शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
3
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
4
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
5
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
6
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
7
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
8
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
9
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
10
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
11
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
12
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
13
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...
14
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
15
बीड: पालकांचे पैसे वाचणार; गावातच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची घरपट्टी, नळपट्टी माफ
16
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
17
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
18
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
20
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story

वंदे मातरम् न म्हणणे म्हणजे देशद्रोह नाही-  केंद्रीय मंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2017 12:46 IST

वंदे मातरम् या गीतावरून सुरू असलेल्या वादात आता केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनीही उडी घेतली आहे.

ठळक मुद्दे वंदे मातरम् या गीतावरून सुरू असलेल्या वादात आता केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनीही उडी घेतलीजर एखादी व्यक्ती वंदे मातरम् गात नसल्यास ती व्यक्ती देशद्रोही किंवा राष्ट्रविरोधी असल्याचं ठरवू शकत नाहीमात्र वंदे मातरम् या गीताला विरोध करणं हेसुद्धा चुकीचेच आहे

नवी दिल्ली, दि. 30 - वंदे मातरम् या गीतावरून सुरू असलेल्या वादात आता केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनीही उडी घेतली आहे. वंदे मातरम् हे गीत म्हणणं हे प्रत्येकाच्या आवडीनिवडीशी निगडित आहे. जे लोक वंदे मातरम् हे गीत गात नाहीत, त्यांना देशद्रोही ठरवता येणार नाही. मात्र वंदे मातरम् या गीताला विरोध करणं हेसुद्धा चुकीचेच आहे, असंही नक्वी म्हणाले आहेत. 

केंद्रीय अल्पसंख्याक राज्यमंत्री नक्वी म्हणाले, वंदे मातरम् गीत म्हणणं एका व्यक्तीच्या आवडीशी संबंधित आहे, मात्र वंदे मातरमला विरोध करणं ही देशभक्ती ठरू शकत नाही. जर एखादी व्यक्ती वंदे मातरम् गात नसल्यास ती व्यक्ती देशद्रोही किंवा राष्ट्रविरोधी असल्याचं ठरवू शकत नाही. वंदे मातरम् हे गीत गाणं हे व्यक्तीच्या स्वातंत्र्येचा एक भाग आहे. पण तरीही एखादी व्यक्ती जाणूनबुजून वंदे मातरमला विरोध करत असल्यास ती त्या व्यक्तीची मानसिकता दर्शवते. मुख्तार अब्बास नक्वी यांनी अबू आझमींवर टीकेची झोड उडवली आहे. 

दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्र विधानसभेत वंदे मातरम म्हणण्यावरून वाद निर्माण झाला होता. मी ‘वंदे मातरम्’चा सन्मान करतो, पण देशातील कोणताही सच्चा मुसलमान कधीही ‘वंदे मातरम्’ म्हणणार नाही, मग मला देशातून बाहेर काढले तरी चालेल असे वादग्रस्त विधान समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी केले होते. त्यानंतर राज्याच्या विधानसभेत ‘वंदे मातरम्’चा मुद्दा चांगलाच गाजला. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी या मुद्द्यावरून अबू आझमींवर जोरदार हल्लाबोल केला. काय झालं विधानसभेत- औचित्याच्या मुद्द्यावर भाजपाचे आमदार अनिल गोटे यांनी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी काल माध्यमांमध्ये वंदे मातरम् गीतासंबधी केलेल्या वक्तव्याचा मुद्दा उपस्थित केला. या देशात राहून वंदे मातरम गायला विरोध केला जातोय. या देशात राहणाऱ्यांना वंदे मातरम म्हणावंच लागेल असं गोटे म्हणाले. यावर आझमींनी उत्तर देण्याची परवानगी मागितली. त्यावेळी सत्ताधारी आमदारांनी गोंधळ सुरू केला. अबू आझमी वेलमध्ये उतरले. दोन्ही बाजूंनी  आमदारांच्या घोषणा सुरू होत्या.  यानंतर आझमी म्हणाले, त्यांनी इतिहासाचा दाखला दिला, देशासाठी अनेक मुस्लिमांनी बलिदान दिलं,  या देशात मोहब्बत फक्त गीत गाऊन होणार नाही. मुस्लीम आहे म्हणून विरोध का करता ? सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा हे गीत कोणी लिहले ? शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम नव्हते काय ? अफजल खानाच्या भेटीवेळी शिवाजी महाराजांचे वकिल कोण होते ? इंग्रजांच्या विरोधात लढणारे टिपू सुलतान कोण होते ? त्यामुळे आम्ही देशविरोधी आहोत असं पसरवू नका, माझ्या म्हणण्याचा चुकिचा अर्थ काढला जात आहे. सारे जहाँसे अच्छा, हिंदोस्ता हमारा, हिंदुस्थान झिंदाबादचा नारा आम्ही एकवेळ नाही तर हजारवेळा देऊ, पण वंदे मातरम म्हणणार नाही.यानंतर एकनाथ खडसेंनी अबू आझमींवर जोरदार हल्लाबोल केला. देशाच्या स्वातंत्र्याची लढाई वंदे मातरम् या गीताने झाली आहे.  तर तुम्हाला आक्षेप का? मेल्यानंतर या जमिनीत पुरावं लागतं. जिथे तुम्ही वाढला, लहानाचं मोठं झाला,मृत्यूनंतरही याच मातीत अत्यंसंस्कार होणार, इथलेच कफन घ्यावं लागणार, इथलीच हवा, इथलेच पाणी फुकट मिळतं मग त्या मातीला नमन करायला, या देशाला सलाम करायला काय अडचण आहे ? असं म्हणत खडसे यांनी इस देश मे रहेना होगा तो वंदे मातरम् कहना होगा असं ठणकावलं.