शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 19:04 IST

उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली गावात ढगफुटीची घटना घडली आहे.

उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली गावात ढगफुटीची घटना घडली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी ढगफुटीमुळे धराली या उंचावरील गावांमध्ये अचानक पूर आला. आतापर्यंत या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढू शकतो असं म्हटलं जात आहे. याच दरम्यान दुर्घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये ढिगाऱ्यातूनही दोन जणांचा जीव वाचला आहे. 

व्हिडीओमध्ये ढिगाऱ्यातून दोन जण कसे वाचले हे पाहायला मिळत आहे. काही लोक त्यांना लवकर पळून जा आणि जीव वाचवा असं म्हणत आहेत. "पळ भावा पळ..." असं म्हणत आहेत. रिपोर्टनुसार, ढगफुटी झाल्याने अचानक पूर आला, ज्यामुळे गावातील घरांसह सर्वकाही वाहून गेलं आणि प्रचंड विनाश झाला. लोकांना पळून जाण्याची संधीही मिळाली नाही. त्यामुळे जे वाचले ते खरोखर भाग्यवान आहेत. या दुर्घटनेत ५० हून अधिक लोक बेपत्ता असल्याचं सांगितलं जात आहे.

निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो

बेपत्ता लोकांना शोधण्यासाठी आणि दुर्गम भागात मदत पुरवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. हवामान खात्याने आणखी काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच उत्तराखंड पोलीस, एसडीआरएफ, एनडीआरएफ आणि भारतीय लष्कराचं पथकं घटनास्थळी पोहोचलं. बचावकार्य वेगाने सुरू करण्यात आलं आहे, परंतु मुसळधार पाऊस आणि रस्ते बंद असल्याने मदतकार्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत

"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव

उत्तरकाशीमध्ये ढगफुटीने मोठ्या प्रमाणात विनाश केला आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ५० जण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. अनेक घरं उद्ध्वस्त झाली. एका स्थानिक रहिवाशाने दिलेल्या माहितीनुसार, "आज दुपारी १.३० वाजता पूर आला, ज्यामुळे धरालीमध्ये मोठं नुकसान झालं आहे. ६० ते ७० लोक बेपत्ता आहेत. त्यांच्याशी संपर्क झालेला नाही." 

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडfloodपूरRainपाऊस