शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

‘आयएएस’चे गाव कोणाला करणार मतांचे दान; माधवपट्टी गावात ५० हून अधिक आहेत अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 06:01 IST

गावचे माजी सरपंच दिलीपकुमार सिंग म्हणाले, गावात काही कार्यक्रम असेल तेव्हा प्रत्येक गल्लीत लाल-निळ्या दिव्याच्या गाड्या दिसतात. साधारण ७००-८०० लोकसंख्या असलेल्या या गावात राजपूत लोकांची संख्या जास्त आहे.

धनाजी कांबळेलाेकमत न्यूज नेटवर्कजौनपूर : उत्तर प्रदेश, बिहार राज्यात गरिबी असली तरी शिक्षण हा इथल्या शोषित समूहांच्या विकासाचं महत्त्वाचं माध्यम आहे. पूर्वांचलमधील जौनपूर जिल्ह्यातील माधवपट्टी गावात ७० ते ८० घरे असतील, पण ५० हून अधिक आयएएस आणि आयपीएस आहेत. 

येथील कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक असलेले वीरेंद्र कुमार सिंग सांगतात, कवी वमीक जोनपुरी यांचे वडील मुस्तफा हुसेन हे गावातील पहिले आयएएस अधिकारी होते. १९१४ मध्ये त्यांनी यूपीएससीसारखीच सर्वोच्च परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांच्यानंतर १९५१ मध्ये इंदू प्रकाश यांनी प्रशासकीय सेवेच्या परीक्षेत दुसरा क्रमांक मिळवला आणि आयएएस अधिकारी बनले. ते जवळजवळ १६ देशांचे राजदूतही होते. त्यांचे भाऊ विद्या प्रकाश सिंह हे देखील १९५३ मध्ये आयएएस अधिकारी बनले. ते यूपीएससीचे काही काळ अध्यक्षही होते. तेव्हापासून ही गावाची परंपरा कायम आहे.

गावचे माजी सरपंच दिलीपकुमार सिंग म्हणाले, गावात काही कार्यक्रम असेल तेव्हा प्रत्येक गल्लीत लाल-निळ्या दिव्याच्या गाड्या दिसतात. साधारण ७००-८०० लोकसंख्या असलेल्या या गावात राजपूत लोकांची संख्या जास्त आहे. गावाच्या सुरुवातीलाच एक मोठं प्रवेशद्वार आहे, तेच या गावाचे वेगळेपण दर्शवते. विशेष म्हणजे या गावात कोणतीही प्रशिक्षण संस्था नाही; तरीही मेहनतीने इथले तरुण स्पर्धा परीक्षेची तयारी करतात.

माधवपट्टी, गोधना, निवाना, शिवपूर, कुडवा, परियावा, मई अशी आजूबाजूची १२ गावे अशी आहेत, जिथे प्रत्येक घरातील एक तरी सरकारी नोकरीत आहे. माध्यमिक शाळेत असतानाच मुलांमध्ये यूपीएससी तयारी करण्याची मानसिकता तयार होते. माधवपट्टीत ५ आयपीएस, १२ आयएएस आणि ३६ जण राज्य सेवा आयोगाकडून (पीसीएस) अधिकारी झाले आहेत. यात ११ महिलांचा समावेश आहे. बुद्धिजीवी गाव असल्याने गावात चोरी, भांडणतंटे होत नाहीत, असे ध्यानचंद सिंग यांनी सांगितले.

एकाच घरातील चार भाऊ आयएएस    या गावातील एकाच घरातील चार जण आयएएस झाले आहेत. १९५५ मध्ये कुटुंबातील मोठे असलेले विनय सिंह परीक्षा पास झाले. निवृत्तीच्या काळात ते बिहारचे मुख्य सचिव होते. त्यांचे भाऊ छत्रपाल सिंह आणि अजयकुमार सिंह १९६४ मध्ये आयएएस झाले. आणि सर्वात लहान शशिकांत सिंह १९६८ मध्ये आयएएस झाले. २००२ मध्ये शशिकांत यांच्या मुलाने देखील आयएएस परीक्षा क्रॅक केली.

...गावात सपा फिरकलीच नाहीमाधवपट्टी गावात प्रचारासाठी सगळेच पक्ष येतात, पण या गावात ठाकूर राजपूत समाजाचे लोक जास्त असल्यामुळे अखिलेश यादव यांच्या पक्षाचे लोक इकडे प्रचाराला येत नाहीत. मात्र, आमच्यासाठी सगळे पक्ष सारखेच आहेत, सर्वांनी प्रचाराला यावे, असे राहुल सिंग यांनी सांगितले.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२