शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

"जूनपर्यंत सर्व राज्यांत पोहोचेल वंदे भारत ट्रेन", अश्विनी वैष्णव यांचं मोठं विधान  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 20:31 IST

राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हे वक्तव्य केले.

नवी दिल्ली : रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी वंदे भारत ट्रेनबाबत मोठी घोषणा केली. ते म्हणाले की, वंदे भारत ट्रेन जूनपर्यंत सर्व राज्यांना कव्हर करतील. पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत 200 शहरे वंदे भारतशी जोडण्याचे आमचे ध्येय आहे.

राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले,  भारताची 'वंदे भारत ट्रेन' ही जागतिक दर्जाची ट्रेन बनली आहे, जी ताशी 160-180 किमी वेगाने धावते. अशा ट्रेन तयार करण्याची क्षमता जगातील फक्त 8 देशांमध्ये आहे.

दरम्यान, 2004 ते 2014 हे दशक भारतासाठी हरवलेले दशक असल्याचे सांगत त्यांनी मागील काँग्रेस सरकारवर निशाणा साधला. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने बरीच प्रगती केली आणि भारताची अर्थव्यवस्था जगात 5 व्या क्रमांकावर आणली, असे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले. 

याशिवाय, 2026 पर्यंत आपण चौथ्या क्रमांकावर असू आणि 2027-28 मध्ये जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांपैकी एक असू, असेही रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले. तसेच, ते म्हणाले की, दूरसंचार तंत्रज्ञानासाठी भारत नेहमीच जगावर अवलंबून होता, परंतु आज 'मेड इन इंडिया'मुळे भारताचे तंत्रज्ञान जगातील सर्वात समृद्ध देशांमध्ये निर्यात होत आहे.

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसAshwini Vaishnawअश्विनी वैष्णवrailwayरेल्वे