शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

"आमची अवस्था खूप वाईट, आम्हाला लवकर बाहेर काढा"; बोगद्यात अडकलेल्या मजुराची विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 14:34 IST

पाईपद्वारे अधिकार्‍यांशी बोलताना मजुरांनी त्यांना लवकरात लवकर वाचवण्याची विनंती केली आहे.

उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे बोगदा दुर्घटनेत 41 मजूर अजूनही अडकले आहेत. 12 नोव्हेंबर रोजी बोगदा कोसळल्यानंतर अडकलेल्या मजुरांना वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले जात आहेत. बचाव पथकाला अद्याप कोणतंही यश मिळालेलं नाही. त्यांच्या प्रकृतीबाबतही चिंता वाढत आहे.

पाईपद्वारे अधिकार्‍यांशी बोलताना मजुरांनी त्यांना लवकरात लवकर वाचवण्याची विनंती केली आहे. उत्तर प्रदेश सरकारचे प्रतिनिधी अरुण कुमार यांच्यांशी मजुरांनी संवाद साधला. जे संभाषण झाले ते खूप चिंताजनक होतं. या बोगद्यात उत्तर प्रदेशातील 8 मजूरही अडकले आहेत. या मजुरांनी अरुण कुमार यांना येथील स्थिती अत्यंत वाईट असून त्वरीत बाहेर काढण्यास सांगितलं आहे.

"काळजी करू नका, हिंमत ठेवा"

मजुराशी संवाद साधताना अरुण कुमार त्यांना हिंमत देत म्हणाले, "काळजी करू नका, धीर धरा. संपूर्ण देश तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. बचाव कार्य लवकरच यशस्वी होईल आणि आपण सर्व एकत्र घरी जाऊ." त्याचवेळी या संभाषणात उत्तर प्रदेशातील एका मजुराने अरुण कुमार यांना सांगितलं की, आम्हाला जेवण मिळत आहे, पण आम्हा सर्वांची अवस्था खूप वाईट आहे. बचाव कार्य कसं सुरू आहे? आम्हाला लवकर बाहेर काढा. दिवसेंदिवस अवघड होत चाललं आहे.

आणखी एक मजूर राम सुंदरने आमच्या कुटुंबातील सदस्यांना काळजी करू नका आणि स्वतःची काळजी घेण्यास सांगा असं म्हटलं आहे. या बोगद्यात विविध राज्यातील कामगार अडकले आहेत. या राज्यांच्या सरकारांनी त्यांचे प्रतिनिधी रेस्क्यू एजन्सीशी संवाद साधण्यासाठी पाठवले आहेत. अरुण कुमार मिश्रा हे त्यापैकीच एक आहेत, ज्यांना उत्तर प्रदेश सरकारने मजुरांची अवस्था आणि बचाव कार्याची चौकशी करण्यासाठी पाठवलं आहे.  

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंड