शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

हाथरस प्रकरण : बाबरी प्रकरणाच्या निकालामुळे रात्री केला अंत्यसंस्कार, सर्वोच्च न्यायालयात यूपी सरकारचे शपथपत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 14:09 IST

योध्या-बाबरी प्रकरणामुळे जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. तसेच कोरोनामुळे गर्दी न होऊ देण्याचा उल्लेखही यूपी सरकारने आपल्या शपथपत्रात केला आहे. (Uttar Pradesh government, Hathras gangrape)

ठळक मुद्देकुटुंबीयांच्या परवानगीनंतर आणि हिंसेपासून बचावासाठी आर्ध्या रात्री पीडितेवर अंत्यसंस्कार - UP सरकारयासंदर्भात पोलिसांना 14 सप्टेंबरला माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तत्काळ पावले उचलली. हाथरसमध्ये मुलीवर झालेला कथित बलात्कार आणि हल्ल्याची सीबीआय चौकशी करण्यात यावी - UP सरकार

नवी दिल्ली - हाथरस येथील कथित सामूहिक बलात्कार प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दाखल केले आहे. यात उत्तर प्रदेश सरकारने विरोधकांवर जातीय दंगे पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. महत्वाचे म्हणजे यूपी सरकारने आपल्या शपथपत्रात, कुटुंबीयांच्या परवानगीनंतर आणि हिंसेपासून बचावासाठी आर्ध्या रात्री पीडितेवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचेही म्हटले आहे. 

अयोध्या-बाबरी प्रकरणामुळे जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. तसेच कोरोनामुळे गर्दी न होऊ देण्याचा उल्लेखही यूपी सरकारने आपल्या शपथपत्रात केला आहे. यूपी सरकारने म्हटले आहे, की अयोध्या-बाबरी प्रकरणात आलेल्या निकालाची संवेदनशीलता लक्षात घेत पीडितेच्या कुटुंबीयांच्या परवानगीने रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

दंगली घडविण्याचे नियोजित प्रयत्न - यासंदर्भात पोलिसांना 14 सप्टेंबरला माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तत्काळ पावले उचलली. एवढेच नाही, तर या प्रकरणाचा वापर करून जातीय आणि सांप्रदायिक दंगली घडविण्यासाठी राजकीय पक्षांचे काही वर्ग, सोशल मीडिया, काही वर्गांच्या प्रिंट आणि इलेक्ट्रानिक मिडियाने नियोजित प्रयत्न केला, असेही यूपी सरकारने आपल्या शपथपत्रात म्हटले आहे.

हल्ल्याची सीबीआय चौकशी करण्यात यावी - हाथरसमध्ये मुलीवर झालेला कथित बलात्कार आणि हल्ल्याची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही यूपी सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. एवढेच नाही, तर आपणही या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करू शकतो. मात्र, निष्पक्ष तपास होऊ नये, यासाठी काहींचे प्रयत्न सुरू आहेत, असेही यूपी सरकारने म्हटले आहे.

सकाळच्या सुमारास हिंसाचार होण्याचे इनपूट होते - यूपी सरकारने आपल्या शपथपत्रात, अर्ध्यारात्री अंत्यसंस्कार का करावा लागला? याचे कारणही सांगितले आहे. यानुसार, संबंधित मुलीच्या मुद्द्यावरून मोठ्या प्रमाणावर हिंसाचार करण्याची तयारी सुरू आहे, असे इनपूटही गुप्तचर संस्थांकडे होते. जर, सकाळपर्यंत वाट पाहिली असती, तर परिस्थिती हाताबाहेर गेली असती. यामुळे संबंधित मुलीच्या कुटुंबीयांच्या परवानगीनेच रात्री मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथGang Rapeसामूहिक बलात्कारRapeबलात्कार