शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा लढण्यास वसुंधरा राजेंचा नकार; मनेका गांधींना हरियाणातील कर्नालला पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 05:15 IST

लोकसभेची आगामी निवडणूक लढण्यास परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी नकार दिल्यानंतर आता मनेका गांधी आणि वसुंधरा राजे यांनी भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासमोर प्रश्न उभा केला आहे.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : लोकसभेची आगामी निवडणूक लढण्यास परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी नकार दिल्यानंतर आता मनेका गांधी आणि वसुंधरा राजे यांनी भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासमोर प्रश्न उभा केला आहे.महिला आणि बालविकासमंत्री मनेका गांधी यांना त्यांच्या पिलिभीत या पारंपरिक मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवायची इच्छा नाही. त्यांना हरियाणातील कर्नाल मतदारसंघ हवा आहे. भाजपातील उच्च पातळीवरील सूत्रांनी ‘लोकमत’ला मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार मेनका गांधी यांनी अमित शहा यांची गेल्या आठवड्यात भेट घेतली. पिलिभीतमधील आजची राजकीय परिस्थिती हितकारक नाही, असे त्या शहा यांना म्हणाल्या.कर्नालमधील विद्यमान खासदार अश्विनी कुमार मीना यांनी कर्नालमधून लढण्यास असमर्थता व्यक्त केल्यामुळे त्यांच्या जागी माझा विचार व्हावा, अशी विनंती गांधी यांनी शहा यांना केली. तुमच्या विनंतीचा विचार केला जाईल, असे शहा यांनी सांगून राज्याच्या नेत्यांशी चर्चा करा, असा सल्ला त्यांना दिल्याचे समजते.राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यास स्पष्ट नकार दिला आहे. राजे यांनी लोकसभा निवडणूक लढवावी म्हणजे त्यातून योग्य तो संदेश जाईल व सर्व २५ जागा जिंकण्याची कामगिरी पुन्हा करता येईल, अशी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची इच्छा आहे; परंतु राजे यांनी स्पष्टपणे नकार देत मी माझा मुलगा दुष्यंत सिंह याच्या जागी जाणार नाही, असे ठामपणे सांगितले.दुष्यंत सिंह यांनी लोकसभा निवडणूक दोन वेळा जिंकली आहे. वसुंधरा राजे यांनी त्या राज्याच्या राजकारणातून दिल्लीत तळ हलविणार नाहीत, असे म्हटले.सपा, बसपा युतीने झोप उडविलीमनेका गांधी यांनी २०१४ मध्ये लोकसभा निवडणूक पिलिभीत मतदारसंघातून ५२ टक्के मते मिळवून फार मोठ्या फरकाने जिंकली होती. आता मात्र समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या युतीमुळे व त्यांना काँग्रेसचा पाठिंबा असल्यामुळे मनेका गांधींची झोप उडाली आहे.गांधी यांना ५.४६ लाख मते मिळाली होती, तर त्यांचे तीन विरोधक एकत्र आले, तर त्यांची मते ४.६६ लाखहोतात.आजच्या परिस्थितीत पिलिभीत सुरक्षित जागा राहिली नाही म्हणून त्यांना मतदारसंघ बदलून हवा आहे.

टॅग्स :Rajasthanराजस्थानLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९