शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

"श्रद्धाचे 35 तुकडे केले, आफताबचे 500 तुकडे करा", साध्वी प्राची यांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2022 09:14 IST

विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी श्रद्धा हत्याकांड आणि निधी गुप्ता प्रकरणासंदर्भात विधान केले आहे.

दिल्लीत आफताबने श्रद्धा वालकर तुकडे केल्याची घटना समोर आल्याने संपूर्ण देश हादरला आहे. यातच गेल्या मंगळवारी आणखी एक दुसरी घटना उत्तर प्रदेशमध्ये समोर आल्याने खळबळ उडाली. येथील निधी गुप्ता हिची हत्या करण्यात आली. याप्रकरणी सुफियानवर निधीला चौथ्या मजल्यावरून खाली फेकून दिल्याचा आरोप आहे. दरम्यान, विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी श्रद्धा हत्याकांड आणि निधी गुप्ता प्रकरणासंदर्भात विधान केले आहे. "हिंदूंनी एकजूट व्हा. कान उघडून ऐका. त्यांना त्याच भाषेत उत्तर द्या, आफताबने श्रद्धाचे 35 तुकडे केले, त्याचेही 500 तुकडे करा, त्यानंतर मार्ग सापडेल. दुसऱ्या दिवशी निधी गुप्ता मृतावस्थेत सापडणार नाही", असे पत्रकारांशी संवाद साधताना साध्वी प्राची म्हणाल्या. 

हिंदू मुलींना मुस्लिम मुलांशी मैत्री करण्यास आणि प्रेम करण्यास साध्वी प्राची यांनी सक्त विरोध केला. यासोबतच त्यांनी प्रत्येक पालकांना आपल्या मुलीवर लक्ष ठेवण्याच्या सूचनाही दिल्या आल्या, जेणेकरून कोणताही जिहादी तिला आपल्या तावडीत अडकवू नयेत. साध्वी प्राची म्हणाल्या की, "भारतात अत्यंत सुनियोजित षडयंत्र रचले जात आहे. इथे हिंदू मुलींना कसे अडकवले जाते, त्यांच्यासोबत लव्ह जिहाद केला जातो. ही एक श्रद्धा नाही, कधी निधी गुप्ता येते तर कधी श्रद्धा येते. अशा घटना फक्त हिंदू मुलींसोबतच का होतात? तर हिंदू मुलंही मुस्लिम मुलींशी लग्न करतात. आजपर्यंत भारतात त्याच्यासोबत अशी एकही घटना समोर आलेली नाही."

आपल्या मुलींचे रक्षण करण्यासाठी आपल्याला कायदा हातात घ्यावा लागेल, पण आपल्या मुलींचे रक्षण करा. त्यांच्या आजूबाजूला कुठेतरी जिहादी आपल्या मुलीला आपल्या तावडीत अडकवत नाहीत ना? याकडे लक्ष दिले पाहिजे. मी प्रत्येक पालकांना आपल्या मुलीवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करेन, असे याचबरोबर, प्राची म्हणाल्या. तसेच, हिंदू मुलींनी मुस्लिम मुलांशी मैत्री करू नये आणि प्रेम करू नये. जर तुम्हाला प्रेम असेल तर ते तुमच्या पालकांसोबत करा. आपल्या मुलीने आकाशात झेप घ्यावी, असे प्रत्येक वडिलांना वाटते. पण आकाशात अनेक गरुड आहेत. त्यांच्यावर प्रेम करू नये. हे लोक जाहिल आहेत, असे मी उघडपणे सांगते, असेही साध्वी प्राची म्हणाल्या.

याचबरोबर, आफताबबाबत साध्वी प्राची म्हणाल्या की, भारतीयांनी कान उघडून ऐकावे. त्यांना त्याच भाषेत उत्तर द्या, जिथे आफताबने श्रद्धाचे 35 तुकडे केले आहेत, तिथे 500 तुकडे करा, मार्ग सापडेल. दुसऱ्या दिवशी निधी गुप्ता मृतावस्थेत सापडणार नाही. दरम्यान, यावेळी साध्वी प्राची यांनी उत्तर प्रदेशातील बेकायदेशीर मदरशांवर बुलडोझर चालवा किंवा ठिकाणी सरकारी रुग्णालय बांधण्याची मागणी सरकारकडे केली. 

टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकरUttar Pradeshउत्तर प्रदेश