शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

१०५ वर्षांच्या वृद्धानं मरणाच्या ठिक ३० मिनिटं आधी पूर्ण केली आपली शेवटची इच्छा, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 12:04 IST

झारखंडमधील हजारीबाग पंचायतीच्या बेलाही येथील परतापूर गावात राहणारे वरुण साहू (105) यांनी शेवटच्या क्षणी मतदान करून जगाचा निरोप घेतला.

चौपारण, हजारीबाग-

झारखंडमधील हजारीबाग पंचायतीच्या बेलाही येथील परतापूर गावात राहणारे वरुण साहू (105) यांनी शेवटच्या क्षणी मतदान करून जगाचा निरोप घेतला. वरुण साहू यांचे त्यांच्या आयुष्यातील शेवटची इच्छा म्हणजेच मतदानाच्या अर्ध्या तासानंतर घरीच निधन झाले. एक जबाबदार नागरिकाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापूर्वी वरुण साहू यांनी पंचायत निवडणुकीत मतदान केले. त्यानंतर त्यांनी घरी येऊन अखेरचा श्वास घेतला. मतदान करण्याची आपली शेवटची इच्छा असल्याचे त्यांनी कुटुंबीयांना आधीच सांगितले होतं, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते गजाधर प्रसाद यांनी दिली. 

105 वर्षीय वरुण साहू यांनी बेलाही पंचायतीच्या बूथ क्रमांक 256 वर मतदान केलं त्यानंतर घरी परतल्यावर दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूपूर्वी ते म्हणाले की, ''मी भाग्यवान आहे की या वयातही मी लोकशाहीत माझा सहभाग सुनिश्चित करू शकलो". आयुष्याच्या शेवटच्या क्षणी वरुण साहू यांनी मतदान करून लोकांमध्ये एक आदर्श निर्माण करण्याचं काम केलं आहे. वरुण यांच्या पश्चात दोन मुलांसह संपूर्ण कुटुंब आहे. त्यांच्या दोन्ही मुलांचा मुंबईत भाजीचा व्यवसाय आहे. वरुण साहू यांनी त्यांच्या घरी सांगितलं होतं की, माझी शेवटची इच्छा आहे की मला मतदानासाठी जाता यावं. यानंतर कुटुंबीयांनी त्यांच्या आग्रहापुढे नमतं घेत त्यांना गाडीवर बसवून मतदान करण्यासाठी नेलं होतं.  

वरुण साहू बराच काळ आजारी होते, पण तरीही त्यांची शेवटची इच्छा पूर्ण झाल्यावरच त्यांनी प्राण सोडले. यावरुनच लोकशाहीबद्दलची त्यांची जिद्द आणि परिभाषा लक्षात येते. शनिवारी सकाळपासूनच वरुण यांनी मतदानाला जाण्याचा हट्ट धरला होता. यावेळी त्यांच्यासोबत दोन्ही मुलंही होती. अखेर त्यांचा आग्रह पाहून वरुण यांना दुपारी २.४५ वाजता मतदान केंद्रावर नेण्यात आलं. यावेळी त्यांनी कारमध्ये बसून मतदान केलं. यानंतर ते घरी परतले आणि अर्ध्या तासात त्यांनी जगाचा निरोप घेतला.

टॅग्स :VotingमतदानJharkhandझारखंड