शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Video : महात्मा गांधींचे मारेकरी आज सत्तेत, त्यांना तुरुंगात डांबणार का? - स्वरा भास्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2018 10:18 IST

वादग्रस्त विधान करुन चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करनं पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली - वादग्रस्त विधान करुन चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करनं पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ''राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारे आज सत्तेत आहेत. त्यांना आपण तुरुंगात डांबणार का?'', असे वादग्रस्त विधान स्वरा भास्करनं केले आहे. दरम्यान, हा गंभीर आरोप करताना स्वरानं कोणाच्या नावाचा स्पष्टपणे उल्लेख केला नाही. स्वराच्या या विधानामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत स्वरा भास्करनं हे वक्तव्य केले आहे. देशभरात सुरू असलेल्या कथित नक्षलवादी 'थिंक टँक' अटकसत्रासंदर्भात स्वराचे विधान जोडण्यात येत आहे.  

दिल्लीमध्ये पत्रकारांसोबत संवाद साधताना स्वरानं अप्रत्यक्षरित्या भाजपा सरकारवर निशाणा साधत म्हटले की, ''आपल्या देशात जेव्हा महात्मा गांधी यांच्यासारख्या महान नेत्याची हत्या करण्यात आली, तेव्हा काही लोक आनंद उत्सव साजरा करत होते. आज तिच लोक सत्तेत आहेत. त्यांना आपण तुरुंगात डांबणार आहोत का?. तर याचे उत्तर नाही असंच आहे. दुसरीकडे सध्या काहीही झालं की तुरुंगात टाका असे म्हटले जाते.'' 

(हे घ्या ई-मेल, पत्रं... देशाविरोधात कट रचला जात होता; माओवादी 'थिंक टँक' अटकेप्रकरणी पोलिसांनी दाखवले पुरावे)

रक्तासाठी तहानलेला समाज बनणे ही चांगली गोष्ट नाही, अशी टीकादेखील तिनं यावेळी केली.भिंद्रनवाले यांनाही काही लोक संत म्हणत त्या सगळ्यांनाही उचलून तुरुंगात टाकणार का? असाही प्रश्न स्वरा भास्करने उपस्थित केला आहे. 

दरम्यान, मंगळवारी (28 ऑगस्ट) कथित नक्षलवादी 'थिंक टँक' असल्याच्या संशयातून कवी वारा वारा राव, अरुण परेरा, गौतम नवलखा, वेरनोन गोन्झाल्विस आणि सुधा भारद्वाज यांना अटक करण्यात आली होती. या सर्वांना 6 सप्टेंबरपर्यंत नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. स्वरा भास्करनं यापूर्वीही सामाजिक आणि राजकीय मुद्यांवर आपलं मत व्यक्त केले आहे. यामुळे अनेकदा तिच्यावर सडकून टीकादेखील झाली आहे.  

 

टॅग्स :Swara Bhaskarस्वरा भास्करNarendra Modiनरेंद्र मोदीMahatma Gandhiमहात्मा गांधीnaxaliteनक्षलवादी