शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

१०५ वर्षांच्या वृद्धानं मरणाच्या ठिक ३० मिनिटं आधी पूर्ण केली आपली शेवटची इच्छा, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 12:04 IST

झारखंडमधील हजारीबाग पंचायतीच्या बेलाही येथील परतापूर गावात राहणारे वरुण साहू (105) यांनी शेवटच्या क्षणी मतदान करून जगाचा निरोप घेतला.

चौपारण, हजारीबाग-

झारखंडमधील हजारीबाग पंचायतीच्या बेलाही येथील परतापूर गावात राहणारे वरुण साहू (105) यांनी शेवटच्या क्षणी मतदान करून जगाचा निरोप घेतला. वरुण साहू यांचे त्यांच्या आयुष्यातील शेवटची इच्छा म्हणजेच मतदानाच्या अर्ध्या तासानंतर घरीच निधन झाले. एक जबाबदार नागरिकाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापूर्वी वरुण साहू यांनी पंचायत निवडणुकीत मतदान केले. त्यानंतर त्यांनी घरी येऊन अखेरचा श्वास घेतला. मतदान करण्याची आपली शेवटची इच्छा असल्याचे त्यांनी कुटुंबीयांना आधीच सांगितले होतं, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते गजाधर प्रसाद यांनी दिली. 

105 वर्षीय वरुण साहू यांनी बेलाही पंचायतीच्या बूथ क्रमांक 256 वर मतदान केलं त्यानंतर घरी परतल्यावर दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूपूर्वी ते म्हणाले की, ''मी भाग्यवान आहे की या वयातही मी लोकशाहीत माझा सहभाग सुनिश्चित करू शकलो". आयुष्याच्या शेवटच्या क्षणी वरुण साहू यांनी मतदान करून लोकांमध्ये एक आदर्श निर्माण करण्याचं काम केलं आहे. वरुण यांच्या पश्चात दोन मुलांसह संपूर्ण कुटुंब आहे. त्यांच्या दोन्ही मुलांचा मुंबईत भाजीचा व्यवसाय आहे. वरुण साहू यांनी त्यांच्या घरी सांगितलं होतं की, माझी शेवटची इच्छा आहे की मला मतदानासाठी जाता यावं. यानंतर कुटुंबीयांनी त्यांच्या आग्रहापुढे नमतं घेत त्यांना गाडीवर बसवून मतदान करण्यासाठी नेलं होतं.  

वरुण साहू बराच काळ आजारी होते, पण तरीही त्यांची शेवटची इच्छा पूर्ण झाल्यावरच त्यांनी प्राण सोडले. यावरुनच लोकशाहीबद्दलची त्यांची जिद्द आणि परिभाषा लक्षात येते. शनिवारी सकाळपासूनच वरुण यांनी मतदानाला जाण्याचा हट्ट धरला होता. यावेळी त्यांच्यासोबत दोन्ही मुलंही होती. अखेर त्यांचा आग्रह पाहून वरुण यांना दुपारी २.४५ वाजता मतदान केंद्रावर नेण्यात आलं. यावेळी त्यांनी कारमध्ये बसून मतदान केलं. यानंतर ते घरी परतले आणि अर्ध्या तासात त्यांनी जगाचा निरोप घेतला.

टॅग्स :VotingमतदानJharkhandझारखंड