शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
2
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
3
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
4
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
5
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
6
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
7
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
8
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
9
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
10
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
11
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
12
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
13
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
14
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
15
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
16
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल
17
राजा रघुवंशीची हत्या, सोनम झालेली बेपत्ता; एकाच वेळी १२० पोलीस करत होते 'ऑपरेशन हनिमून'!
18
सॉफ्टवेअर इंजिनिअर झटक्यात कोडिंग करायला गेले अन् चॅटजीपीटी बंद पडले! भारतीय युजर वैतागले 
19
CM फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज; म्हणाले, “तुमच्या मनात काही असले तरी...”
20
...अन् १४ चिनी नागरिकांचा जीव वाचला; चीननं मानले भारतीय नौदल आणि मुंबई कोस्ट गार्डचे आभार

केंद्रीय मंत्र्यावर अज्ञाताने फेकली शाई, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 13:26 IST

केंद्रीय मंत्र्यावर अज्ञाताने शाई फेकल्याची घटना समोर आली आहे. 

ठळक मुद्देकेंद्रीय मंत्र्यावर अज्ञाताने शाई फेकल्याची घटना समोर आली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनी चौबे यांच्यावर शाईफेक करण्यात आली.'जनता, लोकशाहीवर ही शाईफेक करण्यात आली आहे' अशी प्रतिक्रिया अश्विनी चौबे यांनी घटनेनंतर माध्यमांना दिली.

पटना - केंद्रीय मंत्र्यावर अज्ञाताने शाई फेकल्याची घटना समोर आली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनी चौबे यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. मंगळवारी  पटना मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल (पीएमसीएच) मध्ये चौबे डेंग्यू झालेल्या रुग्णांची भेट घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर शाई फेकली आहे. घटनेनंतर शाईफेक करणारी व्यक्ती फरार झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (15 ऑक्टोबर) केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांनी पाटना येथील एका हॉस्पिटलला भेट दिली. पटना मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमधील डेंग्यू झालेल्या रुग्णांच्या तब्येतीची त्यांनी चौकशी केली. त्याच दरम्यान एका व्यक्तीने चौबे यांच्यावर शाईफेक केली आहे. या घटनेनंतर शाई फेकणारी व्यक्ती फरार झाली आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. 

'जनता, लोकशाहीवर ही शाईफेक करण्यात आली आहे' अशी प्रतिक्रिया अश्विनी चौबे यांनी घटनेनंतर माध्यमांना दिली आहे. अश्विनी चौबे हे नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी पाटना येथे झालेल्या मुसळधार पावसाबाबत वक्तव्य केलं होतं. तसेच एका पोलीस कर्मचाऱ्याला धमकी दिल्याचं समोर आलं होतं. 

चौबे यांनी याआधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. 2019 नंतर राहुल गांधींना स्मशानात पोहोचवण्यासाठीही चार लोक मिळणार नाहीत, असे वक्तव्य चौबे यांनी केले होते. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेर आहेत. आता राहुल गांधींनी सव्वाशेर बनण्याचा प्रयत्न करू नये. काँग्रेस अध्यक्ष लोकसभेमध्ये गप्प बसून असतात. त्यांच्या बोलण्यामध्ये काहीच तथ्य नसते. पुढच्या वेळीही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशात एक सशक्त आणि भक्कम असे रालोआचे सरकार बनेल. तर काँग्रेस चारीमुंड्या चीत होईल. त्यानंतर काँग्रेस पक्षाला स्मशानात घेऊन जाण्यासाठीही चार जण मिळणार नाहीत' असं अश्विनी चौबे यांनी म्हटलं होतं. तसेच राहुल गांधी यांनी गरिबी पाहिलेली नाही. तसेच राहुल गांधींच्या खानदानाने महिलांचे किती शोषण केले आहे ते सुद्धा त्यांना ठावूक नाही आहे, असा टोलाही चौबे यांनी यावेळी लगावला होता. 

टॅग्स :BJPभाजपाBiharबिहार