शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

"घरं गाडली गेली, फक्त छप्पर बाहेर; आम्ही शिट्ट्या वाजवत होतो जेणेकरून लोकांना पळता येईल"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 11:11 IST

धरालीजवळील मुखाबा गावातील लोकांनी हे भयानक दृश्य पाहिलं तेव्हा त्यांच्या अंगावरही काटा आला.

उत्तरकाशीच्या धराली गावात ढगफुटीमुळे झालेला विध्वंसात सर्व काही संपलं आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये लोकांच्या किंकाळ्या, ओरडणं स्पष्टपणे ऐकू येतं. लोक जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावताना दिसत आहेत. धरालीजवळील मुखाबा गावातील लोकांनी हे भयानक दृश्य पाहिलं तेव्हा त्यांच्या अंगावरही काटा आला.

मुखाबा गावातील स्थानिक रहिवासी आणि प्रत्यक्षदर्शी सुभाष चंद्र सेमवाल म्हणतात की, त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधीही इतकं भयानक दृश्य पाहिलं नव्हतं. दुपारची वेळ होती. त्यांना वेगाने वाहणाऱ्या पाण्याचा आवाज ऐकू आला. दगड वेगाने खाली येत होते. त्यानंतर ते आणि त्यांच्या कुटुंबातील इतर लोक बाहेर आले. आम्ही पाहिलं की खीर गंगा नदीचं पाणी वेगाने खाली येत होतं. आम्ही सर्वजण घाबरलो. आम्ही धारली बाजारपेठेतील लोकांना सावध करण्यासाठी शिट्ट्या वाजवल्या आणि त्यांना शक्य तितक्या लवकर तेथून पळून जाण्यास सांगितलं. आम्ही बराच वेळ ओरडत राहिलो.

Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार

सेमवाल भावुक होतात आणि म्हणतात की, आमचा आवाज ऐकून बरेच लोक हॉटेलमधून बाहेर पडले पण वेगाने वाहणाऱ्या पाण्याने सर्वांना वेढलं. त्याच घटनेच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये लोक घाबरून पळून त्यांच्या नातेवाईकांना बोलावताना दिसत आहेत. सर्व काही संपलं असं म्हणत आहेत. याच परिसरात अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि होमस्टे आहेत. लष्कर, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि आयएसबीटीच्या तुकड्या बचावकार्य करत आहेत. 

निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो

लष्कराचा हर्षिल कॅम्प देखील घटनास्थळापासून फक्त चार किलोमीटर अंतरावर आहे. सोशल मीडियावर लष्कराने अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये सर्वत्र कचरा दिसतो. लोकांना आपत्तीग्रस्त धरालीपासून दूर राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. याच दरम्यान, एसडीआरएफशी संबंधित सूत्रांनी सांगितलं की, ५० जवानांची एक तुकडी मदत आणि बचावकार्यात गुंतली आहे.

"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव

एनडीआरएफच्या चार तुकड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत आणि बचाव कार्यात गुंतल्या आहेत. याशिवाय आयटीबीपीच्या तीन तुकड्या देखील मदत कार्यात तैनात करण्यात आल्या आहेत. राज्य आणि केंद्र सरकार परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, प्रशासन लोकांना नदीपासून दूर राहण्याचं आवाहन करत आहे. राज्य सरकार परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे. सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी ढिगारा आणि दगड पडले आहेत. याचा वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. 

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडlandslidesभूस्खलनfloodपूरRainपाऊस