शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

५०० कोटींचं भाजपा ऑफिस बांधलं, पण रामलल्ला तंबूतच; मोदींवर आणखी एक मित्र चिडला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 18:28 IST

आपल्याच लोकांनी कोंडी केल्यानं मोदी सरकारची डोकेदुखी वाढली असतानाच, भाजपाचा मोठा आधार मानल्या जाणाऱ्या विश्व हिंदू परिषदेनंही मोदी-शहांना धक्का दिलाय.

फैजाबादः अयोध्येतील राम मंदिरासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर दबाव वाढवला आहे. दुसरीकडे, भाजपासोबत सत्तेत बसलेल्या शिवसेनेनंही 'जय श्रीराम', 'चलो अयोध्या'चा नारा देऊन शंख फुंकलाय. आपल्याच लोकांनी कोंडी केल्यानं मोदी सरकारची डोकेदुखी वाढली असतानाच, भाजपाचा मोठा आधार मानल्या जाणाऱ्या विश्व हिंदू परिषदेनंही मोदी-शहांना धक्का दिलाय. राम मंदिर नाही, तर मत नाही, असा इशारा आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे प्रमुख प्रवीण तोगडिया यांनी दिला आहे. 

भाजपाने दिल्लीत ५०० कोटी रुपये खर्चून पक्षाचं मुख्यालय बांधलं. पण, रामलल्ला अजूनही तंबूतच आहे. आता सरकार लखनऊमध्ये बाबरी मशीद बांधण्याची तयारी करतंय आणि राम मंदिराचं त्यांचं आश्वासन हा 'जुमला'च ठरलाय, असं टीकास्त्र प्रवीण तोगडिया यांनी  सोडलं. अयोध्येत राम मंदिर बांधण्याचा कायदा संसदेने करावा, या मागणीसाठी गेली ३२ वर्षं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा आणि विहिंप आंदोलन करत होते. पण, बहुमताचं सरकार आल्यानंतर हे आता रामाचं दर्शन घ्यायलाही येत नाहीत, अशी चपराक त्यांनी लगावली. उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारवरही त्यांनी निशाणा साधला. विहिंपच्या कार्यकर्त्यांना अयोध्येत राहू दिलं नाही, आमच्यासाठी धान्य घेऊन येणारे ट्रक रोखण्यात आले, असे प्रकार मुलायम सरकारच्या काळात झाले होते, असं त्यांनी सुनावलं. 

काँग्रेस मुक्त भारताचा नारा देताना भाजपाच काँग्रेसयुक्त झाल्याची टिप्पणीही तोगडिया यांनी केली. काँग्रेसमध्ये ज्यांना कुणी विचारत नव्हतं, त्यांना भाजपामध्ये मोठ्या पदांवर बसवण्यात आलं. या उलट, खरा भाजपा कार्यकर्ता राम मंदिराचं स्वप्न पाहून आजही अश्रू ढाळतोय, असा टोला त्यांनी हाणला. त्यामुळे आता विश्व हिंदू परिषदेची 'मत की बात' मोदी-शहा किती गांभीर्याने घेतात आणि त्यांचं मनपरिवर्तन करण्यासाठी काय करतात, हे पाहावं लागेल.  

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरNarendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९