शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 16:56 IST

उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये ढगफुटीने मोठ्या प्रमाणात विनाश केला आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला आहे.

उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये ढगफुटीने मोठ्या प्रमाणात विनाश केला आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ५० जण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. अनेक घरं उद्ध्वस्त झाली. एका स्थानिक रहिवाशाने दिलेल्या माहितीनुसार, "आज दुपारी १.३० वाजता पूर आला, ज्यामुळे धरालीमध्ये मोठं नुकसान झालं आहे. ६० ते ७० लोक बेपत्ता आहेत. त्यांच्याशी संपर्क झालेला नाही."

"१९७८ मध्ये ५ ऑगस्ट रोजी कांजोडिया नावाच्या ठिकाणी पूर आला होता. आज धरालीमध्ये विनाश झाला आहे. ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा आणि गाव सर्वकाही उद्ध्वस्त झालं आहे, आम्ही आमच्या मुखवा गावातून हे भयानक दृश्य पाहत आहोत. हे असं दृश्य कधीच पाहिलं नाही." आजतकशी बोलताना त्यांनी असं म्हटलं आहे. 

दुसऱ्या प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, काल रात्रीपासून धरालीमध्ये सतत पाऊस पडत आहे, खीरगंगा नदीत ढगफुटीमुळे खूप विनाश झाला आहे. यामुळे केदारनाथ दुर्घटनेची आठवण झाली. १०० हून अधिक लोक गाडले गेले आहेत. प्रशासन पूर्णपणे तयार आहे आणि सैन्य देखील पोहोचणार आहे. बचावकार्य वेगाने सुरू आहे. ढगफुटीमुळे संपूर्ण गाव उद्ध्वस्त झालं आहे.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तराखंडच्या धराली भागात ढगफुटीच्या दुर्दैवी घटनेची फोनवरून माहिती घेतली आहे. याच दरम्यान, त्यांना राज्य सरकारकडून करण्यात येणाऱ्या मदत आणि बचावकार्याची माहिती देण्यात आली. त्यांनी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे.

ढगफुटीच्या या घटनेनंतर, गंगोत्री धामचा जिल्हा मुख्यालयाशी पूर्णपणे संपर्क तुटला आहे. धरालीमध्ये पाण्याची पातळी वाढल्याने बाजारपेठ आणि घरांचे बरेच नुकसान झाले आहे. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशसारख्या डोंगराळ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि ढगफुटीच्या घटना वारंवार घडत आहेत. या दुर्घटनांमध्ये अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडRainपाऊस