शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

व्ही. के. शशिकलांना महासचिव पदावरून हटवलं, AIADMKचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 14:21 IST

तामिळनाडूच्या राजकारणातून शशिकलांना जवळपास बाहेरचाच रस्ता दाखवण्यात आला आहे. AIADMKनं मंगळवारी व्ही. के. शशिकला यांना पार्टीच्या महासचिवपदावरून हटवलं आहे. त्यांचं महासचिवपद काढून घेण्यात आलं आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी बोलावलेल्या जनरल काऊन्सिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

चेन्नई, दि. 12 - तामिळनाडूच्या राजकारणातून शशिकलांना जवळपास बाहेरचाच रस्ता दाखवण्यात आला आहे. AIADMKनं मंगळवारी व्ही. के. शशिकला यांना पार्टीच्या महासचिवपदावरून हटवलं आहे. त्यांचं महासचिवपद काढून घेण्यात आलं आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी बोलावलेल्या जनरल काऊन्सिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्नुसार, शशिकलाचे भाचे आणि खासदार टीटीव्ही दिनाकरन यांनाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.तत्पूर्वी तामिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री पनीरसेल्वम यांनी एक बैठक घेतली होती. दोघांनाही बाहेरचा रस्ता दाखवणे हाच या बैठकीचा उद्देश होता. तसेच शशिकला आणि दिनाकरन यांनी घेतलेले निर्णय हे पक्षाला लागू होणार नाहीत, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच दिनाकरन यांना पाठिंबा देणा-या 14 आमदारांनी बहुतम सिद्ध करण्याची मागणी केली असून, त्यांनी राज्यपालांचीही भेट घेतली आहे. शशिकला उत्पन्नाहून अधिक संपत्ती जमवल्यामुळे तुरुंगात आहे. तर दिनाकरन यांना लाच दिल्याच्या प्रकरणात सीबीआयच्या चौकशीला सामोरं जावं लागतंय. दिनाकरनवर पक्षाच्या चिन्हासाठी लाच दिल्याचा आरोप आहे. तर प्रकृती अस्वास्थ्यापायी शशिकलांचे पती रुग्णालयात उपचार घेत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी व माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम गटांचे विलीनीकरण झाले आहे. सरचिटणीस शशिकला यांना पदावरून व पक्षातून दूर करण्याबाबतही त्यांच्यात एकमत झाले आहे.

समझोत्याचा भाग म्हणून पक्षाचे समन्वयक म्हणून पनीरसेल्वम यांना नेमण्यात आले असून, मुख्यमंत्री उपसमन्वयक असतील. त्यांचा राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणूनही शपथविधी पार पडला. पनीरसेल्वम यांच्याकडे अर्थ खात्याबरोबरच गृहनिर्माणाशी संबंधित चार खाती तसेच झोपडपट्टी पुनर्वसन आणि शहर नियोजन ही खाती देण्यात आली आहेत. त्यांचे विश्वासू के. पांडियराजन यांचाही शपथविधी पार पडला. याशिवाय पनीरसेल्वम गटाला आणखी मंत्रिपदे मिळणार आहेत. माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर शशिकला यांनी पक्षाचा ताबा घेतल्यामुळे आणि पनीरसेल्वम यांना दूर करून पलानीस्वामी यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतल्याने पक्षात फूट पडली होती. पण आता त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना पक्षात कोणतेही स्थान असणार नाही.