शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

भाजपच्या पिचवर काँग्रेसची जोरदार बॅटिंग; सत्ताधाऱ्यांचे मोठे नेते फोडले; भाजप नेतृत्त्व चकित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 18:18 IST

काँग्रेसचं आक्रमक राजकारण सुरू; सत्ताधारी पक्षातील अनेक नेते गळाला लावण्याची तयारी

देशात भाजपची सत्ता आल्यापासून गेल्या ७ वर्षांत काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी हाती कमळ घेतलं. याच नेत्यांमुळे अनेक राज्यांत भाजपनं सत्तेचा सोपान गाठला. भाजपच्या याच राजकारणामुळे काँग्रेसची अवस्था बिकट झाली. मात्र आता काँग्रेसनं भाजपला त्यांच्याच पद्धतीनं उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. भाजपनं तयार केलेल्या पिचवर काँग्रेसनं जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. त्यामुळे उत्तराखंडमध्ये भाजपला धक्क्यावर धक्के बसू लागले आहेत. पुढील वर्षी उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे.

भाजप सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेल्या यशपाल आर्य यांनी कालच काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याआधी ते काँग्रेसमध्येच होते. आता विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी मुलगा संजीव आर्यसोबत घरवापसी केली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, भाजपचे आमदार उमेश शर्मा काऊ यांचादेखील पक्षप्रवेश होणार आहे. तेदेखील आधी काँग्रेसमध्येच होते. त्यांनी काही दिवसांपूर्वीच राहुल गांधींची भेट घेतली आहे.

२०१६ मध्ये भाजपनं उत्तराखंडमध्ये काँग्रेसला सुरुंग लावला. आता तोच हिशोब काँग्रेसकडून चुकता केला जात आहे. यशपाल आर्य यांची घरवापसी विभागीय आणि जातीय समीकरणांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची आहे. आर्य दलित समाजातील महत्त्वाचे नेते आहेत. त्यांना पक्षात आणून काँग्रेसनं राज्यात आणि राज्याबाहेर महत्त्वाचा संदेश दिला आहे. ऊधमसिंग नगर आणि नैनिताल जिल्ह्यातील निवडणूक समीकरणांवर प्रभाव टाकण्याची क्षमता आर्य यांच्याकडे आहे. जिल्ह्यातील अर्धा डझन विधानसभा मतदारसंघात त्यांचं प्राबल्य आहे.

आपला दबदबा असलेल्या विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आपणच ठरवू या अटीवर आर्य यांना काँग्रेसमध्ये घरवापसी केल्याची चर्चा आहे. आर्य काँग्रेसमध्ये गेल्यानं भाजपला धक्का बसला आहे. ऊधमसिंग नगर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचा गृहजिल्हा आहे. धामी यांना मुख्यमंत्री दिल्याचा फायदा पक्षाला होईल अशी गणितं भाजपनं मांडली होती. मात्र आर्य यांच्या पक्ष बदलानं समीकरण बदलली आहेत.

टॅग्स :BJPभाजपाShiv SenaशिवसेनाRahul Gandhiराहुल गांधी