शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Uttar Pradesh Election 2022: यूपीच्या निवडणुकीत ‘बदलापूर’ची चर्चा; मुंबईत रोजगार देण्याचं उमेदवारांचं आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 16:12 IST

यंदाच्या बदलापूर निवडणुकीत नवा ट्रेंड पाहायला मिळाला. याठिकाणी मतदारांसोबतच उमेदवारही जे वर्षोनुवर्षे मुंबईत कामानिमित्त राहत आहेत तेच उभे राहिलेत

उत्तर प्रदेशातील बदलापूर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक यावेळी खूप चर्चेत होती. यावेळी उमेदवारासह मतदारही मुंबईचे होते. उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी तर मतदार मतदानासाठी मोठ्या संख्येने ट्रेनमधून इथं पोहचले होते. ७ मार्चला मतदान झाल्यानंतर आता त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. या निवडणुकीचा प्रचार जितका बदलापूर मतदारसंघात झाला तितकाच मुंबईच्या जवळ असलेल्या बदलापूरमध्येही झाला. त्याठिकाणी रॅली, सभा, डोअर टू डोअर कॅम्पेन राबवण्यात आलं.

यंदाच्या बदलापूर निवडणुकीत नवा ट्रेंड पाहायला मिळाला. याठिकाणी मतदारांसोबतच उमेदवारही जे वर्षोनुवर्षे मुंबईत कामानिमित्त राहत आहेत तेच उभे राहिलेत. या जागेवर ज्या १४ उमेदवारांनी अर्ज भरला आहे. त्यातील निम्म्याहून अधिक उमेदवार मुंबईचे आहेत. १२ जणांचे उमेदवार अर्ज मुंबईचं मतदार कार्ड असल्याने रद्द करण्यात आले. बदलापूर मतदारसंघातील जे लोकं मुंबईत राहतात त्यांचे आधार कार्ड भलेही मुंबईचं असलं तरी मतदारकार्ड गावाकडचं असतं. हे लोकं केवळ मतदान कार्ड ठेवत नाहीत तर प्रत्येक निवडणुकीत मतदान करण्यासाठी गावाकडे पोहचता. यावेळी काहीजण मतदानासोबतच येथे निवडणुकीत उभं राहण्यासाठी आले होते.

२००८ च्या मतदारसंघ पुर्नरचनेत बदलापूर मतदारसंघ अस्तित्वात आला. २०१२ मध्ये याठिकाणी पहिल्यांदा मतदान झालं. तेव्हा समाजवादी पक्षाचे ओमप्रकाश दुबे आमदार झाले. दुबे यांना जितकं मतदान झालं त्यात मतदारसंघात राहणाऱ्यांपेक्षा मुंबईत राहणाऱ्या मतदारांचे पडले. याठिकाणी बहुजन समाजवादी पक्षाचे लालजी यादव दुसऱ्या स्थानावर निवडून आले. २०१७ च्या निवडणुकीत याठिकाणाहून भाजपाने विजय मिळवला. भाजपाचे रमेश चंद्र यांनी लालजी यादव यांना २ हजार ३७२ मतांनी हरवलं. तर विद्यमान आमदार ओमप्रकाश दुबे तिसऱ्या नंबरवर गेले.

सिनेमामुळेही बदलापूर मतदारसंघ चर्चेत

बदलापूर सर्वात आधी अभिनेता वरूण धवनचा बदलापूर नावाच्या सिनेमानं चर्चेत आलं. सिनेमात केवळ नाव बदलापूर सेम होतं बाकी कुठलीही भूमिका अथवा कथा या मतदारसंघाशी निगडीत नाही. मैने गांधी को क्यो मारा हा सिनेमा बनवणारे मानसिंह हे बदलापूरचे रहिवासी आहेत. मुंबईत राहणारे जे उमेदवार आहेत. त्यांनी मुंबईत तुम्हाला रोजगार देऊ असं आश्वासन निवडणुकीत दिलं आहे.

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२