शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

...आणि काँग्रेसमधील 'या' नेत्याच्या आठवणीने उपराष्ट्रपती गहिवरले  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 19:14 IST

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आज राज्यसभेमध्ये भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

नवी दिल्ली - संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेमध्ये आज माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एस. जयपाल रेड्डी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी रेड्डी यांच्या स्मृतींना उजाळा देताना उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू हे भावूक झाले. जयपाल रेड्डी यांचे वयाच्या 77 व्या वर्षी 28 जुलै रोजी निधन झाले होते. सोमवारी राज्यसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यावर रेड्डी यांना श्रद्धांजली वाहून सदस्यांनी दोन मिनिटे मौन पाळले. त्यावेळी जुने मित्र असलेल्या रेड्डी यांना श्रद्धांजली वाहताना उपराष्ट्रपतींना गहिवरून आले. ''रेड्डी यांचे जाणे माझ्यासाठी खूप वेदनादायी आहे.  त्यांनी केंद्रातील विविध मंत्रालयांमध्ये मंत्री म्हणीन काम पाहिले. त्यांच्या निधनामुळे देशाने एक ज्येष्ठ खासदार, एक प्रभावी वक्ता आणि एक कुशल प्रशासक गमावला आहे.'' असे नायडूंनी सांगितले. यावेळी व्यंकय्या नायडू यांनी जयपाल रेड्डी यांच्याशी असलेल्या वैयक्तिक स्नेहसंबंधांचाही उल्लेख केला. ''रेड्डी माझे मित्र, ज्येष्ठ सहकारी आणि मार्गदर्शक होते. आंध्र प्रदेश विधानसभेचे आमदार असताना आम्ही दोघेही एकाच बेंचवर बसत असू. त्यावेळी विधानसभेचे कामकाज सकाळी 8 वाजता सुरू होत असे. तेव्हा मी आणि रेड्डी सकाळी सात वाजता ब्रेकफास्टसाठी भेट असू. त्यावेळी विविध मुद्द्यांवर आमची चर्चा होत असे. रेड्डींचे प्रत्येक विषयाबाबतचे ज्ञान, आकलन क्षमता, इंग्रजी आणि तेलुगू भाषेवरील पकड आणि उर्दु भाषेबाबतची माहिती उत्तम होती. त्यांचे जाणे दु:खदायी आहे.'' असे सांगताना व्यंकय्या नायडूंना आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे शक्य झाले नाही आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू तरळले. 

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडूRajya Sabhaराज्यसभा