शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

लसीशी संबंधित मृत्यू ही आमची जबाबदारी नाही, कोविडबाबत केंद्राचे कोर्टात शपथपत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2022 08:32 IST

कोविडबाबत केंद्राचे कोर्टात शपथपत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोविड लसीकरणाच्या प्रतिकूल परिणामांसाठी सरकारला जबाबदार धरता येणार नाही, असे केंद्र सरकारनेसर्वोच्च न्यायालयात सांगितले. लसीमुळे मृत्यू झाल्याचे आढळल्यास दिवाणी न्यायालयात दावा दाखल करून नुकसान भरपाई मिळवणे हाच एकमेव उपाय आहे, असे केंद्राने अलीकडेच न्यायालयात दाखल केलेल्या शपथपत्रात म्हटले आहे. 

गेल्यावर्षी कोविड लसीकरणानंतर मरण पावलेल्या दोन तरुणींच्या पालकांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्याच्या उत्तरादाखल केंद्राने हे शपथपत्र दाखल केले. या मृत्यूंची स्वतंत्रपणे चौकशी करण्यात यावी. लसीकरणाच्या प्रतिकूल परिणामांचा (एईएफआय) लवकर छडा लावण्यासाठी तसेच त्यावर वेळेवर उपचार होतील यासाठी तज्ज्ञ वैद्यकीय मंडळामार्फत एक प्रोटोकॉल तयार करावा, अशी मागणी याचिकेत केली होती. 

लसीकरणानंतर २,७८२ जणांची प्रकृती गंभीरn सरकारने सांगितले, की लोकांना दिलेल्या एकूण डोसच्या तुलनेत याचे प्रमाण खूपच कमी होते. n १९ नोव्हेंबर २०२२ पर्यंत देशात कोविड-१९ लसींचे २१९.८६ कोटी डोस दिले. त्यात केवळ ९२११४ एईएफआय नोंदवले गेले. n यापैकी ८९,३३२ किरकोळ स्वरूपाचे एईएफआय होते, तर केवळ २७८२ गंभीर होते. यात काहींचा मृत्यू ओढवला, असे म्हटले आहे.n तरुणींच्या मृत्यूंबद्दल शोक व्यक्त करताना केंद्राने म्हटले की, राष्ट्रीय एईएफआय समितीला यातील केवळ एका प्रकरणात मृत्यूचे कारण लसीशी संबंधित असल्याचे आढळले आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकारCorona vaccineकोरोनाची लस