शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

VIDEO: PM नरेंद्र मोदींची चौथी टर्म; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे सूचक विधान, पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 19:19 IST

Rajnath Singh: पीएम मोदी तिसऱ्या टर्मबद्दल बोलत आहेत, तर राजनाथ सिंह यांनी चौथ्या टर्मबाबत भाष्य केले आहे.

Rajnath Singh Bihar Visit: भारतात सध्या लोकसभा निवडणुकीची धुम पाहायला मिळत आहे. विरोधक भाजपाच्या पराभवावर भाष्य करत आहेत, तर भाजपवाले तिसऱ्या टर्ममध्ये 400 पारचा नारा देत आहेत. अशातच आता भाजपाच्या चौथ्या टर्मची चर्चा सुरू झाली आहे. ही चर्चा भाजपाचे दिग्गज नेते आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी सुरू केली. 

बिहारच्या दरभंगा येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांच्या सरकारच्या कामगिरीचे कौतुक केले. "आम्ही तिसरी टर्म सत्ता उपभोगण्यासाठी नाही, तर राष्ट्र उभारणीसाठी मागत आहोत. आम्ही आता तिसऱ्या टर्मसाठी नाही, तर चौथ्या टर्मबद्दल बोलायला आलो आहोत," असे राजनाथ सिंह म्हणाले. 

संरक्षण मंत्री पुढे म्हणतात, "पंतप्रधान मोदींपूर्वी आपल्या देशाची अर्थव्यवस्था जगात 11 व्या स्थानावर होती, परंतु आपल्या सरकारच्या धोरणांमुळे देश आता 5 व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. आता तुम्ही पाहिलेच असेल की, आम्ही सर्व भारतीयांना लसीचे दोन डोस दिले. कतारच्या कोर्टात ज्या भारतीय माजी नौसैनिकांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती, त्यांना पंतप्रधानांमुळे माफी मिळाली."

कर्पूरी ठाकूर यांचा उल्लेख केला"आम्ही कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न दिला. काँग्रेसच्या काळात त्यांची उपेक्षा करण्यात आली. त्यांच्या काळात एकाच कुटुंबाला हे सर्व मिळायचे. पीएम मोदींनी पी.व्ही. नरसिंह राव यांनाही भारतरत्न दिला. काँग्रेस नेत्यांच्या योगदानाचा आम्ही गौरव केला. काँग्रेस 30-32 वर्षांपासून विधानसभा आणि संसदेत माता-भगिनींसाठीचे 33 टक्के आरक्षण रोखत आले, भारतीय जनता पक्षाने ते काम पूर्ण केले," असा दावाही त्यांनी यावेळी केला.

आम्ही जे बोलतो, ते करतो...संरक्षण मंत्री पुढे म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. एक काळ असा होता, जेव्हा आपण फक्त 1,000 कोटी रुपयांच्या संरक्षण वस्तूंची निर्यात करायचो. आज आपण 20 हजार कोटी रुपयांहून अधिक किंमतीचे संरक्षण साहित्य जगाला निर्यात करत आहोत. आज आपण 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे संरक्षण उत्पादन करत आहोत. कोणत्याही व्यक्तीची किंवा राजकीय पक्षाची सर्वात मोठी संपत्ती ही त्याची विश्वासार्हता असते. निवडणुकीच्या काळात नेते आणि त्यांचे पक्ष बोलतात एक आणि करतात एक. पण आम्ही जे बोलतो, ते करतो."

भाजपाच्या जाहीरनाम्याचा उल्लेखयावेळी राजनाथ सिंह यांनी एक किस्सा सांगितला. "2014 साली मी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष होतो. नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार होते. जेव्हा पक्षाचा जाहीरनामा तयार होत होता, तेव्हा मोदीजी मला म्हणाले- घोषणापत्रात फक्त त्या गोष्टी घ्या, ज्या पूर्ण करता येतील. 2019 मध्ये मी गृहमंत्री होतो. पंतप्रधानांनी जाहीरनामा बनवण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली. संसदेच्या दोन्ही सभागृहात आमचे पूर्ण बहुमत असताना आम्ही जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द करू, असे आम्ही जाहीरनाम्यात म्हटले होते आणि आम्ही ते पूर्ण केले. राम मंदिराचे वचन आम्ही पूर्ण केले, असेही ते यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण