शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

लोकसभा लढण्यास वसुंधरा राजेंचा नकार; मनेका गांधींना हरियाणातील कर्नालला पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 05:15 IST

लोकसभेची आगामी निवडणूक लढण्यास परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी नकार दिल्यानंतर आता मनेका गांधी आणि वसुंधरा राजे यांनी भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासमोर प्रश्न उभा केला आहे.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : लोकसभेची आगामी निवडणूक लढण्यास परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी नकार दिल्यानंतर आता मनेका गांधी आणि वसुंधरा राजे यांनी भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासमोर प्रश्न उभा केला आहे.महिला आणि बालविकासमंत्री मनेका गांधी यांना त्यांच्या पिलिभीत या पारंपरिक मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवायची इच्छा नाही. त्यांना हरियाणातील कर्नाल मतदारसंघ हवा आहे. भाजपातील उच्च पातळीवरील सूत्रांनी ‘लोकमत’ला मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार मेनका गांधी यांनी अमित शहा यांची गेल्या आठवड्यात भेट घेतली. पिलिभीतमधील आजची राजकीय परिस्थिती हितकारक नाही, असे त्या शहा यांना म्हणाल्या.कर्नालमधील विद्यमान खासदार अश्विनी कुमार मीना यांनी कर्नालमधून लढण्यास असमर्थता व्यक्त केल्यामुळे त्यांच्या जागी माझा विचार व्हावा, अशी विनंती गांधी यांनी शहा यांना केली. तुमच्या विनंतीचा विचार केला जाईल, असे शहा यांनी सांगून राज्याच्या नेत्यांशी चर्चा करा, असा सल्ला त्यांना दिल्याचे समजते.राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यास स्पष्ट नकार दिला आहे. राजे यांनी लोकसभा निवडणूक लढवावी म्हणजे त्यातून योग्य तो संदेश जाईल व सर्व २५ जागा जिंकण्याची कामगिरी पुन्हा करता येईल, अशी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची इच्छा आहे; परंतु राजे यांनी स्पष्टपणे नकार देत मी माझा मुलगा दुष्यंत सिंह याच्या जागी जाणार नाही, असे ठामपणे सांगितले.दुष्यंत सिंह यांनी लोकसभा निवडणूक दोन वेळा जिंकली आहे. वसुंधरा राजे यांनी त्या राज्याच्या राजकारणातून दिल्लीत तळ हलविणार नाहीत, असे म्हटले.सपा, बसपा युतीने झोप उडविलीमनेका गांधी यांनी २०१४ मध्ये लोकसभा निवडणूक पिलिभीत मतदारसंघातून ५२ टक्के मते मिळवून फार मोठ्या फरकाने जिंकली होती. आता मात्र समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या युतीमुळे व त्यांना काँग्रेसचा पाठिंबा असल्यामुळे मनेका गांधींची झोप उडाली आहे.गांधी यांना ५.४६ लाख मते मिळाली होती, तर त्यांचे तीन विरोधक एकत्र आले, तर त्यांची मते ४.६६ लाखहोतात.आजच्या परिस्थितीत पिलिभीत सुरक्षित जागा राहिली नाही म्हणून त्यांना मतदारसंघ बदलून हवा आहे.

टॅग्स :Rajasthanराजस्थानLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९