शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

खासगीकरणाच्या नावावर सगळे विकणे सुरू आहे; वरुण गांधी यांची केंद्र सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 06:15 IST

गेल्या काही दिवसांमध्ये वरुण गांधींनी योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर लखीमपूर हिंसेवरून चौफैर टीका केली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : भाजपच्या प्रमुख युवक नेत्यांपैकी एक वरूण गांधी गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज असून, ते केंद्र सरकारने घेतलेले निर्णय, तसेच पक्ष धोरणांविरोधात सातत्याने आणि जाहीरपणे टीका करत आहेत. या पार्श्वभूमीवर वरूण गांधी लवकरच तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून सुरू असलेल्या खासगीकरणावरही त्यांनी टीका केली आहे. 

वरूण गांधी यांनी पिलभीत येथील गांधी सभागृहात व्यापाऱ्यांशी संवाद साधताना खासगीकरणामुळे कोट्यवधी लोकांचा रोजगार धोक्यात असल्याचे म्हटले आणि खासगीकरणाच्या नावावर सगळे विकले चालले आहे. हा सरकारचा मोठा डाव असल्याचे ते म्हणाले. खासगीकरण आणि ई-कॉमर्सच्या माध्यमातून होत असलेल्या सर्वच आर्थिक व्यवहारांमुळे देशाची अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. प्रत्येक गोष्टीला फायद्याच्या तराजूत मोजणे योग्य नाही. सरकारी नोकरी देण्याऐवजी नोकऱ्या काढून घ्यायचे काम करत आहे. त्यामुळेच आजचा तरुण रोजगाराच्या शोधात भटकतो आहे. माझ्यासाठी देश सर्वप्रथम असून राजकारण नंतर, देशासाठी काहीही करायची माझी तयारी आहे, असे गांधी म्हणाले.

मंत्रिमंडळात डावलल्याने नाराज...

- केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात स्थान न मिळाल्याने वरुण गांधी नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच भाजपच्या कार्यकारिणीमधूनही वरुण गांधी आणि त्यांची आई मनेका गांधी यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. 

- तेव्हापासून वरुण गांधी भाजपविरोधात अधिकच आक्रमक झाले आहेत. त्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर लखीमपूर हिंसेवरून चौफैर टीका केली होती. 

टॅग्स :Varun Gandhiवरूण गांधीCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपा