शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
5
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
6
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
7
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
8
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
9
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
10
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
11
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
12
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
13
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
14
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
15
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
16
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
17
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
18
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
19
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
20
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल

"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 16:56 IST

उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये ढगफुटीने मोठ्या प्रमाणात विनाश केला आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला आहे.

उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये ढगफुटीने मोठ्या प्रमाणात विनाश केला आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ५० जण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. अनेक घरं उद्ध्वस्त झाली. एका स्थानिक रहिवाशाने दिलेल्या माहितीनुसार, "आज दुपारी १.३० वाजता पूर आला, ज्यामुळे धरालीमध्ये मोठं नुकसान झालं आहे. ६० ते ७० लोक बेपत्ता आहेत. त्यांच्याशी संपर्क झालेला नाही."

"१९७८ मध्ये ५ ऑगस्ट रोजी कांजोडिया नावाच्या ठिकाणी पूर आला होता. आज धरालीमध्ये विनाश झाला आहे. ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा आणि गाव सर्वकाही उद्ध्वस्त झालं आहे, आम्ही आमच्या मुखवा गावातून हे भयानक दृश्य पाहत आहोत. हे असं दृश्य कधीच पाहिलं नाही." आजतकशी बोलताना त्यांनी असं म्हटलं आहे. 

दुसऱ्या प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, काल रात्रीपासून धरालीमध्ये सतत पाऊस पडत आहे, खीरगंगा नदीत ढगफुटीमुळे खूप विनाश झाला आहे. यामुळे केदारनाथ दुर्घटनेची आठवण झाली. १०० हून अधिक लोक गाडले गेले आहेत. प्रशासन पूर्णपणे तयार आहे आणि सैन्य देखील पोहोचणार आहे. बचावकार्य वेगाने सुरू आहे. ढगफुटीमुळे संपूर्ण गाव उद्ध्वस्त झालं आहे.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तराखंडच्या धराली भागात ढगफुटीच्या दुर्दैवी घटनेची फोनवरून माहिती घेतली आहे. याच दरम्यान, त्यांना राज्य सरकारकडून करण्यात येणाऱ्या मदत आणि बचावकार्याची माहिती देण्यात आली. त्यांनी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे.

ढगफुटीच्या या घटनेनंतर, गंगोत्री धामचा जिल्हा मुख्यालयाशी पूर्णपणे संपर्क तुटला आहे. धरालीमध्ये पाण्याची पातळी वाढल्याने बाजारपेठ आणि घरांचे बरेच नुकसान झाले आहे. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशसारख्या डोंगराळ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि ढगफुटीच्या घटना वारंवार घडत आहेत. या दुर्घटनांमध्ये अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडRainपाऊस