शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

खाद्यपदार्थ मांसाहारी की शाकाहारी हे कळणे हक्कच; दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 06:12 IST

आपण काय खातो हे जाणून घेण्याचा प्रत्येक नागरिकास संपूर्ण अधिकार आहे: सर्वोच्च न्यायालय

एखादा खाद्यपदार्थ बनविताना त्यात कोणते अन्नघटक वापरले आहेत, याची संपूर्ण माहिती उत्पादक कंपनीने दिली पाहिजे. त्यामुळे हा पदार्थ शाकाहारी आहे की मांसाहारी, हे लोकांना सहजपणे ओळखता येईल, असा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. आपण काय खातो हे जाणून घेण्याचा प्रत्येक नागरिकास संपूर्ण अधिकार आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाचे न्या. बिपीन संघी व न्या. जसमित सिंह यांनी म्हटले आहे की, एखादा खाद्यपदार्थ कोणत्या अन्नघटकांपासून बनला आहे, इतकीच माहिती न देता, ते घटक कोणत्या प्राण्याचे किंवा रोपाचे आहेत, याचाही तपशील उत्पादक कंपन्यांनी दिला पाहिजे. हा पदार्थ नैसर्गिक पद्धतीने बनविला की प्रयोगशाळेत, याचीही माहिती कंपन्यांनी द्यावी.

खाद्यपदार्थ ज्या घटकांपासून बनविले आहेत, त्यानुसार त्यांच्यावर शाकाहारी किंवा मांसाहारी असा स्पष्ट उल्लेख करण्याचा आदेश संबंधित कंपन्यांना द्यावा, अशी याचिका राम गौ रक्षा दलाने उच्च न्यायालयात केली होती. त्यावरील सुनावणीप्रसंगी दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, खाद्यपदार्थ बनविताना वापरलेले घटक, त्यांचे मूळ याबद्दलची सविस्तर माहिती यापुढे कंपन्यांनी न दिल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.इन्स्टन्ट नूडल्समध्ये डिसोडियम इनोसिनेट हा वापरण्यात येणारा घटक मांस किंवा माशापासून बनवितात. मात्र ती माहिती ग्राहकांना नीट दिली जात नाही. तरीही काही कंपन्या हे खाद्यपदार्थ शाकाहारी असल्याचे सांगतात. या पद्धतीची लबाडी कोणीही करू नये, म्हणून दक्ष राहणे आवश्यक आहे, असे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे.  

शाकाहारी लोकांची कुचंबणा कोणत्या पदार्थांमध्ये मांसाहारी घटक वापरले जातात, याची यादी संबंधित विभागाचे अधिकारी करू शकलेले नाहीत. अशा गोष्टींमुळे नागरिकांच्या विशेषत: शाकाहारी पदार्थच खाणाऱ्या नागरिकांच्या हक्कांवर गदा येत आहे, असेही दिल्ली उच्च न्यायालयाने सांगितले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयfoodअन्न