शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

"घरं गाडली गेली, फक्त छप्पर बाहेर; आम्ही शिट्ट्या वाजवत होतो जेणेकरून लोकांना पळता येईल"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 11:11 IST

धरालीजवळील मुखाबा गावातील लोकांनी हे भयानक दृश्य पाहिलं तेव्हा त्यांच्या अंगावरही काटा आला.

उत्तरकाशीच्या धराली गावात ढगफुटीमुळे झालेला विध्वंसात सर्व काही संपलं आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये लोकांच्या किंकाळ्या, ओरडणं स्पष्टपणे ऐकू येतं. लोक जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावताना दिसत आहेत. धरालीजवळील मुखाबा गावातील लोकांनी हे भयानक दृश्य पाहिलं तेव्हा त्यांच्या अंगावरही काटा आला.

मुखाबा गावातील स्थानिक रहिवासी आणि प्रत्यक्षदर्शी सुभाष चंद्र सेमवाल म्हणतात की, त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधीही इतकं भयानक दृश्य पाहिलं नव्हतं. दुपारची वेळ होती. त्यांना वेगाने वाहणाऱ्या पाण्याचा आवाज ऐकू आला. दगड वेगाने खाली येत होते. त्यानंतर ते आणि त्यांच्या कुटुंबातील इतर लोक बाहेर आले. आम्ही पाहिलं की खीर गंगा नदीचं पाणी वेगाने खाली येत होतं. आम्ही सर्वजण घाबरलो. आम्ही धारली बाजारपेठेतील लोकांना सावध करण्यासाठी शिट्ट्या वाजवल्या आणि त्यांना शक्य तितक्या लवकर तेथून पळून जाण्यास सांगितलं. आम्ही बराच वेळ ओरडत राहिलो.

Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार

सेमवाल भावुक होतात आणि म्हणतात की, आमचा आवाज ऐकून बरेच लोक हॉटेलमधून बाहेर पडले पण वेगाने वाहणाऱ्या पाण्याने सर्वांना वेढलं. त्याच घटनेच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये लोक घाबरून पळून त्यांच्या नातेवाईकांना बोलावताना दिसत आहेत. सर्व काही संपलं असं म्हणत आहेत. याच परिसरात अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि होमस्टे आहेत. लष्कर, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि आयएसबीटीच्या तुकड्या बचावकार्य करत आहेत. 

निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो

लष्कराचा हर्षिल कॅम्प देखील घटनास्थळापासून फक्त चार किलोमीटर अंतरावर आहे. सोशल मीडियावर लष्कराने अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये सर्वत्र कचरा दिसतो. लोकांना आपत्तीग्रस्त धरालीपासून दूर राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. याच दरम्यान, एसडीआरएफशी संबंधित सूत्रांनी सांगितलं की, ५० जवानांची एक तुकडी मदत आणि बचावकार्यात गुंतली आहे.

"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव

एनडीआरएफच्या चार तुकड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत आणि बचाव कार्यात गुंतल्या आहेत. याशिवाय आयटीबीपीच्या तीन तुकड्या देखील मदत कार्यात तैनात करण्यात आल्या आहेत. राज्य आणि केंद्र सरकार परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, प्रशासन लोकांना नदीपासून दूर राहण्याचं आवाहन करत आहे. राज्य सरकार परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे. सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी ढिगारा आणि दगड पडले आहेत. याचा वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. 

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडlandslidesभूस्खलनfloodपूरRainपाऊस