शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

भीषण! मोठा आवाज आला अन् ३६ जणांनी जीव गमावला; अपघाताआधी बसमध्ये नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 12:01 IST

बसमधील २८ जणांचा जागीच मृत्यू झाला तर ८ जणांचा रामपूरच्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

एक मोठा आवाज झाला आणि बस नियंत्रणाबाहेर गेली आणि खोल दरीत पडली. अल्मोडामध्ये भीषण अपघात झाला आहे. ६३ प्रवाशांनी खचाखच भरलेली ४३ सीटर बस पौरी जिल्ह्यातील नैनीदांडा ब्लॉकमधील बारातकिनाथ येथून नैनीतालच्या रामनगरसाठी निघाली होती. बस कुपी गावाजवळ आल्यावर बसचा स्प्रिंग बेल्ट तुटल्याचा आवाज आला आणि दुसऱ्याच क्षणी बस २०० मीटर खोल दरीत कोसळली. या अपघातात ३६ जणांचा मृत्यू झाला.

बसमधील २८ जणांचा जागीच मृत्यू झाला तर ८ जणांचा रामपूरच्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. अपघातापूर्वी बसमधील वातावरण अगदी सामान्य होतं, असं बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सांगितलं. काही लोक आपापसात बोलत होते. काही महिला मोबाईलमध्ये व्यस्त होत्या. याच दरम्यान बस कुप गावाजवळ आली असता येथील रस्ता अतिशय खराब होता. अशा स्थितीत बसचा वेगही मंदावला. बस ओव्हरलोड होती आणि काही लोक उभे होते. 

बसने वळण घेतलं तेव्हा 'खटाक' असा मोठा आवाज आला, रस्ता खराब आहे, म्हणून काहीतरी खाली आलं असावं असं सर्व प्रवाशांना वाटलं. पण मात्र दुसऱ्याच क्षणी बस चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेली आणि खोल दरीत पडली. यावेळी बसच्या दरवाजाजवळ असलेले काही लोक रस्त्यावर पडले. तर उर्वरित लोक बससह २०० मीटर खोल दरीत पडले. 

या बस अपघातात कोणी पती, कोणी पत्नी, कोणी आई-वडील गमावले आहेत. बसमध्ये प्रवास करणारे मनोज आणि चारू हे त्यांची अडीच वर्षांची मुलगी शिवानी हिला घेऊन रामनगरकडे येत होते. मात्र पत्नी चारूचा बस अपघातात मृत्यू झाला. निरागस शिवानीच्या डोक्यावरून आईचं छत्र हरपलं आहे.  शिवानीलाही गंभीर दुखापत झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

टॅग्स :AccidentअपघातBus DriverबसचालकUttarakhandउत्तराखंड