शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
2
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
3
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
4
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
5
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
6
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
7
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
8
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
9
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
10
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
11
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
12
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
13
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा
14
विजेच्या धक्क्याने तडफडत होता मुलगा, लोकांची जवळ जाण्याची होत नव्हती हिंमत, तेवढ्यात एक तरुण धावला आणि...  
15
१० हजारांच्या आत AI, ५जी फोन; सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा पण चकीत केले; कसा आहे A95?
16
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
17
इकडून सोने टाका अन् तिकडून पैसे काढा.. सोने खरेदी-विक्रीसाठी बाजारात आलंय ATM
18
शर्मिष्ठा राऊतच्या घरी पाळणा हलला! लग्नानंतर ४ वर्षांनी अभिनेत्री झाली आई, थाटामाटात केलं बारसं
19
भारतीय संशोधकांनी लावलेल्या शोधाचा चीनने घेतला लाभ, अमेरिका, रशियाही अवाक्, भारताने संधी दवडली  
20
दुर्दैवी! टॅम्पोचा अपघात; मदत करण्याऐवजी तेल लुटण्यासाठी उडाली झुंबड, क्लिनरचा जागीच मृत्यू

'वक्फ कायद्याच्या नावाखाली लोकांना भडकवले जातेय, हिंदूंना घराबाहेर...'; मुर्शिदाबाद हिंसाचारावरून CM योगींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 19:00 IST

विरोधकांवर निशाणा साधताना योगी म्हणाले, या लोकांना भीती वाटते, की जर गरिबांना उंच इमारती मिळाल्या, तर यांची व्होट बँक नष्ट होईल. म्हणूनच हे लोक हिंसाचार भडकावत आहेत...

केंद्रातील मोदी सरकारने नुकत्याच केलेल्या वक्फ कायद्याच्या मुद्द्यावरून पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे हिंसाचार उसळला आहे. यानंतर अनेक ठिकाणी तणावाचे वातावरण आहे. या हिंसाचारात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला असून १५० जणांना अटक करण्यात आली आहे. यामुद्द्यावरून आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर थेट निशाणा साधला. त्यांनी पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमधील हिंसाचाराचा उल्लेक करत विरोधकांवर हिंसा भडकवण्याचा आरोप केला. तसेच, तेथे तीन हिंदूंची घरातून ओढून निर्घृन हत्या  केली गेली, असे म्हटले आहे. ते लखनौ येथे एका कार्यक्रमात बोलत होते.  

लखनौ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान अभियानांतर्गत आयोजित प्रदेश कार्यशाळेत भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, 'वक्फ कायद्यावरून हिंसाचार भडकवला जात आहे. मुर्शिदाबादमध्ये तीन हिंदूंची घरातून बाहेर काढून निर्घृण हत्या करण्यात आली. हे लोक कोण आहेत? दलित, वंचित आहेत. त्यांना या जमिनीचा लाभ मिळणार आहे. जर ही जमीन महसूल नोंदींमध्ये परत आली तर गरीबांनाच उंच इमारतीचा फायदा मिळेल. एक चांगला फ्लॅट मिळेल.''विरोधकांना भीती वाटतेय' -विरोधकांवर निशाणा साधताना योगी म्हणाले, या लोकांना भीती वाटते, की जर गरिबांना उंच इमारती मिळाल्या, तर यांची व्होट बँक नष्ट होईल. म्हणूनच हे लोक हिंसाचार भडकावत आहेत.

सीएएचा उल्लेख करत योगी म्हणाले, 'जर जगात कुठेही हिंदूवर अत्याचार झाला तर तो भारतात येईल. मात्र, काँग्रेस-सपा आणि तृणमूल काँग्रेस सारखे पक्ष नेहमीच याला अडथळा निर्माण कत आले. त्यांनी नेहमीच अशा लोकांना दुय्यम दर्जाचे नागरिक बनवण्याचे काम केले. त्यांना निर्वासित म्हणून ठेवण्यात आले होते, मात्र भाजपने त्यांचा स्वीकार केला. याच पद्धतीने हे लोक वक्फ कायद्यावरूनही हिंसाचार करत आहेत.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथwaqf board amendment billवक्फ बोर्डHinduहिंदूwest bengalपश्चिम बंगाल