परिणाम होणार आहे. यावर संसदेने निर्णय घ्यावा, असे केंद्र सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले. याच वेळी न्यायालयाने या निर्णयापासून दूर राहावे, असेही केंद्र सरकारने स्पष्ट केले.

केंद्राने समलिंगी विवाहावर दुसरे प्रतिज्ञापत्र सादर केले आणि त्याच्या बाजूने दाखल केलेल्या याचिकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. समलिंगी विवाह ही केवळ शहरी उच्चभ्रू वर्गातील लोकांची मागणी आहे. 

अशा विवाहांना सामाजिक मान्यता देणे हाच या याचिकांचा उद्देश असल्याचे सरकारने म्हटले आहे. सर्वच धर्मांत विवाहाला सामाजिक महत्त्व आहे. हिंदू धर्मात, अगदी इस्लाममध्येही विवाह हा संस्कार मानला जातो. त्यामुळे या याचिका फेटाळण्यात याव्यात, असे केंद्राने सर्वोच्च न्यायालयात म्हटले. सामान्य नागरिक आणि राजकीय पक्ष या विषयावर वेगवेगळी मते ठेवत असल्याने या खटल्याची सुनावणी आणि निकालाचा देशभरात व्यापक परिणाम होणार आहे.

आज होणार सुनावणीn सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याची मागणी करणाऱ्या याचिकांच्या योग्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या केंद्राच्या याचिकेवर सुनावणी घेण्याचे मान्य केले. n सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने या याचिकेचा संदर्भ देणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्या निवेदनाची दखल घेतली. n या खंडपीठात न्यायमूर्ती पी. एस. नरसिम्हा आणि न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला यांचाही समावेश आहे. या प्रकरणातील सुनावणी मंगळवारी (१८ एप्रिल) होणार आहे.

सरकारचा विरोध का?n सरकारने म्हटले होते की, न्यायालयाने आयपीसीच्या कलम ३७७ ला गुन्ह्यातून बाद केले असले तरी याचा अर्थ असा नाही की याचिकाकर्ते समलिंगी विवाहाच्या मूलभूत अधिकारावर दावा करतील.n समलिंगी विवाहाची तुलना भारतीय कुटुंबात पती-पत्नीच्या संकल्पनेशी होऊ शकत नाही. कायद्यानुसारही समलिंगी विवाहाला मान्यता देता येत नाही, कारण त्यात पती-पत्नीची व्याख्या जैविक दृष्ट्या देण्यात आली आहे. वाद झाल्यास पती-पत्नीचा वेगळा विचार कसा करता येईल?n या विवाहांना कायदेशीर मान्यता दिल्याने दत्तक घेणे, घटस्फोट, देखभाल, वारसा इत्यादी मुद्द्यांमध्ये खूप गुंतागुंत निर्माण होईल. सर्व वैधानिक तरतुदी पुरुष आणि स्त्री यांच्यातील विवाहावर आधारित आहेत.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारSupreme Courtसर्वोच्च न्यायालय