शहरं
Join us  
Trending Stories
1
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
2
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
3
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
4
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
5
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
6
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
7
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
8
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
9
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
10
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
11
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
12
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
13
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
14
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
15
Nashik Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्यात 'गुगल' दाखवणार गर्दीतून वाट; अडीच हजार CCTV ची शहरावर नजर
16
गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म
17
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
18
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
19
पेट्रोलची चिंता मिटली! 2026 मध्ये येणार मारुतीची पहिली फ्लेक्स-फ्युएल कार, जाणून घ्या डिटेल्स...
20
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण

शासकीय नोकऱ्यांमध्येही विदर्भ मागेच नागपूर कराराचे पालन झालेच नाही : मधुकर किंमतकर यांनी वेधले लक्ष

By admin | Updated: December 13, 2015 00:07 IST

नागपूर : विदर्भ महाराष्ट्रात सामील झाला, परंतु तेव्हापासून विदर्भावर अन्याय सुरू आहे. नागपूर कराराचे पालन कधी झालेच नाही; त्यामुळे सिंचनापासून तर कृषिपंपापर्यंत आणि रस्त्यांपासून तर विजेच्या कनेक्शनपर्यंत सर्वच क्षेत्रात विदर्भावर अन्याय करण्यात आला. यातून नोकऱ्याही सुटलेल्या नाहीत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे २०१० ते २०१३ या चार वर्षांची आकडेवारी पाहिली तर एकट्या पुणे विभागात ५०.४९ टक्के तर विदर्भात ९.६८ टक्के उमेदवारांची निवड झाल्याची धक्कादायक माहिती आहे. तेव्हा विदर्भावरील हा अन्याय कधी थांबेल? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

नागपूर : विदर्भ महाराष्ट्रात सामील झाला, परंतु तेव्हापासून विदर्भावर अन्याय सुरू आहे. नागपूर कराराचे पालन कधी झालेच नाही; त्यामुळे सिंचनापासून तर कृषिपंपापर्यंत आणि रस्त्यांपासून तर विजेच्या कनेक्शनपर्यंत सर्वच क्षेत्रात विदर्भावर अन्याय करण्यात आला. यातून नोकऱ्याही सुटलेल्या नाहीत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे २०१० ते २०१३ या चार वर्षांची आकडेवारी पाहिली तर एकट्या पुणे विभागात ५०.४९ टक्के तर विदर्भात ९.६८ टक्के उमेदवारांची निवड झाल्याची धक्कादायक माहिती आहे. तेव्हा विदर्भावरील हा अन्याय कधी थांबेल? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
माजी राज्यमंत्री आणि विदर्भ विकास मंडळाचे तज्ज्ञ सदस्य ॲड. मधुकर किंमतकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेद्वारे याकडे लक्ष वेधले. त्यांनी सांगितले की, नागपूर करारांतर्गत विदर्भातील तरुणांंना नोकरीच्या संधी या लोकसंख्येच्या प्रमाणात उपलब्ध करून देण्याचे आश्वासन नव्हे तर वचन देण्यात आले होते. परंतु वस्तुस्थिती वेगळी आहे. २०११ च्या जनगणनेनुसार एकूण महाराष्ट्र राज्याची एकूण लोकसंख्या ही ११ कोटी २३ लाख ७४ हजार ३३३ इतकी आहे. त्यामध्ये कोकण विभागाची लोकसंख्या (मुंबई मिळून) २ कोटी ८६ लाख १४४१ म्हणजेच २३.४५ टक्के इतकी आहे. नाशिक विभागाची लोकसंख्या १ कोटी ५७ लाख ९,४२० (१६.५३ टक्के), पुणे विभाग २ कोटी ३४ लाख ४९ हजार ४० (२०.८७ टक्के), औरंगाबाद विभागाची लोकसंख्या १ कोटी ८७ लाख ३१ हजार ८७२ (१६.६७ टक्के), अमरावती विभागाची लोकसंख्या १ कोटी १२ लाख ५८ हजार ११७ (१०.०२ टक्के) आणि नागपूर विभागाची लोकसंख्या १ कोटी १७ लाख ५४ हजार ४३४ (१०.४६ टक्के) इतकी आहे. त्यामानाने शासकीय नोकऱ्यांमधील संधीच्या प्रमाणात प्रचंड तफावत आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे जवळपास १०८ प्रकारच्या ग्रेडनिहाय नोकऱ्यांसाठी उमेदवारांची निवड करते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सेवानिवृत्त अध्यक्ष सुधीर ठाकरे यांनी २०१० ते २०१३ या चार वर्षांत लोकसेवा आयोगामार्फत जी निवड करण्यात आली त्यातील भयावह तफावतीबाबत राज्यपालांना पत्र लिहिले होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१० ते २०१३ या चार वर्षांच्या काळात लोकसेवा आयोगाकडून ती निवड करण्यात आली.