शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 16:56 IST

उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये ढगफुटीने मोठ्या प्रमाणात विनाश केला आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला आहे.

उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये ढगफुटीने मोठ्या प्रमाणात विनाश केला आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ५० जण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. अनेक घरं उद्ध्वस्त झाली. एका स्थानिक रहिवाशाने दिलेल्या माहितीनुसार, "आज दुपारी १.३० वाजता पूर आला, ज्यामुळे धरालीमध्ये मोठं नुकसान झालं आहे. ६० ते ७० लोक बेपत्ता आहेत. त्यांच्याशी संपर्क झालेला नाही."

"१९७८ मध्ये ५ ऑगस्ट रोजी कांजोडिया नावाच्या ठिकाणी पूर आला होता. आज धरालीमध्ये विनाश झाला आहे. ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा आणि गाव सर्वकाही उद्ध्वस्त झालं आहे, आम्ही आमच्या मुखवा गावातून हे भयानक दृश्य पाहत आहोत. हे असं दृश्य कधीच पाहिलं नाही." आजतकशी बोलताना त्यांनी असं म्हटलं आहे. 

दुसऱ्या प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, काल रात्रीपासून धरालीमध्ये सतत पाऊस पडत आहे, खीरगंगा नदीत ढगफुटीमुळे खूप विनाश झाला आहे. यामुळे केदारनाथ दुर्घटनेची आठवण झाली. १०० हून अधिक लोक गाडले गेले आहेत. प्रशासन पूर्णपणे तयार आहे आणि सैन्य देखील पोहोचणार आहे. बचावकार्य वेगाने सुरू आहे. ढगफुटीमुळे संपूर्ण गाव उद्ध्वस्त झालं आहे.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तराखंडच्या धराली भागात ढगफुटीच्या दुर्दैवी घटनेची फोनवरून माहिती घेतली आहे. याच दरम्यान, त्यांना राज्य सरकारकडून करण्यात येणाऱ्या मदत आणि बचावकार्याची माहिती देण्यात आली. त्यांनी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे.

ढगफुटीच्या या घटनेनंतर, गंगोत्री धामचा जिल्हा मुख्यालयाशी पूर्णपणे संपर्क तुटला आहे. धरालीमध्ये पाण्याची पातळी वाढल्याने बाजारपेठ आणि घरांचे बरेच नुकसान झाले आहे. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशसारख्या डोंगराळ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि ढगफुटीच्या घटना वारंवार घडत आहेत. या दुर्घटनांमध्ये अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडRainपाऊस