शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

Uttar Pradesh Election 2022: बटाट्याची दारू रंगतेय..गुंडांची नशा उतरतेय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 07:57 IST

फिरोजाबाद, कन्नोज, मैनपुरीपासून कानपूरच्या बिल्लोर-क्षेत्रापर्यंत रस्त्यावरून जाताना जिकडेतिकडे बटाट्याचीच शेती दिसते.

सचिन जवळकोटेफिरोझाबाद : उत्तर प्रदेशातील दुसऱ्या टप्प्याचं मतदान सोमवारी होणार आहे. आता सर्व नेत्यांचं लक्ष तिसऱ्या टप्प्याकडे वळालंय. मात्र या ठिकाणी बटाट्याची दारू भलतीच धुमाकूळ घालू लागलीय तर गल्लीबोळातल्या गुंडांची नशा झटक्यात उतरलीय. 

यमुना नदीचं खोरं सध्या ‘बटाट्याचा टापू’ म्हणून प्रसिद्ध. फिरोजाबाद, कन्नोज, मैनपुरीपासून कानपूरच्या बिल्लोर-क्षेत्रापर्यंत रस्त्यावरून जाताना जिकडेतिकडे बटाट्याचीच शेती दिसते. जवळपास साडेपाच लाखांहून अधिक शेतकरी आपल्या शेतात बटाटाच पिकवितात. फरुखाबादसारख्या केवळ एका गावातून बारापेक्षाही जास्त किसान रेल्वे बटाटा घेऊन गेल्या वर्षभरात धावल्या आहेत. शेतकरी आता एकजूट करून प्रश्न विचारू लागलेत. सुरेश सिंग चंदेल ‘लोकमत’ला सांगत होते, ‘जोपर्यंत देशात बटाट्याच्या को-प्रॉडक्ट फॅक्टरी सुरू होत नाहीत, तोपर्यंत आम्हाला हमीभाव मिळणारच नाही. त्यासाठी सरकारनं बटाट्यातून अल्कोहोल तयार करण्याच्या उद्योगांना परवानगी द्यावी. सध्या या परिसरात बटाट्यावर अनेक नवनवीन प्रयोग केले जात आहेत. आयटी क्षेत्रातील नोकरी सोडून शेतीत उतरलेल्या आनंद शर्मा यांचा तर दावा आहे की, राष्ट्रीय बटाटा संशोधन केंद्रानं विकसित केलेला निळा बटाटा शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती करेल. 

कारण मधुमेह आणि कर्करोग यांच्यासाठी अत्यंत प्रभावशाली असलेला हा नवा बटाटा कमी खर्चात जास्त उतारा देतो.’ उत्तर प्रदेशात बटाट्याचा व्होडका तयार होईल का नाही, याची गॅरंटी या क्षणी कोणत्याच राजकीय नेता देऊ शकत नाही. मात्र याच नेत्यांच्या जीवावर गावागावांत धुमाकूळ घालणाऱ्या गुंडांची नशा उत्तर प्रदेश पोलिसांनी पूर्णपणे उतरून टाकलीय. यंदाच्या प्रचार धुमाळीत निवडणूक आयोगानं अत्यंत कडक भूमिका घेतल्याचं सर्वांनाच जाणवू लागलंय. गल्लीबोळातले एकेक गुंड वेचून-वेचून पोलिसांनी गजाआड केलेत.

थंडीचा कडाका, दारूचा शिडकावा!

उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण तापत असलं असलं तरी थंडीचा कडाका मात्र वाढत चाललाय. या थंडीपासून शेतातील बटाट्याचं सरंक्षण करण्यासाठी शेतकरी चक्क देशी दारूचा वापर करताहेत. पाण्यात दारूच्या बाटल्या ओतून त्याची फवारणी पिकावर केली जात आहे. यामुळे पिकांना म्हणे गर्मी मिळते. विशेष म्हणजे आचारसंहिता काळात अडचण नको म्हणून अनेकांनी अगोदरच बाटल्यांची खोकी घरात भरून ठेवलीत.  

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२