शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

निकालापूर्वीच राजस्थानमध्ये हालचालींना वेग! बंडखोर, अपक्ष उमेदवारांशी संपर्क, वसुंधरा राजे ॲक्शनमोडमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 13:24 IST

देशातील पाच राज्यातील विधानसभेचा निकाल उद्या रविवारी समोर येणार आहेत. ससर्वच पक्षांनी या निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली होती.

देशातील पाच राज्यातील विधानसभेचा निकाल उद्या रविवारी समोर येणार आहेत. ससर्वच पक्षांनी या निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली होती. दोन दिवसापूर्वी या राज्यांचा एक्झिट पोल समोर आले असून यात भाजप आणि काँग्रेसमध्ये काटावर चक्कर असल्याचे दाखवले होते, यामुळे आता सर्वच पक्षांनी अपक्ष आणि बंडखोर आमदारांसोबत संपर्क वाढवला आहे. राजस्थानमध्येही भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार लढत असून आता वसुंधरा राजे ॲक्शनमोडमध्ये आल्या असल्याचे बोलले जात आहे. 

गहलोत यांच्यानंतर वसुंधरा राजेंनीही घेतली राज्यपालांची भेट; निकालांआधी हालचाली वाढल्या

एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला भाजपपेक्षा काटावर आघाडी असल्याचे दाखवले आहे.आता दोन्ही पक्षांचे नेते सक्रिय झाले आहेत. वसुंधरा राजे यांनी स्वत: भाजपची आघाडी हाती घेतली आहे, तर अशोक गेहलोत काँग्रेसकडून रिंगणात आहेत. दोन्ही नेते अपक्ष उमेदवार आणि बंडखोरांशी संपर्क साधत आहेत. त्रिशंकू झाल्यास बहुमताचे आकडे करण्यासाठी या आमदारांचा वापर होऊ शकतो.  वसुंधरा राजे सिंधिया यांनी शुक्रवारी सांचोरचे माजी आमदार आणि यावेळी अपक्ष म्हणून निवडणूक लढविणारे जीवराम चौधरी यांना फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. जीवराम चौधरी यांनी वसुंधरा यांना विजयाचे प्रमाणपत्र घेऊन जयपूरला येत असल्याचे सांगितले. जालोरच्या सांचोर विधानसभा मतदारसंघातून भाजपविरोधात बंडखोरी केलेले जीवराम चौधरी यांनी सलग दुसऱ्यांदा अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आहे. 

सांचोरमध्ये जीवराम यांची थेट स्पर्धा काँग्रेसच्या सुखराम विश्नोई यांच्याशी आहे. "दोन दिवसांपूर्वी अशोक गेहलोत यांचाही फोन आला होता",असे ते म्हणाले. जीवराम चौधरी यांना मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचाही फोन आल्याचा दावा त्यांचे समर्थक करत आहेत. गेहलोत यांनी जीवराम यांना जयपूर येथे भेटण्यास सांगितले होते. याबाबत जीवराम चौधरी यांना विचारले असता ३ डिसेंबरलाच आपली बाजू मांडणार असल्याचे सांगितले. सांचोरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था आणि नर्मदेच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणारे जीवराम चौधरी मजबूत दिसत आहेत, त्यामुळे जयपूरमधून त्यांना मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्र्यांचे फोन येत आहेत.

काँग्रेस, भाजप बंडखोरांशी संपर्कात

बारमेर जिल्ह्यात पक्षाच्या नेत्यांनी भाजप बंडखोर रवींद्र सिंह भाटी आणि प्रियंका चौधरी यांच्याशी संपर्क साधला आहे. या दोघांशीही काँग्रेसने संपर्क साधला आहे. काँग्रेसच्या आणखी दोन बंडखोरांवरही भाजपची नजर आहे. रवींद्र भाटी आणि प्रियंका चौधरी यांनी सांगितले की, त्यांना भाजप आणि काँग्रेस नेत्यांचे फोन येत आहेत. 

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकElectionनिवडणूकResult Day Assembly Electionनिकाल दिवस विधानसभा निवडणूक