शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

Vice Presidential Election Live: आत्तापर्यंत 90 टक्क्याहून जास्त मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2017 15:49 IST

नवी दिल्ली, दि. 5- उपराष्ट्रपतिपदासाठी सुरू असलेल्या निवडणुकीत आतापर्यंत ९० टक्क्यांहून अधिक मतदान झालं आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत 785 पैकी 761 खासदरांनी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. सकाळी 10 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. मतदानानंतर संध्याकाळपर्यंत निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.  सत्तारूढ रालोआचे उमेदवार एम. व्यंकय्या नायडू व विरोधी पक्षांतर्फे गोपाळकृष्ण गांधी ...

ठळक मुद्देउपराष्ट्रपतिपदासाठी सुरू असलेल्या निवडणुकीत आतापर्यंत ९० टक्क्यांहून अधिक मतदान झालं आहे दुपारी तीन वाजेपर्यंत 785 पैकी 761 खासदरांनी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहेसकाळी 10 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली.

नवी दिल्ली, दि. 5- उपराष्ट्रपतिपदासाठी सुरू असलेल्या निवडणुकीत आतापर्यंत ९० टक्क्यांहून अधिक मतदान झालं आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत 785 पैकी 761 खासदरांनी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. सकाळी 10 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. मतदानानंतर संध्याकाळपर्यंत निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.  सत्तारूढ रालोआचे उमेदवार एम. व्यंकय्या नायडू व विरोधी पक्षांतर्फे गोपाळकृष्ण गांधी यांच्यात लढत असली तरी, नायडू यांची निवड निश्चित मानली जात आहे. मतदानासाठी संसदेत सदस्य दाखल होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी  माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, खासदार सचिन तेंडुलकर, अभिनेत्री रेखा यांनीही मतदानाचा हक्क बजावला. दुपारी पावणेदोन वाजेपर्यंत एकूण ७१३ खासदारांनी मतदान केलं होतं. तर आता तीन वाजे पर्यंत एकुण 761 खासदारांनी मतदान केलं आहे. 

मतदानाची सुरूवात झाल्यावर सत्ताधारी एनडीए आघाडीचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार व्यंकय्या नायडू यांनी सुरुवातीलाच मतदान केलं. पंतप्रधान मोदी यांनी स्वत: ट्विट करून मतदान केल्याची माहिती दिली. मतमोजणी आज संध्याकाळीच होणार असून त्यानंतर लगेचच देशाच्या नव्या उपराष्ट्रपतींचं नाव घोषित केलं जाणार आहे.

व्यंकय्या नायडू यांची प्रतिक्रियामतदानापूर्वी रालोआचे उमेदवार एम. व्यंकय्या नायडू यांनी अशी प्रतिक्रिया दिली की, मी कुणाही विरोधात लढत नाहीय आणि आता मी कोणत्याही पक्षाचा सदस्य नाही. मी उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक लढत आहे आणि अनेकांनी मला समर्थन दिले आहे. त्यामुळे  ते सर्व निवडणुकीत मतदान करतील असा विश्वास आहे. 

 

मतदान प्रक्रियाउपराष्ट्रपतीपद निवडणुकीसाठी संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्य मतदान करतात. यावेळी बॅलेट पेपर कोणत्या प्रकारचे निवडणुकीचे चिन्ह नसते तर उमेदवाराचे नाव तेथे असते. एका विशेष प्रकारच्या शाईचा मतदानासाठी वापर केला जातो.  लोकसभेत बहुमत असलेल्या रालोआचे उमेदवार नायडू हे देशाचे नवे उपराष्ट्रपती म्हणून निवडले जाण्याचा मार्ग जवळपास मोकळा आहे. गोपाळकृष्ण गांधी हे विरोधकांचे संयुक्त उमेदवार आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत रामनाथ कोविंद यांचे समर्थन करणा-या बीजू जनता दल आणि जदयूने उपराष्ट्रपतीपदासाठी गोपाळकृष्ण गांधी यांना पाठिंबा दिला आहे. जदयूने बिहारमध्ये महाआघाडीतून बाहेर पडून भाजपसोबत राज्यात नवे सरकार स्थापन केले. पण, पक्षाने उपराष्ट्रपतीपदासाठी पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी यांच्या बाजूने मतदान करण्याचा निर्णय बदललेला नाही.

आज सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत होणा-या मतदान प्रक्रियेत संसद सदस्य आपल्या पसंतीचे मत देण्यासाठी विशेष प्रकारच्या पेनचा उपयोग करतील. निवडणूक आयोगाच्या अधिका-यांनी सांगितले की, मतदानानंतर तत्काळ मतमोजणी होणार आहे आणि रात्री सातपर्यंत निकाल हाती येतील. विशेष म्हणजे राजकीय पक्ष या निवडणुकीत व्हिप जारी करू शकत नाहीत. कारण, मतदान गोपनीय पद्धतीने होते.

विद्यमान उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचा कार्यकाळ १० आॅगस्ट रोजी संपत आहे. ते सलग दोन वेळा या पदावर राहिले आहेत. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदानाचा अधिकार संसदेच्या दोन्ही सभागृहांतील निवडून आलेल्या आणि नियुक्त सदस्यांना असतो. दोन्ही सभागृहातील सदस्यांची एकूण संख्या ७९० आहे. पण, लोकसभेत दोन आणि राज्यसभेत एक जागा रिक्त आहे. याशिवाय लोकसभा सदस्य छेदी पासवान यांना न्यायालयाच्या एकानिर्णयानंतर मतदानासाठी बंदी करण्यात आली आहे.

राज्यसभेत भाजपाला ‘बळ’लोकसभेतील एकूण ५४५ सदस्यांपैकी भाजपाचे २८१ सदस्य आहेत. तर, भाजपाच्या नेतृत्वातील रालोआचे एकूण ३३८ सदस्य आहेत, तसेच २४३ सदस्यीय राज्यसभेत भाजपाचे एकूण ५८ सदस्य आहेत. सभागृहातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसचे ५७ सदस्य आहेत. भाजपा आजच राज्यसभेतील सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी त्या सभागृहात विरोधी सदस्यांची संख्या रालोआपेक्षा अधिक आहे.