शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 19:04 IST

उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली गावात ढगफुटीची घटना घडली आहे.

उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली गावात ढगफुटीची घटना घडली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी ढगफुटीमुळे धराली या उंचावरील गावांमध्ये अचानक पूर आला. आतापर्यंत या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढू शकतो असं म्हटलं जात आहे. याच दरम्यान दुर्घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये ढिगाऱ्यातूनही दोन जणांचा जीव वाचला आहे. 

व्हिडीओमध्ये ढिगाऱ्यातून दोन जण कसे वाचले हे पाहायला मिळत आहे. काही लोक त्यांना लवकर पळून जा आणि जीव वाचवा असं म्हणत आहेत. "पळ भावा पळ..." असं म्हणत आहेत. रिपोर्टनुसार, ढगफुटी झाल्याने अचानक पूर आला, ज्यामुळे गावातील घरांसह सर्वकाही वाहून गेलं आणि प्रचंड विनाश झाला. लोकांना पळून जाण्याची संधीही मिळाली नाही. त्यामुळे जे वाचले ते खरोखर भाग्यवान आहेत. या दुर्घटनेत ५० हून अधिक लोक बेपत्ता असल्याचं सांगितलं जात आहे.

निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो

बेपत्ता लोकांना शोधण्यासाठी आणि दुर्गम भागात मदत पुरवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. हवामान खात्याने आणखी काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच उत्तराखंड पोलीस, एसडीआरएफ, एनडीआरएफ आणि भारतीय लष्कराचं पथकं घटनास्थळी पोहोचलं. बचावकार्य वेगाने सुरू करण्यात आलं आहे, परंतु मुसळधार पाऊस आणि रस्ते बंद असल्याने मदतकार्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत

"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव

उत्तरकाशीमध्ये ढगफुटीने मोठ्या प्रमाणात विनाश केला आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ५० जण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. अनेक घरं उद्ध्वस्त झाली. एका स्थानिक रहिवाशाने दिलेल्या माहितीनुसार, "आज दुपारी १.३० वाजता पूर आला, ज्यामुळे धरालीमध्ये मोठं नुकसान झालं आहे. ६० ते ७० लोक बेपत्ता आहेत. त्यांच्याशी संपर्क झालेला नाही." 

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडfloodपूरRainपाऊस