शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

‘आयएएस’चे गाव कोणाला करणार मतांचे दान; माधवपट्टी गावात ५० हून अधिक आहेत अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 06:01 IST

गावचे माजी सरपंच दिलीपकुमार सिंग म्हणाले, गावात काही कार्यक्रम असेल तेव्हा प्रत्येक गल्लीत लाल-निळ्या दिव्याच्या गाड्या दिसतात. साधारण ७००-८०० लोकसंख्या असलेल्या या गावात राजपूत लोकांची संख्या जास्त आहे.

धनाजी कांबळेलाेकमत न्यूज नेटवर्कजौनपूर : उत्तर प्रदेश, बिहार राज्यात गरिबी असली तरी शिक्षण हा इथल्या शोषित समूहांच्या विकासाचं महत्त्वाचं माध्यम आहे. पूर्वांचलमधील जौनपूर जिल्ह्यातील माधवपट्टी गावात ७० ते ८० घरे असतील, पण ५० हून अधिक आयएएस आणि आयपीएस आहेत. 

येथील कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक असलेले वीरेंद्र कुमार सिंग सांगतात, कवी वमीक जोनपुरी यांचे वडील मुस्तफा हुसेन हे गावातील पहिले आयएएस अधिकारी होते. १९१४ मध्ये त्यांनी यूपीएससीसारखीच सर्वोच्च परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांच्यानंतर १९५१ मध्ये इंदू प्रकाश यांनी प्रशासकीय सेवेच्या परीक्षेत दुसरा क्रमांक मिळवला आणि आयएएस अधिकारी बनले. ते जवळजवळ १६ देशांचे राजदूतही होते. त्यांचे भाऊ विद्या प्रकाश सिंह हे देखील १९५३ मध्ये आयएएस अधिकारी बनले. ते यूपीएससीचे काही काळ अध्यक्षही होते. तेव्हापासून ही गावाची परंपरा कायम आहे.

गावचे माजी सरपंच दिलीपकुमार सिंग म्हणाले, गावात काही कार्यक्रम असेल तेव्हा प्रत्येक गल्लीत लाल-निळ्या दिव्याच्या गाड्या दिसतात. साधारण ७००-८०० लोकसंख्या असलेल्या या गावात राजपूत लोकांची संख्या जास्त आहे. गावाच्या सुरुवातीलाच एक मोठं प्रवेशद्वार आहे, तेच या गावाचे वेगळेपण दर्शवते. विशेष म्हणजे या गावात कोणतीही प्रशिक्षण संस्था नाही; तरीही मेहनतीने इथले तरुण स्पर्धा परीक्षेची तयारी करतात.

माधवपट्टी, गोधना, निवाना, शिवपूर, कुडवा, परियावा, मई अशी आजूबाजूची १२ गावे अशी आहेत, जिथे प्रत्येक घरातील एक तरी सरकारी नोकरीत आहे. माध्यमिक शाळेत असतानाच मुलांमध्ये यूपीएससी तयारी करण्याची मानसिकता तयार होते. माधवपट्टीत ५ आयपीएस, १२ आयएएस आणि ३६ जण राज्य सेवा आयोगाकडून (पीसीएस) अधिकारी झाले आहेत. यात ११ महिलांचा समावेश आहे. बुद्धिजीवी गाव असल्याने गावात चोरी, भांडणतंटे होत नाहीत, असे ध्यानचंद सिंग यांनी सांगितले.

एकाच घरातील चार भाऊ आयएएस    या गावातील एकाच घरातील चार जण आयएएस झाले आहेत. १९५५ मध्ये कुटुंबातील मोठे असलेले विनय सिंह परीक्षा पास झाले. निवृत्तीच्या काळात ते बिहारचे मुख्य सचिव होते. त्यांचे भाऊ छत्रपाल सिंह आणि अजयकुमार सिंह १९६४ मध्ये आयएएस झाले. आणि सर्वात लहान शशिकांत सिंह १९६८ मध्ये आयएएस झाले. २००२ मध्ये शशिकांत यांच्या मुलाने देखील आयएएस परीक्षा क्रॅक केली.

...गावात सपा फिरकलीच नाहीमाधवपट्टी गावात प्रचारासाठी सगळेच पक्ष येतात, पण या गावात ठाकूर राजपूत समाजाचे लोक जास्त असल्यामुळे अखिलेश यादव यांच्या पक्षाचे लोक इकडे प्रचाराला येत नाहीत. मात्र, आमच्यासाठी सगळे पक्ष सारखेच आहेत, सर्वांनी प्रचाराला यावे, असे राहुल सिंग यांनी सांगितले.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२