शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

"देशाच्या काही भागात निवडणुकांची गरज नाही...", असं का म्हणाले उपराष्ट्रपती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 12:46 IST

Vice-President Jagdeep Dhankhar : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी जयपूर येथे चार्टर्ड अकाउंटंट्सच्या परिषदेला संबोधित केले. यावेळी ते बोलत होते. 

Vice-President Jagdeep Dhankhar : भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे, मात्र उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी देशातील काही भागात निवडणुका आणि लोकशाही निरर्थक असल्याचं म्हटलं आहे. देशाच्या काही भागांत लोकसंख्येचा समतोल इतका ढासळला आहे की, तिथं निवडणुकांना आणि लोकशाहीला काही अर्थ उरलेला नाही. तिथं निकाल काय लागणार, हे आधीच माहीत असतं, असं म्हणत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी चिंता व्यक्त केली आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी जयपूर येथे चार्टर्ड अकाउंटंट्सच्या परिषदेला संबोधित केले. यावेळी ते बोलत होते. 

लोकसंख्येच्या बदलामुळं देशातील अनेक भाग राजकीय बालेकिल्ले बनले आहेत. तिथे निवडणुका आणि लोकशाहीला काही अर्थ नाही, कारण निकाल आधीच ठरलेले असतात. जगात लोकसंख्या बदल हे एक आव्हान बनत आहे. हे अत्यंत चिंताजनक आव्हान पद्धतशीरपणे हाताळले नाही तर ते अस्तित्वाचे आव्हान बनेल, असं जगात घडलं आहे. या लोकसंख्येच्या विकारामुळं, लोकसंख्येच्या भूकंपामुळं ज्या देशांनी आपली १०० टक्के ओळख गमावली आहे, त्या देशांची नावं घेण्याची गरज नाही, असं म्हणत लोकसंख्येचा असा असमतोल अणुबॉम्बपेक्षा कमी घातक नाही, असंही उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले.

याचबरोबर, आपली संस्कृती पाहा, आपली सर्वसमावेशकता आणि विविधतेतील एकता हे सकारात्मक समाजव्यवस्थेचे पैलू आहेत. खूप सुखदायक आहेत. आम्ही सर्वांचं मनमोकळेपणानं स्वागत करतो, पण त्याचा परिणाम काय होत आहे? याचा गैरफायदा चुकीच्या पद्धतीनं घेतला जात आहे. लोकसंख्येची अव्यवस्था, जातीवर आधारित दुर्भावनापूर्ण विभागणी आणि अशा प्रकारच्या इतर अनेक गोष्टींना धक्का बसत आहे आणि गंभीरपणे तडजोड केली जात आहे, असं असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सांगितलं.

संकटाला तोंड देण्यासाठी...कोणत्याही विशिष्ट राज्याचा किंवा प्रदेशाचा उल्लेख न करता उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले की, जेव्हा काही भागात निवडणुका येतात, तेव्हा लोकसंख्येची अराजकता लोकशाहीतील राजकीय असुरक्षिततेचा बालेकिल्ला बनत चालला आहे. देशात झालेला हा बदल आपण पाहिला आहे. लोकसंख्येतील बदल इतका मोठा आहे की, हा परिसर राजकीय गड बनतो. लोकशाहीला अर्थ उरला नाही, निवडणुकीला काही अर्थ उरला नाही.  कोण निवडून येणार हे आपल्याला आधीच माहीत असतं. असे भाग आपल्या देशात आहेत आणि ते झपाट्याने वाढत आहेत. अशा संकटाला तोंड देण्यासाठी आपल्याला जात, पात, रंग, संस्कृती, श्रद्धा या भेदांच्या पलीकडं जावं लागेल. सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत, असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं. 

टॅग्स :IndiaभारतPoliticsराजकारण