शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

Uttar Pradesh Election 2022: बटाट्याची दारू रंगतेय..गुंडांची नशा उतरतेय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 07:57 IST

फिरोजाबाद, कन्नोज, मैनपुरीपासून कानपूरच्या बिल्लोर-क्षेत्रापर्यंत रस्त्यावरून जाताना जिकडेतिकडे बटाट्याचीच शेती दिसते.

सचिन जवळकोटेफिरोझाबाद : उत्तर प्रदेशातील दुसऱ्या टप्प्याचं मतदान सोमवारी होणार आहे. आता सर्व नेत्यांचं लक्ष तिसऱ्या टप्प्याकडे वळालंय. मात्र या ठिकाणी बटाट्याची दारू भलतीच धुमाकूळ घालू लागलीय तर गल्लीबोळातल्या गुंडांची नशा झटक्यात उतरलीय. 

यमुना नदीचं खोरं सध्या ‘बटाट्याचा टापू’ म्हणून प्रसिद्ध. फिरोजाबाद, कन्नोज, मैनपुरीपासून कानपूरच्या बिल्लोर-क्षेत्रापर्यंत रस्त्यावरून जाताना जिकडेतिकडे बटाट्याचीच शेती दिसते. जवळपास साडेपाच लाखांहून अधिक शेतकरी आपल्या शेतात बटाटाच पिकवितात. फरुखाबादसारख्या केवळ एका गावातून बारापेक्षाही जास्त किसान रेल्वे बटाटा घेऊन गेल्या वर्षभरात धावल्या आहेत. शेतकरी आता एकजूट करून प्रश्न विचारू लागलेत. सुरेश सिंग चंदेल ‘लोकमत’ला सांगत होते, ‘जोपर्यंत देशात बटाट्याच्या को-प्रॉडक्ट फॅक्टरी सुरू होत नाहीत, तोपर्यंत आम्हाला हमीभाव मिळणारच नाही. त्यासाठी सरकारनं बटाट्यातून अल्कोहोल तयार करण्याच्या उद्योगांना परवानगी द्यावी. सध्या या परिसरात बटाट्यावर अनेक नवनवीन प्रयोग केले जात आहेत. आयटी क्षेत्रातील नोकरी सोडून शेतीत उतरलेल्या आनंद शर्मा यांचा तर दावा आहे की, राष्ट्रीय बटाटा संशोधन केंद्रानं विकसित केलेला निळा बटाटा शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती करेल. 

कारण मधुमेह आणि कर्करोग यांच्यासाठी अत्यंत प्रभावशाली असलेला हा नवा बटाटा कमी खर्चात जास्त उतारा देतो.’ उत्तर प्रदेशात बटाट्याचा व्होडका तयार होईल का नाही, याची गॅरंटी या क्षणी कोणत्याच राजकीय नेता देऊ शकत नाही. मात्र याच नेत्यांच्या जीवावर गावागावांत धुमाकूळ घालणाऱ्या गुंडांची नशा उत्तर प्रदेश पोलिसांनी पूर्णपणे उतरून टाकलीय. यंदाच्या प्रचार धुमाळीत निवडणूक आयोगानं अत्यंत कडक भूमिका घेतल्याचं सर्वांनाच जाणवू लागलंय. गल्लीबोळातले एकेक गुंड वेचून-वेचून पोलिसांनी गजाआड केलेत.

थंडीचा कडाका, दारूचा शिडकावा!

उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण तापत असलं असलं तरी थंडीचा कडाका मात्र वाढत चाललाय. या थंडीपासून शेतातील बटाट्याचं सरंक्षण करण्यासाठी शेतकरी चक्क देशी दारूचा वापर करताहेत. पाण्यात दारूच्या बाटल्या ओतून त्याची फवारणी पिकावर केली जात आहे. यामुळे पिकांना म्हणे गर्मी मिळते. विशेष म्हणजे आचारसंहिता काळात अडचण नको म्हणून अनेकांनी अगोदरच बाटल्यांची खोकी घरात भरून ठेवलीत.  

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२