शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

भाजपच्या पिचवर काँग्रेसची जोरदार बॅटिंग; सत्ताधाऱ्यांचे मोठे नेते फोडले; भाजप नेतृत्त्व चकित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 18:18 IST

काँग्रेसचं आक्रमक राजकारण सुरू; सत्ताधारी पक्षातील अनेक नेते गळाला लावण्याची तयारी

देशात भाजपची सत्ता आल्यापासून गेल्या ७ वर्षांत काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी हाती कमळ घेतलं. याच नेत्यांमुळे अनेक राज्यांत भाजपनं सत्तेचा सोपान गाठला. भाजपच्या याच राजकारणामुळे काँग्रेसची अवस्था बिकट झाली. मात्र आता काँग्रेसनं भाजपला त्यांच्याच पद्धतीनं उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. भाजपनं तयार केलेल्या पिचवर काँग्रेसनं जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. त्यामुळे उत्तराखंडमध्ये भाजपला धक्क्यावर धक्के बसू लागले आहेत. पुढील वर्षी उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे.

भाजप सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेल्या यशपाल आर्य यांनी कालच काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याआधी ते काँग्रेसमध्येच होते. आता विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी मुलगा संजीव आर्यसोबत घरवापसी केली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, भाजपचे आमदार उमेश शर्मा काऊ यांचादेखील पक्षप्रवेश होणार आहे. तेदेखील आधी काँग्रेसमध्येच होते. त्यांनी काही दिवसांपूर्वीच राहुल गांधींची भेट घेतली आहे.

२०१६ मध्ये भाजपनं उत्तराखंडमध्ये काँग्रेसला सुरुंग लावला. आता तोच हिशोब काँग्रेसकडून चुकता केला जात आहे. यशपाल आर्य यांची घरवापसी विभागीय आणि जातीय समीकरणांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची आहे. आर्य दलित समाजातील महत्त्वाचे नेते आहेत. त्यांना पक्षात आणून काँग्रेसनं राज्यात आणि राज्याबाहेर महत्त्वाचा संदेश दिला आहे. ऊधमसिंग नगर आणि नैनिताल जिल्ह्यातील निवडणूक समीकरणांवर प्रभाव टाकण्याची क्षमता आर्य यांच्याकडे आहे. जिल्ह्यातील अर्धा डझन विधानसभा मतदारसंघात त्यांचं प्राबल्य आहे.

आपला दबदबा असलेल्या विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आपणच ठरवू या अटीवर आर्य यांना काँग्रेसमध्ये घरवापसी केल्याची चर्चा आहे. आर्य काँग्रेसमध्ये गेल्यानं भाजपला धक्का बसला आहे. ऊधमसिंग नगर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचा गृहजिल्हा आहे. धामी यांना मुख्यमंत्री दिल्याचा फायदा पक्षाला होईल अशी गणितं भाजपनं मांडली होती. मात्र आर्य यांच्या पक्ष बदलानं समीकरण बदलली आहेत.

टॅग्स :BJPभाजपाShiv SenaशिवसेनाRahul Gandhiराहुल गांधी