शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

...आणि काँग्रेसमधील 'या' नेत्याच्या आठवणीने उपराष्ट्रपती गहिवरले  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 19:14 IST

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आज राज्यसभेमध्ये भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

नवी दिल्ली - संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेमध्ये आज माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एस. जयपाल रेड्डी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी रेड्डी यांच्या स्मृतींना उजाळा देताना उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू हे भावूक झाले. जयपाल रेड्डी यांचे वयाच्या 77 व्या वर्षी 28 जुलै रोजी निधन झाले होते. सोमवारी राज्यसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यावर रेड्डी यांना श्रद्धांजली वाहून सदस्यांनी दोन मिनिटे मौन पाळले. त्यावेळी जुने मित्र असलेल्या रेड्डी यांना श्रद्धांजली वाहताना उपराष्ट्रपतींना गहिवरून आले. ''रेड्डी यांचे जाणे माझ्यासाठी खूप वेदनादायी आहे.  त्यांनी केंद्रातील विविध मंत्रालयांमध्ये मंत्री म्हणीन काम पाहिले. त्यांच्या निधनामुळे देशाने एक ज्येष्ठ खासदार, एक प्रभावी वक्ता आणि एक कुशल प्रशासक गमावला आहे.'' असे नायडूंनी सांगितले. यावेळी व्यंकय्या नायडू यांनी जयपाल रेड्डी यांच्याशी असलेल्या वैयक्तिक स्नेहसंबंधांचाही उल्लेख केला. ''रेड्डी माझे मित्र, ज्येष्ठ सहकारी आणि मार्गदर्शक होते. आंध्र प्रदेश विधानसभेचे आमदार असताना आम्ही दोघेही एकाच बेंचवर बसत असू. त्यावेळी विधानसभेचे कामकाज सकाळी 8 वाजता सुरू होत असे. तेव्हा मी आणि रेड्डी सकाळी सात वाजता ब्रेकफास्टसाठी भेट असू. त्यावेळी विविध मुद्द्यांवर आमची चर्चा होत असे. रेड्डींचे प्रत्येक विषयाबाबतचे ज्ञान, आकलन क्षमता, इंग्रजी आणि तेलुगू भाषेवरील पकड आणि उर्दु भाषेबाबतची माहिती उत्तम होती. त्यांचे जाणे दु:खदायी आहे.'' असे सांगताना व्यंकय्या नायडूंना आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे शक्य झाले नाही आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू तरळले. 

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडूRajya Sabhaराज्यसभा