शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

व्ही. के. शशिकलांना महासचिव पदावरून हटवलं, AIADMKचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 14:21 IST

तामिळनाडूच्या राजकारणातून शशिकलांना जवळपास बाहेरचाच रस्ता दाखवण्यात आला आहे. AIADMKनं मंगळवारी व्ही. के. शशिकला यांना पार्टीच्या महासचिवपदावरून हटवलं आहे. त्यांचं महासचिवपद काढून घेण्यात आलं आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी बोलावलेल्या जनरल काऊन्सिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

चेन्नई, दि. 12 - तामिळनाडूच्या राजकारणातून शशिकलांना जवळपास बाहेरचाच रस्ता दाखवण्यात आला आहे. AIADMKनं मंगळवारी व्ही. के. शशिकला यांना पार्टीच्या महासचिवपदावरून हटवलं आहे. त्यांचं महासचिवपद काढून घेण्यात आलं आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी बोलावलेल्या जनरल काऊन्सिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्नुसार, शशिकलाचे भाचे आणि खासदार टीटीव्ही दिनाकरन यांनाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.तत्पूर्वी तामिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री पनीरसेल्वम यांनी एक बैठक घेतली होती. दोघांनाही बाहेरचा रस्ता दाखवणे हाच या बैठकीचा उद्देश होता. तसेच शशिकला आणि दिनाकरन यांनी घेतलेले निर्णय हे पक्षाला लागू होणार नाहीत, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच दिनाकरन यांना पाठिंबा देणा-या 14 आमदारांनी बहुतम सिद्ध करण्याची मागणी केली असून, त्यांनी राज्यपालांचीही भेट घेतली आहे. शशिकला उत्पन्नाहून अधिक संपत्ती जमवल्यामुळे तुरुंगात आहे. तर दिनाकरन यांना लाच दिल्याच्या प्रकरणात सीबीआयच्या चौकशीला सामोरं जावं लागतंय. दिनाकरनवर पक्षाच्या चिन्हासाठी लाच दिल्याचा आरोप आहे. तर प्रकृती अस्वास्थ्यापायी शशिकलांचे पती रुग्णालयात उपचार घेत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी व माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम गटांचे विलीनीकरण झाले आहे. सरचिटणीस शशिकला यांना पदावरून व पक्षातून दूर करण्याबाबतही त्यांच्यात एकमत झाले आहे.

समझोत्याचा भाग म्हणून पक्षाचे समन्वयक म्हणून पनीरसेल्वम यांना नेमण्यात आले असून, मुख्यमंत्री उपसमन्वयक असतील. त्यांचा राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणूनही शपथविधी पार पडला. पनीरसेल्वम यांच्याकडे अर्थ खात्याबरोबरच गृहनिर्माणाशी संबंधित चार खाती तसेच झोपडपट्टी पुनर्वसन आणि शहर नियोजन ही खाती देण्यात आली आहेत. त्यांचे विश्वासू के. पांडियराजन यांचाही शपथविधी पार पडला. याशिवाय पनीरसेल्वम गटाला आणखी मंत्रिपदे मिळणार आहेत. माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर शशिकला यांनी पक्षाचा ताबा घेतल्यामुळे आणि पनीरसेल्वम यांना दूर करून पलानीस्वामी यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतल्याने पक्षात फूट पडली होती. पण आता त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना पक्षात कोणतेही स्थान असणार नाही.