शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
3
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
4
राज्यात उन्हाने होरपळ, उकाड्यानं नागरिक हैराण; उष्णतेच्या लाटेचा इशारा
5
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
6
'असा' शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार?; शिक्षणाचा खेळखंडोबा म्हणजे देशाशी गद्दारी!
7
मुंबई विद्यापीठासाठी उघडले संशोधनाचे नवे दालन; आयआयटी-मुंबईच्या ‘हब’ संस्थेत समावेश
8
तारीख पे तारीखचा खेळ सुरू; यावर्षीही महापालिका निवडणुका होणार नाहीत..?
9
दोन टक्के व्याजासाठी विकासाला खीळ घालणे अमान्य; BMC आयुक्तांनी सांगितलं कारण...
10
आर्थिक राजधानीतही ‘हुंड्याचा फास’! अवघ्या २ वर्षांतच लक्ष्मीने गळफास घेऊन आयुष्य संपवले
11
रेल्वे पोलिसांकडून २९ बालकांची सुटका; मुंबई-चेन्नई एक्स्प्रेसमध्ये संशयास्पदरीत्या वाहतूक
12
पकडा आणि परत पाठवा! अमेरिका,चीन वर्चस्ववादाच्या लढाईने जागतिकीकरणाच्या आशयाचा पराभव
13
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
14
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
15
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
16
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
17
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
18
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
19
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
20
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?

२४ मागासवर्गीयांच्या हत्याकांडाचा निकाल; कोर्टात तब्बल ४४ वर्षांनंतर तिघे दोषी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 08:43 IST

खटला चालू असताना दरोडेखोरांचा नेता संतोषा आणि राधेसह १७ पैकी १३ आरोपींचा मृत्यू झाला. एक दरोडेखोर फरार आहे. फक्त तीन दरोडेखोरांवर पूर्ण खटला चालला. 

डॉ. खुशालचंद बाहेती

नवी दिल्ली : चार दशकांहून अधिक काळ लोटला. उत्तर प्रदेशात झालेल्या २४ मागासवर्गीयांच्या हत्याकांडाने देशाला हादरवून टाकले होते. तत्कालीन पंतप्रधान आणि विरोधी पक्षाचे नेते घटनास्थळी धावले होते. तरीही या हत्याकांडाचा निकाल तब्बल ४४ वर्षांनंतर लागला व यात तिघांना दोषी ठरविण्यात आले.

१८ नोव्हेंबर १९८१ रोजी, संतोष सिंग ऊर्फ संतोषा आणि राधे श्याम ऊर्फ राधे या दरोडेखोरांच्या टोळीने उत्तर प्रदेशच्या मैनपुरी जिल्ह्यातील दिहुली गावात मागासवर्गीयांवर हल्ला केला. महिला, मुलांसह २४ लोकांना गोळ्या घालून ठार मारले. त्यांची रोकड व ऐवज लुटला.

१७ पैकी १३ जणांचा मृत्यूखटला चालू असताना दरोडेखोरांचा नेता संतोषा आणि राधेसह १७ पैकी १३ आरोपींचा मृत्यू झाला. एक दरोडेखोर फरार आहे. फक्त तीन दरोडेखोरांवर पूर्ण खटला चालला. विशेष न्यायाधीश इंदिरा सिंग यांनी कप्तान सिंग, राम पाल आणि राम सेवक यांना हत्या, दरोडा, दहशत, अवैध शस्त्र इत्यादी गुन्ह्यांत दोषी ठरविले आहे. 

पदयात्रा काढली होतीया हत्याकांडामुळे देशभरात खळबळ उडाली होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी शोकाकुल कुटुंबांना भेटण्यासाठी दिहुलीत गेल्या होत्या.विरोधी पक्षाचे नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी पीडित कुटुंबांसोबत ऐक्य व पाठिंबा दाखवत दिहुली ते फिरोजाबादमधील सादुपूर अशी पदयात्रा काढली होती. १८ मार्चला आरोपींना शिक्षा जाहीर होणार आहे.

टॅग्स :Courtन्यायालयRobberyचोरीDeathमृत्यू