शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

‘आयएएस’चे गाव कोणाला करणार मतांचे दान; माधवपट्टी गावात ५० हून अधिक आहेत अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 06:01 IST

गावचे माजी सरपंच दिलीपकुमार सिंग म्हणाले, गावात काही कार्यक्रम असेल तेव्हा प्रत्येक गल्लीत लाल-निळ्या दिव्याच्या गाड्या दिसतात. साधारण ७००-८०० लोकसंख्या असलेल्या या गावात राजपूत लोकांची संख्या जास्त आहे.

धनाजी कांबळेलाेकमत न्यूज नेटवर्कजौनपूर : उत्तर प्रदेश, बिहार राज्यात गरिबी असली तरी शिक्षण हा इथल्या शोषित समूहांच्या विकासाचं महत्त्वाचं माध्यम आहे. पूर्वांचलमधील जौनपूर जिल्ह्यातील माधवपट्टी गावात ७० ते ८० घरे असतील, पण ५० हून अधिक आयएएस आणि आयपीएस आहेत. 

येथील कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक असलेले वीरेंद्र कुमार सिंग सांगतात, कवी वमीक जोनपुरी यांचे वडील मुस्तफा हुसेन हे गावातील पहिले आयएएस अधिकारी होते. १९१४ मध्ये त्यांनी यूपीएससीसारखीच सर्वोच्च परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांच्यानंतर १९५१ मध्ये इंदू प्रकाश यांनी प्रशासकीय सेवेच्या परीक्षेत दुसरा क्रमांक मिळवला आणि आयएएस अधिकारी बनले. ते जवळजवळ १६ देशांचे राजदूतही होते. त्यांचे भाऊ विद्या प्रकाश सिंह हे देखील १९५३ मध्ये आयएएस अधिकारी बनले. ते यूपीएससीचे काही काळ अध्यक्षही होते. तेव्हापासून ही गावाची परंपरा कायम आहे.

गावचे माजी सरपंच दिलीपकुमार सिंग म्हणाले, गावात काही कार्यक्रम असेल तेव्हा प्रत्येक गल्लीत लाल-निळ्या दिव्याच्या गाड्या दिसतात. साधारण ७००-८०० लोकसंख्या असलेल्या या गावात राजपूत लोकांची संख्या जास्त आहे. गावाच्या सुरुवातीलाच एक मोठं प्रवेशद्वार आहे, तेच या गावाचे वेगळेपण दर्शवते. विशेष म्हणजे या गावात कोणतीही प्रशिक्षण संस्था नाही; तरीही मेहनतीने इथले तरुण स्पर्धा परीक्षेची तयारी करतात.

माधवपट्टी, गोधना, निवाना, शिवपूर, कुडवा, परियावा, मई अशी आजूबाजूची १२ गावे अशी आहेत, जिथे प्रत्येक घरातील एक तरी सरकारी नोकरीत आहे. माध्यमिक शाळेत असतानाच मुलांमध्ये यूपीएससी तयारी करण्याची मानसिकता तयार होते. माधवपट्टीत ५ आयपीएस, १२ आयएएस आणि ३६ जण राज्य सेवा आयोगाकडून (पीसीएस) अधिकारी झाले आहेत. यात ११ महिलांचा समावेश आहे. बुद्धिजीवी गाव असल्याने गावात चोरी, भांडणतंटे होत नाहीत, असे ध्यानचंद सिंग यांनी सांगितले.

एकाच घरातील चार भाऊ आयएएस    या गावातील एकाच घरातील चार जण आयएएस झाले आहेत. १९५५ मध्ये कुटुंबातील मोठे असलेले विनय सिंह परीक्षा पास झाले. निवृत्तीच्या काळात ते बिहारचे मुख्य सचिव होते. त्यांचे भाऊ छत्रपाल सिंह आणि अजयकुमार सिंह १९६४ मध्ये आयएएस झाले. आणि सर्वात लहान शशिकांत सिंह १९६८ मध्ये आयएएस झाले. २००२ मध्ये शशिकांत यांच्या मुलाने देखील आयएएस परीक्षा क्रॅक केली.

...गावात सपा फिरकलीच नाहीमाधवपट्टी गावात प्रचारासाठी सगळेच पक्ष येतात, पण या गावात ठाकूर राजपूत समाजाचे लोक जास्त असल्यामुळे अखिलेश यादव यांच्या पक्षाचे लोक इकडे प्रचाराला येत नाहीत. मात्र, आमच्यासाठी सगळे पक्ष सारखेच आहेत, सर्वांनी प्रचाराला यावे, असे राहुल सिंग यांनी सांगितले.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२