शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

हाथरस प्रकरण : बाबरी प्रकरणाच्या निकालामुळे रात्री केला अंत्यसंस्कार, सर्वोच्च न्यायालयात यूपी सरकारचे शपथपत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 14:09 IST

योध्या-बाबरी प्रकरणामुळे जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. तसेच कोरोनामुळे गर्दी न होऊ देण्याचा उल्लेखही यूपी सरकारने आपल्या शपथपत्रात केला आहे. (Uttar Pradesh government, Hathras gangrape)

ठळक मुद्देकुटुंबीयांच्या परवानगीनंतर आणि हिंसेपासून बचावासाठी आर्ध्या रात्री पीडितेवर अंत्यसंस्कार - UP सरकारयासंदर्भात पोलिसांना 14 सप्टेंबरला माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तत्काळ पावले उचलली. हाथरसमध्ये मुलीवर झालेला कथित बलात्कार आणि हल्ल्याची सीबीआय चौकशी करण्यात यावी - UP सरकार

नवी दिल्ली - हाथरस येथील कथित सामूहिक बलात्कार प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दाखल केले आहे. यात उत्तर प्रदेश सरकारने विरोधकांवर जातीय दंगे पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. महत्वाचे म्हणजे यूपी सरकारने आपल्या शपथपत्रात, कुटुंबीयांच्या परवानगीनंतर आणि हिंसेपासून बचावासाठी आर्ध्या रात्री पीडितेवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचेही म्हटले आहे. 

अयोध्या-बाबरी प्रकरणामुळे जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. तसेच कोरोनामुळे गर्दी न होऊ देण्याचा उल्लेखही यूपी सरकारने आपल्या शपथपत्रात केला आहे. यूपी सरकारने म्हटले आहे, की अयोध्या-बाबरी प्रकरणात आलेल्या निकालाची संवेदनशीलता लक्षात घेत पीडितेच्या कुटुंबीयांच्या परवानगीने रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

दंगली घडविण्याचे नियोजित प्रयत्न - यासंदर्भात पोलिसांना 14 सप्टेंबरला माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तत्काळ पावले उचलली. एवढेच नाही, तर या प्रकरणाचा वापर करून जातीय आणि सांप्रदायिक दंगली घडविण्यासाठी राजकीय पक्षांचे काही वर्ग, सोशल मीडिया, काही वर्गांच्या प्रिंट आणि इलेक्ट्रानिक मिडियाने नियोजित प्रयत्न केला, असेही यूपी सरकारने आपल्या शपथपत्रात म्हटले आहे.

हल्ल्याची सीबीआय चौकशी करण्यात यावी - हाथरसमध्ये मुलीवर झालेला कथित बलात्कार आणि हल्ल्याची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही यूपी सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. एवढेच नाही, तर आपणही या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करू शकतो. मात्र, निष्पक्ष तपास होऊ नये, यासाठी काहींचे प्रयत्न सुरू आहेत, असेही यूपी सरकारने म्हटले आहे.

सकाळच्या सुमारास हिंसाचार होण्याचे इनपूट होते - यूपी सरकारने आपल्या शपथपत्रात, अर्ध्यारात्री अंत्यसंस्कार का करावा लागला? याचे कारणही सांगितले आहे. यानुसार, संबंधित मुलीच्या मुद्द्यावरून मोठ्या प्रमाणावर हिंसाचार करण्याची तयारी सुरू आहे, असे इनपूटही गुप्तचर संस्थांकडे होते. जर, सकाळपर्यंत वाट पाहिली असती, तर परिस्थिती हाताबाहेर गेली असती. यामुळे संबंधित मुलीच्या कुटुंबीयांच्या परवानगीनेच रात्री मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथGang Rapeसामूहिक बलात्कारRapeबलात्कार