शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
5
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
6
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
7
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
8
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
9
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
10
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
11
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
12
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
13
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
14
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
15
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
16
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
17
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

१०५ वर्षांच्या वृद्धानं मरणाच्या ठिक ३० मिनिटं आधी पूर्ण केली आपली शेवटची इच्छा, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 12:04 IST

झारखंडमधील हजारीबाग पंचायतीच्या बेलाही येथील परतापूर गावात राहणारे वरुण साहू (105) यांनी शेवटच्या क्षणी मतदान करून जगाचा निरोप घेतला.

चौपारण, हजारीबाग-

झारखंडमधील हजारीबाग पंचायतीच्या बेलाही येथील परतापूर गावात राहणारे वरुण साहू (105) यांनी शेवटच्या क्षणी मतदान करून जगाचा निरोप घेतला. वरुण साहू यांचे त्यांच्या आयुष्यातील शेवटची इच्छा म्हणजेच मतदानाच्या अर्ध्या तासानंतर घरीच निधन झाले. एक जबाबदार नागरिकाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापूर्वी वरुण साहू यांनी पंचायत निवडणुकीत मतदान केले. त्यानंतर त्यांनी घरी येऊन अखेरचा श्वास घेतला. मतदान करण्याची आपली शेवटची इच्छा असल्याचे त्यांनी कुटुंबीयांना आधीच सांगितले होतं, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते गजाधर प्रसाद यांनी दिली. 

105 वर्षीय वरुण साहू यांनी बेलाही पंचायतीच्या बूथ क्रमांक 256 वर मतदान केलं त्यानंतर घरी परतल्यावर दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूपूर्वी ते म्हणाले की, ''मी भाग्यवान आहे की या वयातही मी लोकशाहीत माझा सहभाग सुनिश्चित करू शकलो". आयुष्याच्या शेवटच्या क्षणी वरुण साहू यांनी मतदान करून लोकांमध्ये एक आदर्श निर्माण करण्याचं काम केलं आहे. वरुण यांच्या पश्चात दोन मुलांसह संपूर्ण कुटुंब आहे. त्यांच्या दोन्ही मुलांचा मुंबईत भाजीचा व्यवसाय आहे. वरुण साहू यांनी त्यांच्या घरी सांगितलं होतं की, माझी शेवटची इच्छा आहे की मला मतदानासाठी जाता यावं. यानंतर कुटुंबीयांनी त्यांच्या आग्रहापुढे नमतं घेत त्यांना गाडीवर बसवून मतदान करण्यासाठी नेलं होतं.  

वरुण साहू बराच काळ आजारी होते, पण तरीही त्यांची शेवटची इच्छा पूर्ण झाल्यावरच त्यांनी प्राण सोडले. यावरुनच लोकशाहीबद्दलची त्यांची जिद्द आणि परिभाषा लक्षात येते. शनिवारी सकाळपासूनच वरुण यांनी मतदानाला जाण्याचा हट्ट धरला होता. यावेळी त्यांच्यासोबत दोन्ही मुलंही होती. अखेर त्यांचा आग्रह पाहून वरुण यांना दुपारी २.४५ वाजता मतदान केंद्रावर नेण्यात आलं. यावेळी त्यांनी कारमध्ये बसून मतदान केलं. यानंतर ते घरी परतले आणि अर्ध्या तासात त्यांनी जगाचा निरोप घेतला.

टॅग्स :VotingमतदानJharkhandझारखंड