शहरं
Join us  
Trending Stories
1
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
2
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
3
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
4
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
5
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
6
कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
7
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
8
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
9
शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी मातेच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य; २०२६ ची होणार स्वप्नवत सुरुवात!
10
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
11
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
12
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
13
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
14
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
15
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
16
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
17
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
18
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
19
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
20
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा लढण्यास वसुंधरा राजेंचा नकार; मनेका गांधींना हरियाणातील कर्नालला पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 05:15 IST

लोकसभेची आगामी निवडणूक लढण्यास परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी नकार दिल्यानंतर आता मनेका गांधी आणि वसुंधरा राजे यांनी भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासमोर प्रश्न उभा केला आहे.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : लोकसभेची आगामी निवडणूक लढण्यास परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी नकार दिल्यानंतर आता मनेका गांधी आणि वसुंधरा राजे यांनी भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासमोर प्रश्न उभा केला आहे.महिला आणि बालविकासमंत्री मनेका गांधी यांना त्यांच्या पिलिभीत या पारंपरिक मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवायची इच्छा नाही. त्यांना हरियाणातील कर्नाल मतदारसंघ हवा आहे. भाजपातील उच्च पातळीवरील सूत्रांनी ‘लोकमत’ला मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार मेनका गांधी यांनी अमित शहा यांची गेल्या आठवड्यात भेट घेतली. पिलिभीतमधील आजची राजकीय परिस्थिती हितकारक नाही, असे त्या शहा यांना म्हणाल्या.कर्नालमधील विद्यमान खासदार अश्विनी कुमार मीना यांनी कर्नालमधून लढण्यास असमर्थता व्यक्त केल्यामुळे त्यांच्या जागी माझा विचार व्हावा, अशी विनंती गांधी यांनी शहा यांना केली. तुमच्या विनंतीचा विचार केला जाईल, असे शहा यांनी सांगून राज्याच्या नेत्यांशी चर्चा करा, असा सल्ला त्यांना दिल्याचे समजते.राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यास स्पष्ट नकार दिला आहे. राजे यांनी लोकसभा निवडणूक लढवावी म्हणजे त्यातून योग्य तो संदेश जाईल व सर्व २५ जागा जिंकण्याची कामगिरी पुन्हा करता येईल, अशी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची इच्छा आहे; परंतु राजे यांनी स्पष्टपणे नकार देत मी माझा मुलगा दुष्यंत सिंह याच्या जागी जाणार नाही, असे ठामपणे सांगितले.दुष्यंत सिंह यांनी लोकसभा निवडणूक दोन वेळा जिंकली आहे. वसुंधरा राजे यांनी त्या राज्याच्या राजकारणातून दिल्लीत तळ हलविणार नाहीत, असे म्हटले.सपा, बसपा युतीने झोप उडविलीमनेका गांधी यांनी २०१४ मध्ये लोकसभा निवडणूक पिलिभीत मतदारसंघातून ५२ टक्के मते मिळवून फार मोठ्या फरकाने जिंकली होती. आता मात्र समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या युतीमुळे व त्यांना काँग्रेसचा पाठिंबा असल्यामुळे मनेका गांधींची झोप उडाली आहे.गांधी यांना ५.४६ लाख मते मिळाली होती, तर त्यांचे तीन विरोधक एकत्र आले, तर त्यांची मते ४.६६ लाखहोतात.आजच्या परिस्थितीत पिलिभीत सुरक्षित जागा राहिली नाही म्हणून त्यांना मतदारसंघ बदलून हवा आहे.

टॅग्स :Rajasthanराजस्थानLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९